Your cart is empty now.
औद्योगिक क्रांतीनंतर जगामध्ये नैसर्गिक व सांस्कृतिक पातळीवर फार मोठे बदल घडून आले. अनेक घटकांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागले. त्यामुळे जागतिक तापमान वाढ, ओझोन क्षय, पर्यावरणीय प्रदूषण, मृदा अवनती, निर्वनिकरण, वाळवंटीकरण, दुष्काळ, भूमी उपयोजनात बदल, परिसंस्थांचे असंतुलन, साथींचे आजार यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या. त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे, याची जाणीव सर्वांना अधिकाधिक प्रमाणात होत आहे, ही नक्कीच समाधानाची बाब आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये विषयाचे सविस्तर विवेचन, मूलभूत संकल्पना व तत्त्व, प्रतिपादन व उदाहरणासह तपशीलवार स्पष्टीकरण केलेले असून आजच्या काळातील विविध घटकांच्या बदलत्या वास्तवाचे आकलन होण्यास या पुस्तकाची नक्कीच मदत होईल.
Paryavaran Adhyayan