Your cart is empty now.
प्राचीनकाळापासून गुरुकुलाची परंपरा भारतीय द्वीपकल्पात सुरू आहे. त्यातून निर्माण झालेली भारतीय संस्कृती वेगळी, सुविद्य, सुविचारी आणि नीतिमुल्यांना जोपासणारी आहे म्हणूनच विश्वात ही भारतीय संस्कृती अग्रस्थानावर आहे. भारतीय संस्कृतीचा लिखीत ठेवा म्हणजे प्राचीन धर्मग्रंथे-वेद, उपनिषदे, पुराणे होत. संस्कृतीच्या महानविचारसूत्रांचेच पुढे प्रतिकात रुपांतर झालेले आहे. आचारसंहिता सामान्यालाही कळावी यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उत्सव सुरू झाले. भारतीय व्यक्तीमध्ये पुरुषार्थ कायम असून बुद्धीसंपदा जोपासली गेली आहे. जीवनप्रवाह योग्यरितीने व्हावा यासाठी आश्रमव्यवस्था निश्चित केलेली आहे. भारतीय शिक्षणपद्धती सर्वांसाठी खुली असून त्यातील ज्ञान-दानाचेच वृद्धींगत होत आहे. आपल्या गुरुकुलात सर्व प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले जातात. शिक्षणातील उत्सवांच्या पाठीशी असलेली दृष्टी जर पकडली गेली, त्याची पार्श्वभूमी असलेल्या मंत्रांचे जर मनन झाले तर या सांस्कृतिक इतिहासाच्या निर्मात्या ऋषीसमोर मानव कृतज्ञताबुद्धीने नतमस्तक होते. या ठिकाणचे उत्सव प्रसन्नतेचे प्रेरक, प्रेमाचे पोषक धर्माचे संरक्षक आणि भावनांचे संवर्धक, ऐक्याचे साधक आहेत.