Your cart is empty now.
उत्कृष्ट विचारमंथनातून स्फुरलेले निबंध विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करतांना मनस्वी आनंद होत आहे. हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, शिक्षक यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
कोणतेही लेखन करतांना अगोदर आपल्याजवळ विचार हवे, ते मांडण्याची क्षमता हवी, त्यातूनच लेखन कौशल्य विकसित करता येते.
ज्याप्रमाणे मण्यांची माळ तयार करण्यासाठी विविध मणी सुंदर रितीने आपण त्या माळेमध्ये गुंफतो, त्याप्रमाणे समर्पक शब्दरचना, योग्य दाखले, उदाहरणे आणि काही अवतरणे, सुभाषिते, कवितेच्या ओळी ओवल्या की निबंधाची माळ तयार होते.
विद्यार्थ्यांनी वाचलेलं, ऐकलेलं असतं, पण ते त्यांना साध्या, सहज, सोप्या भाषेत मांडता येत नाही. निबंध म्हणजे एकत्रितरित्या आपले विचार बांधणे होय. आपल्या मनातील विचारांची मुद्देसूद मांडणी, योग्य भाषाशैली, सुसंगतपणा ही उत्कृष्ट निबंधाचे टप्पे आहेत. सतत वाचन केल्याने चांगले लेखन करता येऊ शकते. त्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही निबंध कितीही व्यवस्थित लिहिला असेल परंतु त्यात शुद्धलेखनाच्या चुका असतील तर तुमचे गुण त्यामुळे कमी होऊ शकतात. त्यामुळे आपले लेखन शुद्ध असावयास हवे.