Your cart is empty now.
प्रत्येक कवितेमधील युवती विचार आणि विचारानेच समाजाचे वैचारीक जीवन समृद्ध करण्याचे ध्येय बाळगणारी आहे. तिला उच्च राहणीमान आणि गाडीबंगल्याचा सोस नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा असला म्हणजे पुरे, फालतु चंगळवादी जीवनशैली तिला नको आहे. समाजासाठी जगणार्या स्त्रीया का धरतील चंगळवादी जीवनशैलीचा सोस?
कविता क्रमांक ‘सात’ मधील शिवरंजनी वाचकांच्या मनावर आपला क्रांतिकारी विचारांचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही तसेच तिच्या हळव्या मनाची हळवी भावना वाचकांच्या हृदयावर आपली गुलाबी मोहोर उमटवेलच यात शंका नाही.