Your cart is empty now.
कथा, कादंबरी, लोकनाट्य, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारांची ओळख अण्णाभाऊंच्या लेखनातून प्रकर्षाने होते. समाज प्रबोधन हा प्रधान हेतू असला तरीही त्यांच्या लेखनाचा वास्तव गाभा म्हणजे उपेक्षित, शौषित वर्गाच्या वेदनेला हुंकार देणे हाच आहे.
मानवी जीवनातील संघर्ष, भूकेची व्याकूळता,ख हीनत्वाची भावना, सन्मान आणि स्वाभिमान इ. चा मिलाफ अण्णाभाऊंच्या साहित्यातून होतांना दिसतो. स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेची रचना अण्णाभाऊंना अपेक्षित आहे.