Welcome to Prashant Publications

Rs. 350.00
Availability: 10 left in stock

सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मध्ययुगीन भारत (इ.स. 1206 – 1707)
- +

सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. उत्तर भारतात महंमद तुघलकाचे आसन डळमळू लागले होते. या संधीचा फायदा घेऊन हरिहरने इ.स. 1336 मध्ये स्वतंत्र हिंदू राज्यांची स्थापना केली. विजयनगर येथे संगम वंश, शाल्व वंश, तुल्ववंश व अरविंद वंश असे चार घराण्यांनी सुमारे पाऊणेतीनशे वर्ष राज्य केले. तालिकोटच्या लढाईमध्ये विजयनगर साम्राज्याचा विनाश झाला. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट करून मोगल साम्राज्याची उभारणी केली. मोगल घराण्यात बाबर, हुमायून, अकबर, जहांगिर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले.
प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चितच उपयोगी सिद्ध होईल.