Your cart is empty now.
मानव हा पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याचे जीवन व अस्तित्व निसर्गावरच अवलंबून आहे. आपले जीवन अधिक सुखसोयीचे व सुरक्षीत होण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो निसर्गातील विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. मानवाला निसर्गातून उपलब्ध झालेल्या विविध वस्तू किंवा पदार्थ म्हणजेच नैसर्गिक साधने होत. मानवाचे पर्यावरणाविषयी जसजसे ज्ञान वाढत गेले आणि त्याची तांत्रिक प्रगती होत गेली तसतसा पर्यावरणातील विविध घटकांचा वापर वाढला. आधुनिक काळात साधनसंपत्तीची संकल्पना अधिक व्यापक झाली असून त्यात संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचा समावेश होतो.
पृथ्वीचा सुमारे तीन चतुर्थांश भाग म्हणजे सुमारे 71 टक्के भागावर जल तर 29 टक्के क्षेत्रावर भूभाग आहे. भूपृष्ठावरील एकूण जलसंपदेपैकी सुमारे 97 टक्के पाणी समुद्रात सामावले आहे. सागराचे पाणी खारट असल्याने त्याचा फारसा वापर करता येत नाही तर सुमारे 3 टक्के जलसाठा नद्या, तलाव, सरोवर व भूमीगत पाण्याचा म्हणजे गोड पाण्याचा आहे. पृथ्वीच्या निर्मिती/उत्पत्तीसोबत पाणी व पाण्यामुळे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. जलसंपदेचा योग्य वापर व संवर्धन होण्यासाठी सन 2004 हे वर्ष ‘जल वर्ष’ म्हणून घोषित केले गेले.
सदरील पुस्तकात प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर केला आहे. संज्ञा व संकल्पना सर्वांना समजतील अशा भाषेत मांडल्या आहेत.