Your cart is empty now.
भारताचा इतिहास (इ.स.700 ते 1200) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. नेहमीप्रमाणे या ग्रंथात चौकटीत मुद्दे दिले आहेत. ते विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडतील. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथात दक्षिण हिंदुस्थानातील चालुक्य, चोल, पांड्य, इ. राजांचाही विचार केला आहे. नंतर उत्तर भारतावर अरब, तुर्क यांची आक्रमणे झालीत. त्यांचा प्रतिकार राजपूत राजांनी केला. पण त्यांच्यातील दुहीमुळे ते पराजयी झाले आणि भारतावर इस्लाम सत्ता प्रस्थापित झाली. अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे