Your cart is empty now.
जयवंत दळवी म्हणजे साहित्यसृष्टीत अवतरलेले बहुआयामी सुंदर वास्तव!! दळवींनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने साहित्यातील अनेक प्रकार हाताळलेत. आणि प्रत्येक साहित्यप्रकारात आपल्या ‘परीसस्पर्शाने’ सुवर्णमयी आदर्श निर्माण केलेत. दळवींची प्रतिभा साहित्यप्रवाहात अखंड प्रवाहित राहिली. तिला आटणे माहित नाही. त्यामुळे दळवींच्या अनेक साहित्यकृती जन्माला आल्या अनेक कथा, कादंबर्या, अनेक नाटके, अनेक कलांतर-प्रकारांतर, प्रवासवर्णन सदरलेखन यामुळे दळवींचे आपोआपच बहुआयाम सिद्ध झालेत.