Your cart is empty now.
प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची एक संस्कृती विशिष्टता असते. त्या प्रदेशातील लोकपरंपरा, बोली, आध्यात्मिक आणि वैचारिक प्रभाव यांमधून ती आकाराला येत असते. त्या प्रदेशातील साहित्यनिर्मिती हा देखील त्याचाच एक भाग असतो. या भूमिकेतून ‘खानदेश’ या प्रदेशाचे पृथगात्म संस्कृतीविशेष संशोधन-अभ्यासाच्या प्रक्रियेतून उलगडून दाखविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. प्रदेशविशिष्ट अस्मितांचा जागर करणे, एवढ्या संकुचित अर्थाने याकडे पाहणे उचित नाही. स्वसमाज-संस्कृतीचे निरीक्षण, परीक्षण करून पुनर्मूल्यांकन करण्याची दृष्टी त्यात अभिप्रेत आहे. या दिशेने व्यापक स्तरावरून आणि विविधांगांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर पुस्तकाचा विचार करावा लागतो. खानदेशातील साहित्याच्या अभ्यासावर प्रकाश टाकणार्या या पुस्तकाच्या माध्यमातून ह्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अभ्यासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.