Your cart is empty now.
महाराष्ट्राच्या वैचारिक जडण-घडणीमध्ये मध्ययुगीन कालखंडाचे आणि संत चळवळीचे महत्त्वपूर्ण योगदान रहिले आहे. सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया या काळामध्ये अधिक गतिमान झाली. कारण विविध जाती-धर्मातील संतांचा प्रवर्ताचा विचार यासाठी कारणीभूत ठरला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने गलितगात्र झालेला भारतीय समाज या चळवळीने थरारुन उठला. नामदेवापासून तुकाराम महाराजांपर्यंतच्या सर्व संतांनी समाजाच्या दंभावर प्रहार केला. या सर्व संतांमध्ये तत्कालीन परिस्थितीचा विचार करु जाता शुद्रातीशुद्रामधून आलेल्या संत चोखामेळ्याचे कार्य ठळकपणे नजरेत भरणारे आहे. मात्र चोखोबांच्या या वेगळ्या भूमिकेचा शोध महाराष्ट्राने घेतलाच नाही. या पार्श्वभूमीवर ‘संत चोखामेळा आणि मीः एक समीक्षा’ या समीक्षा ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित होण्यासारखे आहे.’