Your cart is empty now.
प्रस्तुत काव्यसंग्रहात सुरुवातीच्या कविता दु:ख, नैराश्य, अपयश यांवर लिहिल्या असून सरतेशेवटी जीवनात घडलेल्या आध्यात्मिक परिवर्तनामुळे लेखिकेने जे काही अनुभवले ते सर्व कवितांच्या माध्यमातून शब्दबद्ध केले. या ग्रंथाच्या माध्यमातून हृदयातल्या भावना व्यक्त करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला आहे. काही कारणांमुळे मला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सर्वांना जो अनुभव येतो तोच मलाही आला. आलेल्या अपयशाने मला जगाचा परिचय करवून दिला. जीवनामध्ये मला खूप यातनांमधून जावे लागले, पण अशातही अनेक वर्षे मी माझे मन स्थिर ठेवू शकले ते केवळ आध्यात्मिक ज्ञानामुळे आणि अखंड हरिनाम स्मरणामुळे… धैर्य, उत्साह व दृढनिश्चयाने मार्ग आक्रमिला… आणि म्हणूनच आज माझा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून नवनव्या कल्पना सतत सुचत असतात. त्यासंबंधीच्या कवितादेखील प्रस्तुत काव्यसंग्रहात वाचकांना आढळून येतील.