{"title":"कवितासंग्रह","description":"","products":[{"product_id":"स्वर-कवितेचे","title":"स्वर कवितेचे","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384595886309,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Swar-Kaviteche_Atalaji_Haridas-Akhare-1-768x1157.jpg?v=1770641280"},{"product_id":"अवस्थतेपार","title":"अवस्थतेपार","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384606273765,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Avavsthechya-Par_Shashikant-Hingonekar_Paperback-Edition-1-1-768x1161.jpg?v=1770641767"},{"product_id":"माही-माय-बहिनाई","title":"माही माय बहिनाई","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘बहिणाईची गाणी’ चे गारूड 1952 पासून मराठी मनावर कायम आहे. बहिणाबाईंच्या गाण्यांची निर्मितिप्रक्रिया सहृदयपणे उलगडून दाखवणारी ‘खोप्यामधी खोपा’ ही कादंबरी, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला ‘बहिणाबाई चौधरी’ हा काव्यचिकित्सा करणारा मोनोग्राफ, ‘बहिणाईची गाणीः शैलीवैज्ञानिक समीक्षा’, अनुवादविज्ञानाचे भान सांभाळून आणि बोली रूपांतराच्या मर्यादांची जाण ठेवून केलेला ‘बहिणाईना गाना’ हा अहिराणी बोलीतील अनुवाद हा आगळावेगळा उपक्रम इ. पाच सहा पुस्तकांमधून बहिणाबाईंचे काव्यकर्तृत्व विविध अंगांनी मांडणारे प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे बहिणाईचा घेतलेला ध्यास व अभ्यास,चिंतन यातूनच ‘माही माय बहिनाई’ हा खानदेशी – तावडी बोलीतील काव्यसंग्रह साकार झालेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएखादा विषय (थीम) घेऊन त्यावर मराठी भाषेत लिहिलेला पाच पन्नास कवितांचा संग्रह काढणे, ही कल्पना आता नवीन राहिलेली नाही. क वयित्री बहिणाबाई चौधरी आणि त्यांची कविता या विषयावरील कवितांची एक छोटेखानी पुस्तिका इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या प्रसिद्ध कवीने यापूर्वी काढली. आहे. प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे यांचा ‘माही माय बहिनाई’ हा खानदेशी – तावडी बोलीतील अष्टाक्षरी छंदातील 50 कवितांचा संग्रह बहिणाबाईंचे व्यक्तिमत्त्व व कवित्व, तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण, बहिणाबाईंच्या काव्याचे प्रयोजन आणि त्यांच्या काव्याची चिकित्सक व आस्वादक समीक्षादेखील या कवितेतून वाचकांसमोर मांडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअस्सल तावडी बोलीतील या कविता बहिणाबाईंच्या गाण्यांशी जातकुळी सांगतात त्यामुळे बहिणाबाईंची भाषा अहिराणी, लेवा गणबोली की खानदेशी – तावडी बोली हा प्रश्नही आपोआप निकालात निघतो. कारण ‘बहिणाईची गाणी’ आणि ‘माही माय बहिनाई’ या संग्रहातील कवितांची बोली एकच आहे. बहिणाबाईंची कविता हा कवीच्या चिंतनाचा आणि चिकित्सेचा विषय असल्याने केवळ भक्तीपोटी केलेल्या आस्वादक समीक्षेपेक्षा सपकाळेंची कविता वेगळी ठरते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबहिणाबाईंच्या कवितेचे समग्र आकलन होण्यासाठी ‘माही माय बहिनाई’ या संग्रहातील कविता उपयुक्त ठरतील यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399837855973,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mahi-May-Bahinai_Dr-Prakash-Sapkale_cnvt-1-198x300.jpg?v=1770879784"},{"product_id":"लेकरा-बाबाला-गमावू-नको","title":"लेकरा! बाबाला गमावू नको","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकाव्या नंतर थोडसं आणखीही….\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमी बोलका झाल्यावर आजी सांगायची –\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e80 मैल आहे अकोला आपल्या गावाहून. पायी गेला होता माहा सिताराम. पायात चप्पल नाही, पण गेला. बाबासाहेबाचं भाषण ऐकाचं होतना त्याले. ऐकून जसा घरी आला. पहलेच पहलवान, त्यात बाबाचं भाषण, वाघच दिसत होता तो. त्या वाघानं काय केल माहीत? तिसऱ्या रोजी तुझा जन्म झाला. अन त्यानं तुझं नाव भीमराव ठेवलं. आजी सांगायची – त्यावेळचे बाबासाहेबांचे जेष्ठ पुत्र, आमच्या पिढीचे बाप, असेच होते निष्ठावान. धर्मांतराच्या आधीच देव देव घराबाहेर केलेले. बाप म्हणून त्यांचे नाव लावायचे असेल तर…. त्यांचा आदर्श, हिम्मत स्वीकारावी लागेल.\u003cbr\u003eआजपर्यंत अनेक राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक साहित्यिक, वैज्ञानिक, आदिवासी विषयक, कामगार, मजदूर, शेतकरी, जातीय सलोखा, पर्यावरण इ. विचार मंचावरून आंदोलनातून प्रदीर्घ प्रवास केला. या प्रवासात अनेक हात मदतीला आले. आई-वडील, लहान-मोठे भाऊ तुळशीरामजी, लक्ष्मणरावजी, बळीरामजी आणि अशोकराव तसेच सहधर्मचारिणी शब्दाला सार्थक करणारी, जगवणारी सतत साथ देणारी पत्नी मंदाकिनी आणि भविष्यकाळ बिनधोक करणारी दोन्ही लेकरं! साहित्याच्या प्रवाहात महाराष्ट्राला सतत जागृत ठेवणारे बहुआयामी मित्रवर्य विजयकुमार गवई ज्यांनी अनेक लहान मोठे कलाकार घडविले, जगवले. त्यांचा हात सतत हातात राहिला.\u003cbr\u003eज्यांच्यामुळे प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले ते दादासाहेब तोंडगावकर. तसेच अशोकराव पळसपगार, राजेश लबडे व रवि चौरपगार यांच्यामुळे संग्रहाचे नियोजन सुखकर झाले. सतीश इंगोले, राम अभ्यंकर, दयाराम राउत, रूपनारायण, बडगे सर, बऱ्हाटे सर, राजाभाऊ इंगळे, डॉ. शेजव, डॉ. हिवरकर आणि रामदास ठवरे इत्यादींनी दिलेल्या सतत जाणिवा आणि सहकार्यामुळे इथपर्यंत मजल मारली. आणखीही खूप आहेत… त्याच्या शालेय शिक्षणापासून साथ देतोय संजय कोरे… शिक्षण व कर्तृत्वाचा उल्लेख करावा असे मित्र म्हणाले पण या क्षेत्रात बाबांची लेकरं इतकी पुढे गेलीत की आपल्याविषयी सांगणं म्हणजे सूर्या समोर दीपक दाखवणे किंवा ‘जुगनू चाँद के सामने’ ! ज्ञानदानाचे कार्य करता करता उपप्राचार्य म्हणून सेवा निवृत्त झालो. माझ्या प्रत्येक कार्याची प्रेरणा, माझे बळ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीच रंजल्या गांजलेल्यांची जीवन शक्ती.\u003cbr\u003eज्या बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वाला समता, स्वातंत्र्य, न्याय, करुणा, प्रज्ञा व बंधुत्वाची भाषा शिकवली त्यांनीच आमच्या हाती जगातील महान अस्त्र-लेखणी दिली आणि त्याच लेखणीतून आज शब्दांचं अंकुरण होत आहे. हे शब्दफुलांचे अंकुरण म्हणजे माझा कविता संग्रह “लेकरा बाबाला गमावू नको”!\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399910764773,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lekra-Babala-Gamau-Nako_B-S-Ingale_cnvt-1-198x300.jpg?v=1770880815"},{"product_id":"चीरा-काव्यसंग्रह","title":"चीरा (काव्यसंग्रह)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुझ्या प्रथमदर्शनी प्रेमाची अव्यक्त, अदृश्य, सृजन प्रेमोर्जा प्रेरणेत मिसळली. 84 वर्षाच्या आयुष्यात कामगाराच्या कविता, अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 ते 3, सण आणि उत्सव, नाती-गोती, वानोया या चीरा घडविल्या. सन्मानात ‘साहित्य अकादमी, दिल्ली’ (2000) पर्यंत वर चढत गेलो. खान्देशभूषण, समाजभूषण, अहिराणीरत्न, खान्देशरत्न या बिरूदावल्या ‘पालक’-तक्ता झाल्या. यशाचा उंच बुरुज निर्माण होतांना तूच भली मोठी भरभक्कम ‘चीरा’ राहीली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399918661861,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Chira-Kavyasangrah_Krishna-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1770881021"},{"product_id":"सोनं-साकयं-अहिरानी-कविता-संगर","title":"सोनं-साकयं (अहिरानी कविता संगर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआमयनेर ना कवी कुरुसना पाटील, आख्खा महाराष्ट्रमां नवाजेल, नी नावटायेल अहिरानीना पुरखा किडा, चंदन न जुनं खोड, जेठा कविता लिखनार, यासना हौ आस्सी नी च्यार वरीसना हयातीमां पयला-वयला कविता संग्रो. घट्यावरना गाना ज्या सऊ हजार वरीस पासीन मांघनी पिढीतून पुढनी पिढीलोंग तोंडे तोंडे यी ऱ्हायना व्हतात. त्या गडप व्हवानी भ्या व्हती. त्यासनी रातदिन खटाटोपरा खाईसन गायेगाव फिरीसन गोया करीसन, 1958 साल पासीन त्या मराठी भाषा बोलनारसले समजोत. गावरानी तूपनी गोडी त्यासले कवो, नी सोना नी रुढी, रीवाज, प्रथा स्नी चव लागो या ईचार मनमा ठिसनी हौ सोनाना संकर कया. अहिरानी लोकसाहित्य दर्शन खंड 1 ते 3 पुस्तके लिखात. सरकारनी त्या साहित्य संस्कृती मंडळ बंबई-32 ना वतीतून दुनियामां आनात. अहिरानी ना परचार नी परसार न काम त्यासनी कये. खेता खेता त्यासलै उपरती झायी नी शंभर कविता कयात. तिसले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ग्रामीन साहित्य संमेलन, लोकसाहित्य परिषद, अहिरानी साहित्य परिषद, जठे जठे मानपान थीन गयात तठे तठे अहिरानी कविता ऐकाड्यात. लोकेस्मा अहिरानी नी गोडी वाढाई. त्यास्ना सेवाना उपकारनी फेड म्हनीसन त्यासले दिल्लीना 2000 सालना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार ना मोठ्ठ्ा मानमरातब भेटना. अहिरानी नी गीतगंगा त्यासनी खान्देशथीन महाराष्ट्रना कानाकोपऱ्यामां वाव्हाडी. अहिरानी भूषान, खान्देश भूषान न्या सोन्यान्या मुंद्या, नी अहिरानी रत्न ना खडा मचाडेल मुंदी त्यासले सोभा देस. माय, गोधडी, पोरगं कस झाय?, खान्देस, पिकेल आंबा, मी येस हायद लाई, ‘हॅू’ नी किम्मत, कुवारा हात, आऱ्हाडानी मौत, यानसारख्या अफलातून कविता स्ना एक एक बारीक सोन-कन लिसन साकय घडाई-मढायी तुम्हना गया मा घालासाठे तयार कयी. पीरीम थीन तुम्हना गयामा टाकस ती जतन करा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399925018853,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sonsakay-Ahirani-Kavita_Krishna-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1770881167"},{"product_id":"अमरस्वर","title":"अमरस्वर","description":"\u003cp\u003eमाझे ६ वे पुस्तक ‘अमर स्वर’ वाचकांच्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे.\u003cbr\u003eमाणसाचे जीवन कुणाच्या तरी आदर्शानी फुलून यावे. काव्यमय प्रांतात मला थोर विशाल हृदयी अनेक माणसं भेटली. त्यांच्या भेटीने तृप्त झालो. अस्वस्थता वाट्याला आली नाही, की नैराश्य शिवले नाही. सदा न कदा समाधान, आनंद, निखळ\u003cbr\u003eहास्याचे क्षण वाट्याला आले. वास्तववादी क्षणांना सुख मानुन काही काळ कवटाळलेही म्हणून शब्दांच्या साम्राज्यात वावरणेही झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२०१६ पासून ‘उन्हं तापली रे’ या पहिल्या काव्यसंग्रहाने समाजात कवी म्हणून ओळख झाली. ‘पाखरा उड उड रे’ या काव्यसंग्रहाने मला एका विशिष्ट उंचीवर आणून ठेवले; ‘नांगरफाळ’, ‘चांदणवेडा’ नंतर श्री. डी. बी. पाटील या द्रष्ट्या\u003cbr\u003eव्यक्तिमत्त्वाविषयी ‘कीर्तीगंध’ हे पुस्तक स्वतः संपादित केले. ‘अमर स्वर’ याद्वारे जगविख्यात गायिका, गानसम्राज्ञी लतादिदींकरिता त्यांच्या अमरस्मृतींना मनोभावे नमन करण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात देशाकरिता हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांचे स्मरण म्हणून काही कविता या पुस्तकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना माझा हा प्रयत्न नक्कीच भावेल अशी मनोकामना व्यक्त करतो, वाचन संस्कृती वाढीस लागो या सदिच्छांसह…\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399934914789,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Amar-Swar-Kavyasangrah_Ramesh-J-Patil-1-198x300.jpg?v=1770881363"},{"product_id":"असहमति-के-रंग","title":"असहमति के रंग","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअशोक नामदेव पळवेकर की कविता अपने समकालीन सामाजिक-राजकीय वास्तव की एक प्रगल्भ कालसंहिता है|\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतीय समाज व्यवस्था में आज का वास्तव प्रस्तुत करते हुए यह कविता आसपास के साधारण मनुष्यों के जीने में तनावों के साथ ही समाज में निहित धार्मिक-जातिय असहिष्णुता, क्रौर्य, दहशत, पुरुष सत्ताक हिंस्रता और हाल के समय सत्ताधिशों के बर्ताव में सामाजिक-राजकीय पाखंड व मूलतत्त्ववादी विचार प्रणाली से फैलने वाला धार्मिक-साँस्कृतिक उन्माद, कट्टरवाद आदि के अत्यधिक प्रभाव में ध्वस्त हो रही जनतांत्रिक यंत्रणा के सामाजिक व मानवीय मूल्य, साथ ही सरमायादारी आक्रमकता, सत्ताशरण माध्यम-प्रशासन-न्याय यंत्रणा वग़ैरह के भिन्न-भिन्न वास्तव रूप भी अत्यंत उग्र व आक्रमक स्वरूप में अपनी स्वतंत्र शैली से अभिव्यक्त करती है|\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआंबेडकरवादी जीवन दृष्टि में संवेदनशीलता इस कविता का स्वभाव होते हुए विश्व मानवतावाद के व्यापक परिघ-केन्द्र से इस कविता की आँवल नाल जुड़ी हुई है| अतः यह कविता आसपास के मानवीय दुःख-प्रतीतियों से कतई सहजभाव से एकरूप होती है, और न्याय-अन्याय के कड़े संघर्ष में न्याय के पक्ष में अपनी निर्णायक भूमिका घोषित करती है| विवेकशील लड़ाकूपन इस कविता का एक महत्त्वपूर्ण पहलु होने से मानवीय स्तर पर विश्व संवेदना एवं जीवन एहसासों का ऐतिहासिक संचित इस कविता में अव्याहत प्रवाहित होते हुए दिखता है, और सामाजिक दुःख भान का एक करुणामय व विद्रोही दर्शन उस में प्रगल्भता से साकार होता है|\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइस कविता में तत्त्वचिंतन और समकालीन वास्तव का सारा ही भान ध्यान में रखते हुए यह कविता यानी अपने समकाल के सामाजिक-राजकीय पर्यावरण में अत्यंत कडुआ एवं गर्म रंग दर्शानेवाली भिन्न-भिन्न स्थिति गति के काल-कोलाहल का एक मौलिक धन है|\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399940714725,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Asahamti-Ke-Rang_Dr-Yuvaraj-Sontakke_cnvt-1-198x300.jpg?v=1770881528"},{"product_id":"एल्गार-वंचितांचा","title":"एल्गार वंचितांचा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराष्ट्रपतींच्या यादीत अनुसूचित 45 जमाती आहेत, त्यापैकी फक्त 12 जमातींना लाभ मिळतो; बाकी 33 जमाती या लाभांपासून वंचित असतात, त्या वंचित जमातींचा आक्रोश, विद्रोह या ‘एल्गार वंचितांचा’ या डॉ. प्रकाश सपकाळे यांच्या कवितासंग्रहात आविष्कृत झाला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे षडयंत्र आहे. आदिवासी कोळी जमातीच्या 4 गटांपैकी फक्त सोनकोळी गटाचा समावेश इतर मागासवर्गात असून कोळी ढोर- टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या तिन्ही गटातील आदिवासी कोळी यांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये आहे. तथापि त्यांना लाभांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले गेले आहे. आदिवासींनाच आदिवासींविरुद्ध उभे करून मुद्दाम संभ्रमाचे वातावरण केले गेले आहे. हलबा, ठाकूर, माना, गोवारी इ.33 जमाती अशा उपेक्षित राहिल्या आहेत. त्यांच्या भावना, संवेदना, विचार, विद्रोह प्रातिनिधिक स्वरूपात या काव्यसंग्रहात अविष्कृत केल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित या कवितांमध्ये वंचित जमातीतील कार्यकर्ते यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्याय, अत्याचार यांच्याविरुद्ध लढण्याचे बळ या कवितांमधून मिळते. संविधानिक व न्याय्य हक्कांसाठी लढण्याचे बळ मिळत आहे. संघटन वाढत आहे. स्फोटक अशा रसायनांचा जणू हा संग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘एल्गार वंचितांचा’ या काव्यसंग्रहातील विद्रोह अपूर्व असा आहे. हा वंचितांचा एल्गार माणुसकीचे शत्रू असणाऱ्या, अनुसूचित जमातींना वंचित ठेवणाऱ्या सर्व घटकांविरुद्ध आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400150659301,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Elgar_Dr-Prakash-Sapkale_cnvt-3-198x300.jpg?v=1770884451"},{"product_id":"आधार-नैराश्यात-हरवलेल्यांना","title":"आधार – नैराश्यात हरवलेल्यांना","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत काव्यसंग्रहात सुरुवातीच्या कविता दु:ख, नैराश्य, अपयश यांवर लिहिल्या असून सरतेशेवटी जीवनात घडलेल्या आध्यात्मिक परिवर्तनामुळे लेखिकेने जे काही अनुभवले ते सर्व कवितांच्या माध्यमातून शब्दबद्ध केले. या ग्रंथाच्या माध्यमातून हृदयातल्या भावना व्यक्त करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला आहे. काही कारणांमुळे मला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यावेळी सर्वांना जो अनुभव येतो तोच मलाही आला. आलेल्या अपयशाने मला जगाचा परिचय करवून दिला. जीवनामध्ये मला खूप यातनांमधून जावे लागले, पण अशातही अनेक वर्षे मी माझे मन स्थिर ठेवू शकले ते केवळ आध्यात्मिक ज्ञानामुळे आणि अखंड हरिनाम स्मरणामुळे… धैर्य, उत्साह व दृढनिश्चयाने मार्ग आक्रमिला… आणि म्हणूनच आज माझा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला असून नवनव्या कल्पना सतत सुचत असतात. त्यासंबंधीच्या कवितादेखील प्रस्तुत काव्यसंग्रहात वाचकांना आढळून येतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414023811301,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhar-Nairashyat-Harvalelyanna_Prof-Dr-Jayshri-Nemade_cnvt-1-198x300.jpg?v=1771054802"},{"product_id":"धगधगते-तळघर","title":"धगधगते तळघर","description":"\u003csection class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-53086b1d elementor-section-boxed elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"53740\" data-id=\"53086b1d\" data-element_type=\"section\" data-settings='{\"background_background\":\"classic\"}'\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-default\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-6cdf79b8 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"21327\" data-id=\"6cdf79b8\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003csection class=\"has_eae_slider elementor-section elementor-inner-section elementor-element elementor-element-7a4a7466 elementor-section-boxed elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"22146\" data-id=\"7a4a7466\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-default\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-inner-column elementor-element elementor-element-1548986d exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"45433\" data-id=\"1548986d\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-11913863 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-exad-exclusive-tabs\" data-id=\"11913863\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"exad-exclusive-tabs.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-tabs-11913863 exad-advance-tab exad-tab-horizontal exad-tab-align-center\" data-tabs=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content exad-tab-image-has-no exad-tab-image-left active\"\u003e\n\u003cdiv class=\"exad-advance-tab-content-element\"\u003e\n\u003cdiv data-elementor-type=\"section\" data-elementor-id=\"22834\" class=\"elementor elementor-22834 elementor-location-single\" data-elementor-post-type=\"elementor_library\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-699ff59e elementor-section-full_width elementor-hidden-tablet elementor-hidden-mobile_extra elementor-hidden-mobile elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"86205\" data-id=\"699ff59e\" data-element_type=\"section\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-444cebe5 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"43706\" data-id=\"444cebe5\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-20adbf0 exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-wl-single-product-short-description\" data-id=\"20adbf0\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"wl-single-product-short-description.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eकवयित्री उषा हिंगोणेकरांची कविता माणसाच्या सार्वभौम अस्तित्वाच्या निर्मितीसाठी निर्वाण मांडणारी कविता आहे. या कवितेत अनेक धगधगत्या संग्रामांची दृश्ये वाचकाला दिसतील आणि अनेक संग्रामांचे आवाजही वाचकाला ऐकायला येतील. ही कविता, कविता लिहिण्यासाठी वा उषा हिंगोणेकरांना कवयित्री करण्यासाठी लिहिली गेलेली नाही. ही कविता माणसांच्या स्वाभिमानाची, त्यांच्यातील सौहार्दाची आणि सलोख्याची प्रस्थापना करण्यासाठी लिहिली गेलेली आहे. या कवितेतील मूल्यदंड कुठेही वाकत नाही कारण तो माणुसकीच्या सत्याचा आणि सौंदर्याचा अजिंक्य मूल्यदंड आहे. सनातनी व्यवस्थेवर अंगार उधळणारी ही कविता जीवनातील सर्वच असत्यांनाही चौकात उभे करून फटकारे मारते. माणसाला विद्रूप करणार्या सर्व बंधनांचे जाहीर दहन ती करते. पुरुषसत्ताकावर, असत्यसत्ताकावर आणि दंभसत्ताकावर ती सरळ हल्ला चढवते. माणुसकीच्या प्रस्थापनेच्या मार्गात आडवे येणार्या सर्वच अवरोधांच्या चिंध्या ती करते. वाचकाला अशा मुक्त मनस्वीपणाचे पडघम या कवितेतून ऐकायला येतील आणि माणुसकीच्या प्रज्ञानी सौंदर्याशी जोडतील ही खात्री मला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. यशवंत मनोहर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-section elementor-top-section elementor-element elementor-element-4ebb518 elementor-section-content-middle elementor-section-stretched elementor-section-boxed elementor-section-height-default elementor-section-height-default exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"46813\" data-id=\"4ebb518\" data-element_type=\"section\" data-settings='{\"stretch_section\":\"section-stretched\"}'\u003e\n\u003cdiv class=\"elementor-container elementor-column-gap-no\"\u003e\n\u003cdiv class=\"has_eae_slider elementor-column elementor-col-100 elementor-top-column elementor-element elementor-element-7ada2e9 exad-glass-effect-no exad-sticky-section-no\" data-eae-slider=\"86167\" data-id=\"7ada2e9\" data-element_type=\"column\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-wrap elementor-element-populated\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-5c4318d elementor-widget-divider--view-line_text elementor-widget-divider--element-align-left elementor-widget__width-initial elementor-widget-tablet_extra__width-initial elementor-widget-tablet__width-initial elementor-widget-mobile_extra__width-initial elementor-widget-mobile__width-auto exad-sticky-section-no exad-glass-effect-no elementor-widget elementor-widget-divider\" data-id=\"5c4318d\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"divider.default\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-divider\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451868000485,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dhagadhagate-Talghar_Usha-Hingonekar_cnvt-1.jpg?v=1771592285"},{"product_id":"बा-तथागता","title":"बा, तथागता!","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453514821861,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ba-Tathagata_M-S-Pagare_HB_cnvt-1.jpg?v=1771658266"},{"product_id":"देवाचिये-द्वारी","title":"देवाचिये द्वारी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदेवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेंच देवाचें द्वार सुचविलें त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावांचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेले देवाचे द्वार आणि त्यांच्या हरिपाठाचे निरुपण वरनिर्देशित अर्थात सामावलेले आहेत. कवि प्रतीभारूप काव्यसाधना करत असतांना, आर्त अलौकिक प्रेमाने त्याची आळवणी करत असतांना देवाच्या दाराशी उभा असतो. त्याच इप्सित पूर्ण होण म्हणजे कविच वेिशरूप परमेेशराशी एकरूप होण; त्याच्या अनादिअनंत वेिशात मिसळून जाण होय. मायेच्या पसाऱ्यातून मुक्त होऊन परब्रह्म्याशी तादात्म्य पावण होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453515870437,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Devachiye-Dwari_Chandrashekhar-Kulkarni_cnvt-1.jpg?v=1771658423"},{"product_id":"दिव्य-तेजाची-आरती","title":"दिव्य तेजाची आरती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदिव्य तेज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर! त्याची आरती करणे म्हणजे त्याच्याच कृपेने प्राप्त झालेल्या प्रतिभेच्या सहाय्याने त्याच्याच गुणांचं गायन करण होय. दिव्य तेजाची जाणीव हाच साक्षात्कार; त्याच्या अस्तित्वाची प्रचिती, आणि कविता म्हणजे त्याला आळवण्याच माध्यम. पंचमहाभुतांनी मिळून सिद्ध झालेल्या कुडीतून पंचप्राणांनी घातलेली आर्त हाक आणि उन्मीलित अवस्थेतील आत्म्याचा उद्गार म्हणजे कविता. परमेश्वरच दिव्य तेज अरूप आणि इंद्रियातीत आहे, पण त्याचा कृपाप्रसाद म्हणजे अलौकिक बुद्धी सामर्थ्य, अभिव्यक्तीच्या कलेची जाण, सजगता, संवेदनशीलता, नेमकेपणाने काटेकोरपणे तोल सावरत व्यक्त होत जाण्याची हातोटी. अगदी प्रथितयश संपादन केलेल्या प्रतिभासंपन्न महान कविला देखील प्रतिभाप्रसाद नेहमीच सर्ववेळ सारख्याच प्रमाणात प्राप्त झालेला असेल असं नाही. प्रकाश आणि अंधाराचा खेळ तर सर्वच प्राणीमात्र नेहमीच अनुभवत असतात. बऱ्याचदा कविला काहीतरी दिसतं, जाणवतं, अस्वस्थ करतं पण व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. देणारा ईश्वर तर अनेक करांनी देतो पण आपले मानवीय दोनच कर असल्याने ते घेण्याची ताकद कमी पडते. कविला बऱ्याचदा जे जाणवतं, ते संदिग्ध आणि शब्दांच्या पलीकडचं असतं. अबोधाच्या पातळीवरची दिव्यत्वाची जाणीव शब्दरूप घ्यायला नाकारते आणि व्यक्त होईस्तोवर स्वस्थता देखील लाभू देत नाही. हा शब्दांचा खेळ जीवघेणा असतो. झालेली जाणीव शब्दांच्या सहाय्याने आकाराला येणं हा कसोटीचा क्षण असतो. प्रत्येक महान कविने हे क्षण अनुभवलेले असतात. पण जाणीवेला योग्य शब्दात न्याय मिळाला तर आईला बाळाच्या जन्मानंतर झालेल्या समाधान आणि आनंदाप्रमाणेच ही अनुभूती असते. म्हणूनच कोणतीही काळजाला भिडणारी, आनंद, दु:ख, आक्रोश, वेदना आणि मानवीय मनोव्यापार व्यक्त करणारी कविता ही तेजाने तेजाची गायलेली आरतीच असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453517410533,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Divya-Tejachi-Aarti_Chandrashekhar-Kulkarni_cnvt-3.jpg?v=1771658591"},{"product_id":"तुमच्या-आमच्या-कविता-संग्रहित","title":"तुमच्या-आमच्या कविता (संग्रहित)","description":"\u003cp\u003eसध्याचे जग हे अतिशय तीव्र स्पर्धेचे असून इंटरनेट, वॉट्सअप, फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या सामाजिक मिडीयांनी जोडलेले असून लोकांचे दैनंदिन जीवन फारच धावपळीचे झालेले आहे. त्यातच भर म्हणजे सध्या जगात कोविड-19 ह्या विषाणूच्या संसर्गाने फैलावलेल्या महामारीमुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय मिळणेही महाग होत चालले आहे. कुटूंबातील नाती बदलत आहेत. कुटूंबाचा आकार लहान होत चालला आहे. अशा अनेक सामाजिक समस्या असताना सुशिक्षित व्यक्तीने वाचन, लेखन करून ज्ञानसाधना केल्याने जीवनात थोडा विरंगुळा मिळेल असे मला प्रथमदर्शनी वाटते.\u003cbr\u003eप्रस्तुत कवितासंग्रहात चांगल्या मनाला भावतील व आवडतील अशाप्रकारच्या काही लेखकांच्या लेखणीतून साकारलेल्या तसेच निरनिराळी मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके तर काही वॉट्सअप व फेसबुक यांद्वारे वाचण्यात आलेल्या कवितांचा यात समावेश आहे. संबंधित कवितांना थोडा आकार देण्याचा प्रयत्न प्रस्तुत साहित्यकृती ‘तुमच्या-आमच्या कविता’ ह्या कवितासंग्रहात केलेला असून हा प्रयत्न तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458301505765,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tumchya-Aamchya-Kavita_Dr-Shatrughna-Patole_cnvt-1.jpg?v=1771849765"},{"product_id":"आयुष्याच्या-अर्ध्या-वाटेवर","title":"आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468292862181,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ayushyachya-Ardhya-Vatevar_cnvt-1.jpg?v=1771926247"},{"product_id":"चंद्राने-चांदणीला-विचारले-होते-कवितासंग्रह","title":"चंद्राने चांदणीला विचारले होते (कवितासंग्रह)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक कवितेमधील युवती विचार आणि विचारानेच समाजाचे वैचारीक जीवन समृद्ध करण्याचे ध्येय बाळगणारी आहे. तिला उच्च राहणीमान आणि गाडीबंगल्याचा सोस नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा असला म्हणजे पुरे, फालतु चंगळवादी जीवनशैली तिला नको आहे. समाजासाठी जगणार्या स्त्रीया का धरतील चंगळवादी जीवनशैलीचा सोस?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकविता क्रमांक ‘सात’ मधील शिवरंजनी वाचकांच्या मनावर आपला क्रांतिकारी विचारांचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही तसेच तिच्या हळव्या मनाची हळवी भावना वाचकांच्या हृदयावर आपली गुलाबी मोहोर उमटवेलच यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468293550309,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Chandrane-Chandnila-Vicharle-Hote_Pralhad-Khare_cnvt-1.jpg?v=1771926432"},{"product_id":"हिसका-महिलाकेंद्रित-कवितासंग्रह","title":"हिसका (महिलाकेंद्रित कवितासंग्रह)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘वेश्श्या’ जीवनावरची एकही कविता प्रस्तुत कवितासंग्रहात न आल्यामुळे मी वेश्श्या भगिनिनिंना त्रिवार सलाम करत त्यांची क्षमा मागतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकविता संग्रहात समाजातील विविध स्थरातील स्त्री जीवनाचे दर्शन घडविताना त्याच राहून गेल्याची चूक मी मान्य करतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेश्श्या देखील सन्माननिय ‘स्त्री’ असते, परंतु पुरुष तिला कुंटणखान्यावर नेऊन वेश्श्या बनवितो. ‘स्त्री’ने पुरुषाला जन्म द्यावा आणि पुरुषाने तिला वेश्श्या बनवून बाजारात उभी करावी असे शकडो वर्षांपासून चालत आलेले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेश्श्या भगिनिंच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील अनेक महननिय व्यक्ति आणि संस्था कार्यरत आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा करतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकविता क्रमांक ‘नऊ’ आणि ‘दहा’ अनुक्रमे ‘मालक उभा बांदाले’ आणि ‘मावेना त्यांच्या डोळ्यात’ ह्या राहून गेलेल्या आठवणी कवितारूपाने या पूर्वीच कवितासंग्रहात यायला पाहिजे होत्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468294959333,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Hisaka_Pralhad-Khare_cnvt-1.jpg?v=1771926617"},{"product_id":"कवितासंग्रह","title":"कवितासंग्रह","description":"\u003cp\u003eसंगिता धोटे यांचा ‘युगस्पंदन’ हा जवळपास सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारा संपादित काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे; त्याबद्दल संगिताचे अभिनंदन! महाराष्ट्रातील नानाविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कवी-कवीयित्रींना एकत्र आणून बांधण्याचे काम तिने ‘युगस्पंदन’च्या माध्यमातून केले आहे. निसर्ग, शेती, बलत्कार, बाप, हुंडाबळी, दुष्टप्रथा, मन, पाऊस, भारतमाता, वैधव्य, शेतकरी, पत्रकार यांसारखे विषय कवींच्या काव्यातून प्रामुख्याने अभिव्यक्त झाले आहे.\u003cbr\u003eस्त्रीवर्ग मोठ्या प्रमाणात साहित्याच्या प्रांतात भावनांना शब्दांच्या माध्यमातून मोकळा करीत आहे याची साक्ष या काव्यसंग्रहातून पटते. स्त्रीच्या दैनंदिन जगण्यातील बारकाव्यासोबतच तिचा जीवनसंघर्ष, शृंगार, लेकीचं नातं, बोहणी यांसारखे संवेदनशील विषय यामध्ये येतात. शिवाय पर्यावरण, गतकाळाच्या आठवणी, राजकारण, शब्दांचे श्रेष्ठत्व, शिक्षण आणि आदिवासींचे जगणे यांसारखे अनेक विषय यामध्ये आल्यामुळे काव्यसंग्रह वाचनिय बनला असे म्हणायला हरकत नाही.\u003cbr\u003eसंगिताच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. अनंता सूर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eYugsapandhan\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468380975333,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yugsapandhan_Sangita-Dhote_cnvt-1.jpg?v=1771930889"},{"product_id":"माती","title":"माती","description":"\u003cp\u003eजीवनात आईचे स्थान महत्वाचे आहे. ती दूध पाजून मोठे करते. संस्कार करते. तिचे ॠण फिटू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माती हीसुध्दा आईच्याच स्थानी आहे. शेतीत राबताना अनेक अनुभव आलेत. तिच्या कुशीत वाढलेली विविध पिके पाहून काव्य सुचले. कष्ट करताना अनुभव आलेत तेच या ठिकाणी मांडलेत. तिच्यामधून जे अन्नधान्य पिकले त्यावर शरीर, मन पोसले गेले. मातीने कवीला समृध्द केले. शेतीविषयी लळा लावला. जीवनाचा अंतही मातीतच होणार आहे. तिच्या कुशीतच विसावा मिळणार आहे. म्हणून तिच्याविषयीची कृतज्ञता मानून काव्यसंग्रहास ‘माती’ हे नाव दिले.\u003cbr\u003eबालपणापासून शेतकरी कुटूंबात येणारे अनुभव पाठीशी होते. तेच सगळे विचार काव्यातून व्यक्त केलेले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या व्यथा, दु:ख, ग्रामीण जीवन, ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती अतिशय सुंदर शब्दात येथे व्यक्त झाली आहे. कविवर्य ना.धों. महानोरांच्या शब्दांत –\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्यं येती अशी फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eMati Kavyasangrah\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470567911653,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mati-Kavyasangrah_cnvt-1.jpg?v=1772004468"},{"product_id":"सासर-माहेर","title":"सासर माहेर","description":"\u003cp\u003eखानदेशातील कवितेला बहिणाबाई चौधरीच्या अक्षर काव्याचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे जीवनातील तत्त्वज्ञान तेवढ्याच सहजतेने मांडणार्या कविता येथे निर्माण झाल्या. बहिणाबाईंच्या काव्याची सहजता आणि उत्कटता या कविंच्या काव्यातून प्रकट होताना दिसून येते. ‘सासर-माहेर’ हा कविता संग्रह त्या मानाने अनेक बाबतीत वेगळा आहे. एक तर कवयित्रीचे वय हे आज नव्वदच्या घरात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा कविता संग्रह ‘अहिराणी’ बोलीमध्ये आहे. मराठीच्या उपबोली पैकी अहिराणी ही मोठ्या प्रदेशात बोलली जाणारी बोली भाषा आहे. कवयित्रीने मात्र आपले विचारधन हे आपल्याच बोलीत मांडले आहे त्यामुळे अहिराणी भाषेतील गोडवा तर या काव्याला प्राप्त झालाच तसेच काव्याद्वारे या बोली प्रदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमीची जोडही दिली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्री ही समाजामध्ये अनेक रुपात वावरते, मुलगी, सून, आई, मैत्रिण, आजी ही परिचित असलेली स्त्रीरुपे. या रुपांच्या मागे कुठलीतरी वेदना कार्य करीत असते. या वेदना, अपेक्षांची ओझेही वाहत असते. परंतु वेदना कितीही असल्यातरी त्याचे प्रदर्शन मात्र करता येत नाही. ही स्त्रीरुपे पालटत असतात की एका वेदनेचे दुसर्या वेदनेत रुपांतर होत असते, हे समजणे जरा कठीणच असते. या पालटत जाणार्या स्त्री रुपाचे वर्णन कवयित्रीने या काव्याच्या माध्यमातून केले आहे. स्त्रीयांच्या वाट्याला येणारे दुय्यमत्त्व, तिची अगतिकता या काव्यात दिसून येते. परंतु जे विध्यात्याने लिहिले नशिबी या प्रमाणे या कविता प्रारब्दाच्या मार्गाने वळत नाही. तर प्रत्येकच कवितेतून एका स्त्रीचा स्वाभिमान डोकावताना दिसून येतो. या कवितेतील स्त्री स्वाभिमानाने आपल्या माहेरचे गोडवे गाते. तर तितक्याच समर्थपणे आपल्या संसाराचा आधार बनते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474877460709,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sasar-Maher_cnvt-1_e62deecd-4196-422f-9551-2b93126d080e.jpg?v=1772109975"},{"product_id":"मासा-काव्यसंग्रह","title":"मासा काव्यसंग्रह","description":"\u003cp\u003eवाचकहो,\u003cbr\u003eमंगल मैत्रीपूर्ण नमस्कार.\u003cbr\u003eमित्रांनो, शाब्दीक कल्पनांना काव्यरूपात मांडता येणे हा अनुभव किती छान असतो, याची प्रचिती एखादी कविता आपण स्वत: लिहील्याशिवाय येणार नाही. कविता म्हणजे मनातून प्रकट होणारा मेंदूपर्यंत पोहचून कागदावर उमटणारा घटकच जणू काही. शब्दांचे भांडार उघडून त्यातील निवडक शब्द उचलून जुळवाजुळव करतांना खूप अनुभव येत जातात. अशा अनेक अनुभवांची गाठोडी प्रत्येक कवीच्या पाठीवर असते.\u003cbr\u003eमोठमोठ्या लाटांनी खळखळत्या आवाजांसह एकच धांदल उडवून द्यावी आणि एखाद्या शांत झर्याने आवाज न करता आपला प्रवास सुरू ठेवावा अशा वातावरणातून कवितेचा उगम होतो.\u003cbr\u003e‘सुचलेल्या, स्फुरलेल्या,\u003cbr\u003eखूप काही दडलेल्या’\u003cbr\u003eअशा या माझ्या काही कवितांच्या कवितासंग्रहाने वाचकांच्या मनात नवीन प्रेरणा उत्पन्न करावी आणि त्यातून नव्या स्फूर्तीचा उगम व्हावा हाच या कवितासंंग्रहाचा हेतू आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– सुनिता अरविंद महाजन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477417537765,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Masa_cnvt-1.jpg?v=1772174762"},{"product_id":"चंद्रास्त","title":"चंद्रास्त","description":"\u003cp\u003e‘चंद्रास्त’ च्या रूपाने मराठीतील सामाजिक आशयाचं खंडकाव्य कवी प्र.श्रा.चौधरी यांनी लिहिलं. मराठी ग्रामीण कवितेत ‘चंद्रास्त’ खंडकाव्य मैलाचा दगड ठरलं आहे. मजुरांच्या जगण्यातील वास्तव चित्रण यात कवीने केलेले आहे. ग्रामीण जगण्यातील सुक्ष्मता यथार्थपणे टीपलेले असून गतिमान कथानक, लयदार मुक्तछंद, ओघवती भाषा, कथनपरता, चिंतनशीलता या काव्यगुणांमुळेच मराठी साहित्यविश्वातील अनेक दिग्गज साहित्यिकांनी ‘चंद्रास्त’ची दखल घेतलेली आहेच शिवाय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर वर्गाच्या अभ्याक्रमात समाविष्ठ केल्यामुळे नव्या पिढीतील अभ्यासकांना ‘चंद्रास्त’ या अभिजात कलाकृतीचा आस्वाद घेता येणार आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– शिरीष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477419929829,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Chandrast-Namdev-Koli-1.jpg?v=1772174917"},{"product_id":"उघड-कवाडे-तव-हृदयाची","title":"उघड कवाडे तव हृदयाची","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया संग्रहात एकूण 72 कविता संग्रहित केल्या असून त्यात प्रामुख्याने प्रेम आणि विरहाच्या काही कविता तसेच निसर्ग आणि मानव अशा स्वरुपाच्या कविता आहेत. काही कविता ग्रामवास्तव आणि ग्रामीण संस्कृतीच्या कुशीतून आलेल्या माती आणि नाती व्यक्त करणार्या आहेत. ‘गाव मन्हं बनगाव’ सारखी अहिराणी भाषेवरील प्रेमाची भावना व्यक्त करणारी कविताही त्यामध्ये आहे. अनौपचारिक शिक्षणाचा प्रभाव मान्य करणार्या संस्कार, बालपण, नैतिक मूल्ये, सणवत्सव आणि जीवनचिंतन करणार्या काही कविताही आढळतात. एकूणच विचार करता ‘स्यान्त : सुखाय’ भूमिका, निसर्ग-माणूस आणि समाजाच्या चिंतनाची ‘सामाजिक’ भूमिका अशा दोन्ही पातळ्यांवर लेखक-शिक्षकाचा पिंड या कवितेत वतरतो. तारुण्यातील लोकपरंपरा आणि सण, उत्सव, यात्रा, तमाशा लावणीच्या प्रभावाचे संस्कारातून प्रेम आणि शृंगारासह वीराणीतील मधुराभकतीचा आविष्कार या काव्यात आढळतो. अशा संमीश्र भावांची आणि काहीतरी अभिव्यक्त करु पाहणारी ही कविता आहे. कविच्या भावना, विचार, कल्पना आणि पूर्वसुरींच्या कवितेच्या संत्तकारात रमताना व्यक्त होणारी ही कविता आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477421830373,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ughad-Kavade-Tav-Hridyachi_1.jpg?v=1772175051"},{"product_id":"कथाविश्व","title":"कथाविश्व","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकथांची निवड करतांना सद्य ः कालीन जीवनाचे प्रश्न व मूल्यविवेक यांचा विचार केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘मानवता हे मूल्य जात, धर्म, पंथ, संप्रदाय, प्रदेश विशिष्टता यांच्या पलीकडे असलेले सर्वेच्च मूल्य आहे’ – हे वामन चोरघडे यांच्या ‘हादरा’ या कथेचे प्रमुख सूत्र आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘प्रसार माध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून घटनांचे वार्तांकन केले नाही तर एखादी क्षुल्लक घटना मोठ्या उद्रेकाचे कारण ठरु शकते.’ हे अरुण साधूंच्या ‘दंगा’ कथेतून सूचित केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘माणूस हा बुद्धीचं वरदान लाभलेला प्राणी आहे. पण बुद्धीच्या पाठीमागे भाव असावा की भोग? बुद्धीचा उपयोग भोगासाठी केला की माणसाचा पशू होतो’. हा रत्नाकर मतकरींच्या ‘एक माणूस आणि एक पशू’ या कथेचा आशय आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘केवळ देणं हाच ज्यांचा जीवनधर्म आहे; अशी माणसं जेव्हा स्वतःसाठी मागतात तेव्हा त्यांच मोठेपण संपून जातं.’ हे कल्पवृक्षाच्या रुपकातून विजया दिक्षित यांनी ‘एका झाडाची इच्छा’ या कथेतून मांडलेलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘श्रद्धा, लेाकश्रद्धा, अंधश्रद्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांचे संस्कार. बालसुलभ मनावर कसे कोरले जातात’ याचे प्रत्ययकारी दर्शन योगीराज वाघमारे यांच्या ‘गुडदाणी’ कथेतून घडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘वठलेलं झाड फुलवण्यासाठी कोवळ्या अंकुराचा बळी देणं कितपत संयुक्तिक आहे.’ हा प्रश्न ‘महात्मा’ कथेद्वारे लक्ष्मण लोढे यांनी उपस्थित केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘रोजा-एकादशी आणि भाकरी यांची कष्टकर्यांच्या वेदनेशी-जोडलेली नाळ’ संजीव गिरासे यांच्या ‘जकात’ कथेत दिसते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसारांश या कथा विद्यार्थ्यांना व वाचकांना व्यक्तीजीवन व समष्टीजीवनाचं उन्नयन करणार्या मूल्यांची ओळख करुन देतील. असा विश्वास वाटतो. कथेच्या रुपबंधाच्या अभ्यासाच्या जोडीने कथेतील चिरंतन मूल्यांचाही विचार व्हावा ही अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477431857381,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/prashant-cover-katha-vishwa_1.jpg?v=1772175241"},{"product_id":"काव्यसुधा","title":"काव्यसुधा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवाहरु सोनवणे, प्रकाश किनगावकर आणि अशोक कोतवाल हे खानदेशातील समकालिन कवितेचे महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर खानदेशासारख्या ग्रामीण आदिवासी बहुल भागात सामाजिक स्तरावर घडून आलेल्या स्थित्यंतरातून ह्या कवींच्या जाणिवांना अभिव्यक्त होण्यास संधी मिळाली. 1975-80 नंतर ओस पडलेल्या खेड्यांमधून शिकलेली तरुण मुले नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक झाली. हळुहळु ‘शहरी’ होत गेली. पण गावाशी, गावाच्या कृषीजीवनाशी असलेली नाळ मात्र त्यांना तोडता आली नाही. यातून वाट्यास आलेले दुभंगलेपण प्रकाश किनगावकरांच्या कवितेला प्रेरणा देणारे ठरले. ज्यांच्या घरातली पहिली पढिी शिक्षणाकडे वळू लागली आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडू लागली, अशा आदिवासी बांधवांना स्वतःची संस्कृती व जीवनविशेष शहरी संस्कृतीच्या झगमगाटात उपरे ठरत असल्याचे जाणवू लागले. स्वातंत्र्याचे लाभ व लोकशाहीची हमी यांपासून वंचित ठेवल्या गेलेल्या आणि शोषणव्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आदिवासींचा हुंकार वाहरु सोनवणे यांच्या कवितेतून प्रकट झाला. अशा संवेदनशील मनांची नागरी जीवनाच्या धबडग्यात होणारी घुसमट अशोक कोतवाल यांच्या कवितेतूनही आलेली आहे. आधुनिकीकरण व जागतिकीकरण या नावाखाली सुरु असलेले सामान्य माणसांचे अगतिकीकरण विशेषतः मूल्यर्हास व मानसिक पातळीवरील पडझड याचे सूक्ष्म व मार्मिक भान कोतवालांची कविता व्यक्त करते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477434544357,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/New-Kavyasudha-1.jpg?v=1772175779"},{"product_id":"काव्यधारा","title":"काव्यधारा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएखादी व्यक्ती कवी आहे; म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण ती कवितेतच जगते असे नाही, तर प्रतिभेचा झटका यावा आणि कविता लेखनाला प्रारंभ करावा, हा प्रारंभ रात्री अपरात्री, सकाळ, दुपार, सायंकाळी केव्हावी कुठेही असू शकतो किंवा होऊ शकतो. एकतानतेमधून निर्माण झालेला हा प्रारंभ कवितेच्या निर्मितीची अस्सलपणाची नांदीच दर्शवित असतो. कविता प्रारंभ होते तो क्षण ते कविता समारोपाचा क्षण येथपर्यंतच प्रत्येक कवी हा कवी असतो. नंतर त्याची कविता ही त्याची न राहता लोकांची बनून जाते; ज्यावेळी रसिक वाचकांच्याच अनुभवाचं, स्पंदनांचं आणि जीवनाशयाचं संगीत बनून जाते!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477438705893,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kavyadhara_1.jpg?v=1772175941"},{"product_id":"बिजवाई","title":"बिजवाई","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477482778853,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bijwai_Kailas-Sarvekar_FNL14-1.jpg?v=1772177636"},{"product_id":"मुक्ता","title":"मुक्ता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकफनातल्या कळीने सरणास विचारले माझ्या सोबत पेटशील काय? चिरतरुण काळाने नियतीस विचारले माझ्या सोबत चालशील काय? काळ, नियती, अन् सरणाच्या अभद्र युतीस कळी बोलली आटप लवकर! काळाच्या उदराचा. नियतीच्या फेर्यांचा हिशोब द्यायचाय मला जन्म आणि मरणाचा…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477487694053,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mukta_Gorpade_FNL2-front-1.jpg?v=1772177754"},{"product_id":"उपेक्षित-अनपेक्षित","title":"उपेक्षित अनपेक्षित","description":"\u003cp\u003eमाणसाचे सामाजिक जिवन व वैयक्तिक जिवन, माणसामाणसांतील सामाजिक स्तरामुळे वाढलेले अंतर, मजुर, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय व उच्चवर्ग यातूनच जगताना रोजची जिवघेणी स्पर्धा. कुठेतरी माणसामाणसांतील वाढलेली ईर्ष्या; त्यातून सामाजिक विषमता, जातपात, शहरी आणि ग्रामीण जिवनमान यातील अंतर अजून वाढतच गेले. ही सल कायम मनात घर करून होती. हे सारे डोळ्यासमोर ठेऊन ह्या कवितासंग्रहास ‘उपेक्षीत – अनपेक्षीत’ असे नाव दिले. त्या भावना अधोरेखीत करण्याचा हा लहानसा प्रयत्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. शिवाजी अहिरराव\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477490905317,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upekshit-Anpekshit-front-1.jpg?v=1772177871"},{"product_id":"बहिणाईची-गाणी","title":"बहिणाईची गाणी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकविता ही कवीला उपलब्ध असलेल्या जीवनावकाशाची अभिव्यक्ती असते. कौटुंबिक ते सामाजिक अशा विभिन्न स्तरांवरील भावभावना, संवेदना, विचार, अनुभव यांचे विश्व जीवनावकाशाला आकार देत असते. अशा जीवनावकाशाला अंत:करणात मुरवून शब्दबद्ध करण्यातून कवितेच्या निर्मितीला अवसर प्राप्त होत असतो. ही प्रक्रिया जितकी मौलिक तितकी कवितेतील काव्यात्मता खुलून येत असते. या निकषावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी साकारलेले काव्यविश्व अनोखे आहे. कृषिजनसंस्कृती, तिचे भरणपोषण करणारा निसर्ग, नातीगोती, सण-उत्सव, कष्टकर्यांच्या जगण्याची लय, गावगाडा या जीवनावकाशाच्या गाभ्याला अंत:करणात मुरवून शब्दांवाटे आपल्यापर्यंत पोहचविणारी ही कविता काव्यात्मतेचा उत्तुंग आविष्कार आहे. मानवी जीवनाला तोलून धरणार्या सचोटी, मेहनत, कर्तृत्व, जिव्हाळा, सुख-दु:खविषयक समभाव, सश्रद्ध वृत्तीचा स्वीकार-अंधश्रद्ध वृत्तीला नकार, साहचर्य भावना, धैर्य अशा आधुनिक मानवाच्या जगण्यातून हरपत गेलेल्या मूल्यभावाचा झरा अनेकवार आपल्या अंत:करणात पाझरविणारी ही कविता आहे. कविता आणि जगणे यांच्या अद्वैताचा हा अक्षय ठेवा अनेक पिढ्यांना पुरणारा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477493919973,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bahinabaichi-Gani_Bahinabai-Chaudhari_cnvt-1-1.jpg?v=1772177976"},{"product_id":"काव्यतरंग","title":"काव्यतरंग","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी समाज व्यवस्थेत अनेक प्रकारचे जगण्याचे दृष्टीकोन असतात. व्यवस्थेबद्दल काही बोलताना कवीची कविता ही व्यवस्थेशी निगडीत असलेल्या अनेक पैलूंमधून वाचकांसमोर येत असते. कवीच्या काव्यातील जाणिवांचा अपरिहार्य भाग काव्यरुपाने रसिक वाचकांसमोर येत असतो. त्यातून कवीचे भावविश्व व एकंदर परिस्थितीचे आकलन होताना दिसते. भोवतालच्या बदललेल्या वास्तवाचे केवळ वर्णन न करता कवी आजच्या माणसासमोरचे जगण्याचे प्रश्न टोकदारपणे मांडताना दिसतात. वाड्या-वस्त्या, ग्रामीण, निमशहरी, शहरी या परिसरातील मानवी जीवनाचे जगण्याचे ताणे-बाणे, अंतर्गत व बाह्य संघर्ष, कवींच्या लेखणीतून अपरिहार्यपणे येतात. भावनांनी ओथंबलेल्या कवी मनाचे अविष्कार विविध विषयांना थेटपणे भिडतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनव्या कवींकडे असलेली सर्जनात्मक प्रतिभा मानवी समाजव्यवस्थेला आस्वादात्मक पातळीवर कशा प्रकारे आकृष्ट करते यावर त्या कवीच्या कवितेचे मूल्यमापन होते. या कसोटीवर खानदेशच्या कवींनी लिहिलेल्या कविता एक नव्या दिशेकडे नेणार्या आहेत हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477497655525,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kavyatarang-Book-Cover-front-1.jpg?v=1772178106"},{"product_id":"भावतरंग","title":"भावतरंग","description":"\u003cp\u003eश्री. पं. ना. दादांच्या एकूणच पद्य लेखनाकडे पाहता त्यांच्यातला शिक्षक आणि लोकशिक्षक शेवटपर्यन्त मनी हृदयी ठाण मांडून बसतो. सेवानिवृत्तीनंतर ‘आता उरलो उपकारा पुरता’ या उक्तीचे सारतत्व त्यांच्या लेखनकृतीतून गडद होतांना दिसते. बर्याचदा नवकवींमध्ये अनुकरणप्रियता स्वलेखनातून प्रकर्षाने जाणवते. पं. ना. दादांच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य म्हणून जी नोंद आवर्जून करता येईल ती म्हणजे त्यांच्या कोणत्याही रचनेत दुसर्या इतरेजनांचे अनुकरण नाहीय. त्यांच्या सगळ्या पद्यावर त्यांचीच मुद्रा उमटलेली दिसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआत्मपरीक्षण व आत्ममग्नता या दोन घटकांना त्यांनी लेखनमूळाशी स्थित केलेले बर्याच कवितांमध्ये दिसून येते. वर्तमानाची मानसिकता तिचे ग्रासलेपण त्यातून होणारी नितीमूल्यांची पडझड यामुळे कवी वारंवार विषण्ण होतो. प्रसंगी उपहास व उपरोध या भाषिक शस्त्रांचा आधार घेत त्यांचे कवीमन त्या त्या विकृतीला व विकोपाला चांगलेच धारेवर धरते. त्यांच्या भावनांचं हे विरेचन त्यांच्यातल्या सकारात्मकतेचं दर्शन तर घडवितातच शिवाय संस्कृतीरक्षणार्थ त्यांची होणारी मनस्वी तगमगही वाचक मनातून भरून वाहते. हे पं. ना. दादांच्या लेखनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– वा. ना. आंधळे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477502931173,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhavtarang_FNL2_14_cnvt-1.jpg?v=1772178270"},{"product_id":"दगडी-खांबांचे-आकाश","title":"दगडी खांबांचे आकाश","description":"\u003cp\u003e“…मी आईची वाट पहात बसे ओसरीत पारावर मुले खेळत असत…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e…तसाच शब्दांचीही वाट पहात बसतो मी त्यांची येण्याची चाहूल लागल्यावर ते येतात ओळीत शिस्तशीर बसतात अजाणपणे मला कळत नाही की, मी त्यांची वाट पहात होतो कधी अन् ते आले कधी तरी मी त्यांच्यावर माझे ओझे का लादले आहे अन् त्यांच्या भरवशावर माझी सावली अजूनही उन्हातान्हात का स्पष्टपणे उमटून आहे’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक भुते आहेत अंत:करणात वस्ती करून हलता हलत नाहीत ती ती शब्दांना काजळून टाकतात झापड पडल्याला झाडे जशी झाकोळून जातात सत्याचे भूत मला ओढू पहाते मी सरतो मागेमागे\u003cbr\u003eमाझ्या मनात तिकडे जावेसे वाटले तरी धजावत नाही माझे मन आई मला वाढून देत असे भाकरी अन् माझी भूक वाढत असे जास्तच पोट भरल्यानंतरही ताटात उरत असे भाकर कोरभर तसे सत्याचे भूत उरते अंत:करणात…’\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477506568421,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Dagdi-Khambanche-Akash14-front-1.jpg?v=1772178408"},{"product_id":"कपाळावर-कोरलेले-कवितेचे-जखमी-सूर्य","title":"कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य","description":"\u003cp\u003e“…बांधावर बसलेले बैल, पेरणीविना गवताने मातलेले शेत, हंगाम सरतांना उदास झालेली पाखरें यात कुठून आली दाणे नसलेली कणसे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचरतांना अचानक उधळलेल्या गाई नदी किनारी घागरी भरणार्या पोरी अभंग सरल्यानंतरही ऐकू येत असलेले टाळ यात कोठून आले प्रार्थना म्हणतांना चुकलेले पोर?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडोळ्यांसमोर जळत असलेले घर हताश होवून पहाणारी आई राख विझल्यानंतरही डोळ्यात दाटलेला धूर यात कोठून आली विधवा होवून परतलेली लेक?…”\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477509288165,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kapalawar-Korlele-Kaviteche-Jakhami-Surya-front-1.jpg?v=1772178533"},{"product_id":"अनुभूती","title":"अनुभूती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिक्षकात कवी असणं यांस मी अहोभाग्य समजतो. कारण शिक्षकाला रंजन आणि प्रबोधन या दोन्ही वाटा एकाच वेळी समृद्ध करीत विद्यार्थी वर्गाचं संगोपन, संवर्धन करावं लागतं. या ध्यासाला जतन करीत जे आतून येतं. आणि शब्दरुप होतं. याचा एक आगळा आनंद असतो. यालाच साहित्यात ‘स्वानंदासाठी’ केलेले लेखन असेही संबोधले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसरांनी प्रस्तुत संग्रहातून ज्या ज्या भावनांना वाट करुन दिलीय. त्या वाटेवर सुख-दुःखाच्या दाहक वास्तवाबरोबर अंतरीच्या घावांसह केलेली ‘शल्य’ चिकित्सा वाचकाची अस्वस्थता वाढविणारी ाहे. कवीच्या दुःखाशी संवादी होतांना तो स्वतःच्या दुःखाची कवी दुःखाशी तुलना करीत स्वतःचे दुःख शितल करतो. येथेच कवीचे आणि कवितेचे यश दडलेले असते. म्हणूनच सृजन म्हणजे मानवी मनाच्या तळाशी असणार्या जखमांना सावरणारी निसर्गदत्त देणगीच वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477511745765,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anubhuti-Kavitasangrah3_cnvt-1.jpg?v=1772178670"},{"product_id":"फर्मान-आणि-इतर-कविता","title":"फर्मान आणि इतर कविता","description":"\u003cp\u003eनिर्दोष समाज चिंतन, मानवी जीवनाचे सूक्ष्म आकलन आणि निरीक्षण, सौंदर्यवेधी कल्पनाविलासाची पेरणी करणारी अस्सल आणि अव्वल प्रतिभा, कृषी संस्कृती आणि ग्रामीणत्व यांच्या संस्कारातून संस्कारित झालेले प्रांजवळ मोकळे चाकळे मन, प्रतिकुलतेच्या भोगलेपणातून आकारास आलेले संयमित समृद्ध व्यक्तिमत्व, अभिजात कळा जाणीव, अर्थपूर्ण वेचक नावीन्यपूर्ण शब्दांची काव्यात्मक पखरण, अनेक परिमाणे लाभलेली चिंतनात्मक काव्य प्रवृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रा. वा. ना. आंधळे यांची ‘फर्मान आणि इतर कविता’ मधील कविता खानदेशचा भूगोल ओलांडून आणि शतकांचे बंध बाद करुन मराठीतील सर्व प्रवाहातील अस्सल चिंतनाच्या आणि जाणिवांच्या कलात्मक कवितेशी नाते सांगते. म्हणनच सौंदर्यवेधी सत्याचा वारसा सांगणार्या नव्या काव्य प्रवाहाची ती सांस्कृतिक नांदी ठरते. वानांच्या लेखणीला असाच बहर येवो, ही मनःपूर्वक सदिच्दा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477515415781,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Farman-Aani-Etar-Kavita-Front-1.jpg?v=1772178814"},{"product_id":"हत्ती-गेला-सुमाच्या-घरी","title":"हत्ती गेला सुमाच्या घरी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकवी प्रल्हाद खरे यांनी आपल्या छोट्याशा काव्यसंग्रहातून जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. गावात पाणी मिळत नाही… सांडपाणी आडवावे, झाडाला घालावे यातला भाव बाळबोध असेल पण तळमळ मात्र फार मोठी आहे. येनकेन प्रकारे निसर्ग, घर हे सारे काही काळजात जपून ठेवावे व त्यांना वाढवावे ही कवीची भावना अतिशय मौलिक आहे. कवीच्या हृदयातून येणारी तळमळ भावी पिएीला तारणारी आहे. आ जागतिकीकरणात जगभरातले देश अस्वस्थतेचे जीणं जगताहेत. आपला देशही याला अपवाद नाही. लहान मुलांनी हसावं, खेळावं, हुंदडावं, मुक्तपणे समाज जीवनात आनंद भरुन टाकावा असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. मात्र दुर्दैवाने आम्ही या मुलांसाठी कोणत्या जगाची निर्मिती करत आहोत? दिवसेंदिवस असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आहे, ही अत्यंत घातक बाब कुटुंबव्यवस्थेला व समाजाला उद्ध्वस्त करणारी आहे. मुलांसाठी कवी पहात असलेली सुंदर स्वप्नं साकार करण्याची जबाबदारी समाजातील सर्वच संवेदनशील घटकांवर आहे याचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477519347941,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Hatti-Gela-Sonuchya-Ghari-Front-1.jpg?v=1772179054"},{"product_id":"झोका","title":"झोका","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचार्य डॉ. बापूराव देसाई यांना अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती इत्यादी भाषा अवगत असून त्यांचे आजपर्यंत अहिराणी भाषेत 22, मराठीत 23, हिंदीत 75, अनुवादीत 19 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या जवळपास 139 इतकी आहे. प्राचार्य डॉ. बापूराव देसाई यांनी विविध कार्यांमध्येही सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. त्यांनी विविध मानांकित उच्च पदावरील पदेही सन्मानाने भूषविलेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार देखील वेळोवेळी प्राप्त झाले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसद्यस्थितीत त्यांची ‘करनी तशी भरनी’ हि अहिराणी कादंबरी प्रकाशित होत आहे. सदरील अहिराणी कादंबरीला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्कृष्ट शुभेच्छारूपी प्रस्तावना देखील लिहून दिल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ‘करनी तशी भरनी’ हि अहिराणी कादंबरी निश्चितच आपल्याला आवडेल यात तिळमात्र शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477523902693,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Zoka_Dr-Rajani-Lungse_cnvt-1.jpg?v=1772179238"},{"product_id":"दर्द-ए-दिल-से","title":"दर्द ए दिल से","description":"\u003cp\u003eकुछ ख्वाईशैं दिल मे रह जाती हैं.. कुछ बिन मांगे मिल जाती हैं ..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुछ छोड़ कर चले गये.. कुछ नये जुड़ेंगे इस सफर मे ..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुछ मुझसे बहुत खफा हैं..  कुछ मुझसे बहुत खुश हैं..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुछ मुझे मिल के भूल गये.. कुछ मुझे आज भी याद करते, हैं..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुछ शायद अनजान हैं.. कुछ बहोत परेशान हैं..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुछ को मेरा इंतजार हैं .. कुछ का मुझे इंतजार है..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुछ सही है, कुछ गलत भी है. कोई गलती हो तो माफ कीजिये और\u003cbr\u003eकुछ अच्छा लगे तो याद कीजीये…\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477526032613,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Darde-Dil-Se-Shayari_cnvt-1.jpg?v=1772179398"},{"product_id":"खैरलांजी-भीमा-कोरेगांववरील-हल्ला-आणि-इतर-कविता","title":"खैरलांजी, भीमा-कोरेगांववरील हल्ला आणि इतर कविता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविद्रोह, आकांत, आक्रोश, उद्रेक, विध्वंस, या शब्दांशी परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा जवळचा संबंध आहे. वरकरणी हे शब्द अतिरंजित भाव प्रकटीकरण दर्शक जरी वाटत असले तरी उपेक्षितांच्या व वंचितांच्या वाट्याला आलेल्या वेदना प्रखरतेने मांडण्यासाठी याच शब्दांनी मोलाची भूमिका निभावली आहे. हेच शब्द कवी भरत शिरसाठ यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी साथ देतात. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतून मानवी जीवनातील हा संघर्ष सातत्याने मांडला गेला आहे. परिवर्तनवादी साहित्य हे भावनात्मक स्वत्व, अभित्व आणि स्वाभिमान यासाठी झुंजणारे साहित्य आहे. रंजन-मनोरंजन हा परिवर्तनवादी चळवळीचा उद्देश नाही. संत चोखा, संत कबीर, संत रवीदास यांपासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबांपर्यंतच्या बहुजनवादी संतांनी आपल्या वाणीने लोकांना जागृत केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधानाच्या रुपाने आमच्या हातात मानवमुक्तीची हुकमी चाबी दिली आहे. तरीही आजदेखील अन्याय हा शब्द येथील उपेक्षितांच्या जगण्याशी चिकटलेलाच आहे. ते एक तप्त वास्तव आहे. म्हणून संवेदनशिल मनाचे कवी प्रा. भरत शिरसाठ यांच्या काव्यसंग्रहातून खैरलांजीचं जळतं सरण आम्हाला पहायला मिळत आहे. जातीजातींमधील पेटलेल्या वास्तवांचे विस्तव स्वतंत्र चुलीत धगधगताां आज आम्ही बघत आहोत. ही धग कधी शमेल, हा एक मोठा प्रश्न आहे. बहुजनांच्या अनुपरिवर्तनासाठी ही विझणारी धग एक क्रांतीगीत असणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477527310565,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khairlaji-Bhima-Koregaon-1.jpg?v=1772179571"},{"product_id":"काव्यांकुर","title":"काव्यांकुर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“…प्रीतिभावना, निसर्गजाणीव, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभावना ही मराठी कवितेतून सातत्याने आणि प्रत्ययकारीपणे आविष्कृत होणारी प्रधान आशयसूत्रे आहेत. त्यांचा आविष्कार करणार्या प्रातिनिधिक अशा निवडक कवितांचा समावेश सदर संपादनात केलेला आहे. अर्थातच या निवडीच्या केंद्रस्थानी कवी नसून कविता आहेत. विशिष्ट आशयसूत्र प्रभावीपणे व्यक्त करणारी प्रथितयश, प्रख्यात कवीची रचना असे या कवितांच्या निवडीमागील सूत्र आहे… कविता निवडताना त्या निरनिराळ्या कालखंडातील महत्त्वाच्या कवींच्या कविता असाव्यात याचे भान राखलेले आहे. एका प्रधान आशयसूत्राचे भिन्न भिन्न पैलू वा कंगोरे व्यक्त करणार्या कविता निवडाव्यात ही बाबही संपादन करताना आवर्जून लक्षात घेतलेली आहे… पदवीच्या प्रथम वर्षात शिकणार्या मुलांना कविता या साहित्यप्रकाराचा परिचय करुन देताना त्यांच्या भावनिक आणि वैचारिक विश्वाचे भरणपोषण करणार्या कविता या संपादनात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत… म्हणूनच कविता आणि जीवन या दोहोंची समज विकसित करणारे अंकुर विद्यार्थ्यांच्या मनातून फुलून यावेत ह्या अपेक्षेने हे संपादन सादर करीत आहोत…”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477549920485,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kavyankur_cnvt-1.jpg?v=1772180570"},{"product_id":"तृषार्त-तृप्त","title":"तृषार्त – तृप्त","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकविता म्हणजे स्वानुभूतीचे भोगलेले शब्द! हे शब्दच भावना, विचारांनी आणि आत्मगत कल्पनांनी भारले की त्यांच्या ओळी होतात. काही तरी सुख-दु:खाच्या गोष्टी सांगायची उर्मी प्रकट झाली की ती शब्दातून अर्थपूर्ण उतरते. उत्तर आयुष्यात सेवानिवृत्तीनंतर या भावना अधिक गडद होत जातात. मागच्या आठवणींचा बांध फुटून भळभळ वाहू लागतो. त्या स्मृतींची पाने चाळता चाळता सभोवतालचा समाज, निसर्ग, माणसे आणि काळ यांचा ऋणानुबंध कसा विणला गेला याचे प्रत्यंतर अभिव्यक्त करण्याची जागा म्हणजे कवी दत्तात्रय कडू लोहार (द्वारकासुत) यांच्या दृष्टीने ‘कविता’ असते. अंतरीचे बोल शब्दात प्रकट होताना पूर्व संस्कार आणि शिक्षक म्हणून जोपासलेल्या सर्व प्रक्रियांची अनुभूती सहजपणे मांडून व्यक्त होणार्या या कविता आहेत. पूर्वायुष्यातील कष्ट, वेदना, दु:ख तसेच जीवनाकडे पाहण्याची आशादायी दृष्टी आता उत्तरार्धात कशी तृप्त, संपन्न होत गेली त्या आठवणींच्या ह्या कविता आहेत. आत्मगत अशा स्वनिष्ठेच्या आणि संस्कारित अशा समाजनिष्ठेच्या जाणिवांच्या कविता म्हणजे अनुभूतीचे बोल म्हटले पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477551132901,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tushart-Trupta_cnvt-1.jpg?v=1772180672"},{"product_id":"तावडी-माटी","title":"तावडी माटी","description":"\u003cp\u003eतावडी माटी’तल्या कविता या प्रेम, पत्निप्रेम, मातृत्व, निसर्गाची विविध रूपे, धर्म-अध्यात्म-प्रबोधन, सद्यकालीन राजकारण व सामाजिक परिवर्तने तसेच संकीर्ण अशा विविधतेने नटलेली आहे. प्रेमकवितेतील नायिकेच्या धीटपणाचा अनुबंध हालाच्या ‘गाथा सत्तसई’तील नायिकांशी जाणवतो तसा आदिबंधाशीही वाटतो. सृजनशील अनिमा विविध रूपात अविष्कृत होत विभ्रमातून अविष्कृत होत अनिमसला निर्मितीला प्रेरणा देण्यास भुलवत मातृत्वाचे सुख भोगते. यातील निसर्गप्रतिमांचे सौंदर्य अपूर्व आहे. स्त्रियांच्या अनेक रूपांचे दर्शन या कवितेतून होते. निसर्गाच्या विविध रूपांचे परिणामकारक चित्रण, माणुसकी हाच धर्म आणि त्याचे आचरण करणारा तोच खरा संत, बाकी स्वतःचे स्तोम माजवून शोषण करणारे अध्यात्माच्या टपर्या चालविणारे स्वघोषित परमपूज्य हे दांभिक असून त्यापासून सावध राहण्याचे कवीने केलेले आवाहन, राजकारणामुळे भावाभावात पडलेली फूट व बायकोच राजकारणी नवर्याच्या महत्त्वाकांक्षेचं झालेलं साधन, भ्रष्टाचार, बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक-सामाजिक प्रश्न आणि आत्महत्या न करण्याचे आवाहन अशी अनेक परिमाणे या कवितेत आहेत.\u003cbr\u003eकवीची भावात्मक समाजाभिमुखता, आशावाद, तावडी माटीविषयीचा अभिमान सर्वत्र अविष्कृत होतो. हा अविष्कार संतसाहित्य व लोकसाहित्याने अंगिकारलेल्या अष्टाक्षरी ओवीतून केला आहे. या माटीची देशीयता आणि कवीची आत्मनिष्ठा ही जीवनमूल्येच या कवितेची वाङ्मयमूल्ये होत. साहित्य अकादमीने ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या प्रकल्पांतर्गत प्रकाशित केलेल्या ‘बहिणाबाई चौधरी’ या पुस्तकाचे लेखक, भाषाविज्ञान व व्याकरण यावर विशेष प्रभुत्व असलेले कवी प्रकाश सपकाळे यांनी या कविता खानदेशी तावडी बोलीत केल्या आहेत. या बोलीची ओळख त्यांच्या बहिणाईची गाणीची निर्मितिप्रक्रिया संवेदनशीलतेने उलगणार्या ‘खोप्यामधी खोपा’ या कादंबरीतून तसेच ‘बहिणाईची गाणी’मधून रसिक वाचकांना झालेली आहे. तावडी बोलीचे सौंदर्य आणि सामर्थ्य यांचा प्रत्यय या कवितासंग्रहातून येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्राचार्य डॉ. रा. गो. चवरे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477680632037,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tavdi-Mati_cnvt-1.jpg?v=1772184750"},{"product_id":"पंचनामा","title":"पंचनामा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477883269349,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Panchanama_Prof-Pradip-Patil_cnvt-1.jpg?v=1772192342"},{"product_id":"मनाच्या-बनामंधी","title":"मनाच्या बनामंधी","description":"\u003cp\u003eशीतल पाटील यांचा हा पहिलाच कवितासंग्रह मोठ्या आत्मविश्वासाने खान्देशी मराठी कवितेत पदार्पण करीत आहे. ‘मायभूमी अन् मायबोली दोन्ही जुळ्या बहिनी’ असे अभिमानाने सांगणाऱ्या ह्या कविता बहिणाबाई चौधरी परंपरेतला एक देखणा प्रयोग वाटला. मराठीच्या बोलींमध्ये दडलेले शब्दभांडार किती समृद्ध आहे, याची प्रचीती ह्या कविता वाचणाऱ्यांना प्रकर्षाने जाणवेल. आमच्या पिढीला त्या वेळच्या रटाळ प्रेमकविता लिहिणाऱ्या कवयित्रींनी उबग आणला होता. आता शीतल पाटील सारख्या शेतकऱ्याच्या मुलींनी मोठीच क्रांती करून आपल्या मातीतले वेल्हाळ देशीपण दाखवायला लागल्यापासून इंग्रजीच्या वापराने आणि शहरीकरणाने बुडायला घातलेल्या मराठी भाषेचे ऐश्वर्य टिकवून धरले आहे. ‘सुखदुःखाची घागर ज्याच्या त्याच्या पाठीवर’ अशा कष्टकऱ्यांच्या प्रतिमांनी आणि ह्या आधी प्रमाणभाषेत कधीही न आलेल्या खान्देशी बोलीतील शैलीप्रयोगांनी ह्या संग्रहातली प्रत्येक कविता देखणी झाली आहे. बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या झाल्या कृत्रिम पद्यरचना करणाऱ्या तेव्हाच्या कवींना बांगड्या भरायला लावल्या. आता तशा कवयित्री आणखी वाढतील आणि मराठी कविता अधिकाधिक मातृधर्मी होईल अशी चिन्हे ह्या कवितांमध्ये दिसू लागली आहेत, ही उत्साहवर्धक प्रगती आहे. शीतल पाटील सर्वत्र वाचल्या जावोत, ही शुभेच्छा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– भालचंद्र नेमाडे,\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमुंबई\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477999694053,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manachya-Banamadhi_Shital-Patil_cnvt-1.jpg?v=1772196865"},{"product_id":"आठवणींच्या-हिंदोळ्यावर","title":"आठवणींच्या हिंदोळ्यावर","description":"\u003cp\u003eप्रगतीची चाके लावून चार पावले चालून आल्यावर पदरी निवांतपण पडलं की, आठवणींना जाग येते. त्याही स्वयंकेंद्रित झालेल्या असतात एव्हाना. आयुष्याच्या पटावर विखुरलेल्या सुखांच्या सोबत वावरतांना उसासे टाकायची कला अवगत करून घेतलेली असते त्यांनीही. समाधानाच्या दोनचार चांदण्या अंगणी चमकू लागल्या की, झगमगाटात आयुष्याचे एकेक कोपरे उजळल्यासारखे वाटतात. स्वयंघोषित प्रगती अन् स्वयंनिर्णित शहाणपण दिमतीला असलं की, काळाचे कोपरे कारण नसताना कोरले जातात. पटलाआड दडलेल्या कवडशांचा धांडोळा घेतला जातो. असतं तेव्हा नाहीच मोल वाटत असलेल्या गोष्टींचं. नसल्या की, त्यांचं महत्त्व वाढू लागतं अन् सुरु होतो हरवलेपण शोधण्याचा प्रयत्न.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478014800101,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Athavaninchya-Hindolyavar_Chandrakant-Chavhan_cnvt-1.jpg?v=1772198001"},{"product_id":"असहमतीचे-रंग","title":"असहमतीचे रंग","description":"\u003cp\u003eअशोक नामदेव पळवेकर यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक-राजकीय वास्तवाची एक प्रगल्भ कालसंहिता आहे.\u003cbr\u003eभारतीय समाजव्यवस्थेतील आजचे वास्तव मांडताना ही कविता सभोवतालच्या सामान्य माणसांच्या जगण्यातील ताण-तणावांसोबतच समाजातील धार्मिक-जातीय असहिष्णुता, क्रौर्य, दहशत, पुरुषसत्ताक हिंस्रता आणि अलीकडच्या काळातील सत्ताधीशांच्या वर्तनातील सामाजिक-राजकीय पाखंड व मूलतत्त्ववादी विचारसरणीतून फोफावत जाणारा धार्मिक-सांस्कृतिक उन्माद व कट्टरतावाद इत्यादींच्या आत्यंतिक प्रभावाखाली उद्ध्वस्त होत जाणारी लोकशाही यंत्रणेतील सामाजिक व मानवी मूल्ये; तसेच भांडवली आक्रमकता, सत्ताशरण माध्यमे-प्रशासन-न्याययंत्रणा वगैरेंची वेगवेगळी वास्तवरुपेही अत्यंत उग्र व आक्रमक स्वरुपात आपल्या स्वतंत्र शैलीने अभिव्यक्त करते.\u003cbr\u003eआंबेडकरवादी जीवनदृष्टीतील संवेद्यता ही या कवितेची प्रकृती असून विश्वमानवतावादाच्या व्यापक परिघ-केंद्राशी या कवितेची नाळ जुळलेली आहे. त्यामुळेच ही कविता सभोवतालच्या मानवी दुःखजाणिवांशी अगदी सहजीभावाने एकरुप होते; आणि न्याय-अन्यायाच्या टोकदार संघर्षात न्यायाच्या बाजूने आपली निर्णायक भूमिका जाहीर करते. विवेकशील लढवय्येपण हा या कवितेचा एक महत्त्वाचा पैलू असल्याने मानव्यपातळीवरील विश्वसंवेदना व जीवनजाणिवांचे ऐतिहासिक संचित या कवितेतून अव्याहतपणे प्रवाहित होताना दिसते; आणि सामाजिक दुःख जाणिवेचे एक कारुण्यमय व विद्रोही दर्शन त्यातून प्रगल्भपणे साकार होते.\u003cbr\u003eया कवितेतील तत्त्वचिंतन आणि समकालीन वास्तवाचे एकूणच भान लक्षात घेता ही कविता म्हणजे आपल्या समकाळाच्या सामाजिक-राजकीय पर्यावरणातील अत्यंत कडवट व उष्ण रंग दर्शविणाऱ्या वेगवेगळ्या स्थितिगतीच्या कालकल्लोळाचा एक मौलिक ऐवज आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAsahmatiche Rang\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478019191013,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Asahmatiche-Rang-Ashok-Palavekar_cnvt-1.jpg?v=1772198124"},{"product_id":"जावे-गुंफित-अक्षरे","title":"जावे गुंफित अक्षरे","description":"\u003cp\u003eकवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) हे एक निरागस, निगर्वी, अतिसंवेदनशील असं साधंभोळं तद्वतच श्रद्धाळू व्यक्तिमत्त्व आहे. खेडेगावात जन्मलेल्या आणि तिथेच आपलं बालपण व्यतीत केलेल्या कवयित्रीने ग्रामीण जीवनाशी आपली बांधिलकी जपली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना, सालोसाल नापिकी याचा त्यांच्या नेणीवेत खोलवर उमटलेला ठसा, त्या शहरात आल्यावरही पुसला गेला नाही.\u003cbr\u003eमुळात ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतरित झालेल्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला आता गाव राहिलं नाही! तिकडचा निसर्ग, तिथलं जीवन, एकमेकांना धरून चालणारी तिथली माणसं, गावभर लहरणारी मायेची झुळुक या साऱ्यांना अलीकडची पिढी पारखी झाली आहे. खेडेगावातील माणुसकीच्या पंगती शहरातून उठताना दिसत नाहीत; हे बदलतं वास्तवही कवयित्रींनी शब्दातून मांडलं आहे. आपल्या बोलीभाषेतून जीवनाचं तत्त्वज्ञान सोपं करून सांगणाऱ्या खानदेशातील बहिणाबाईंच्या लेकींची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. त्यांचं आत्मभान जागृत होत, त्या आपल्या मातीशी इमान राखत सकस लेखन करू लागल्या आहेत, ही लेवागणबोली आणि एकूणच मराठी भाषेसाठी जमेची बाजू आहे.\u003cbr\u003eआनंदाच्या भ्रामक कल्पना गोंजारत, संवेदना लोप पावत चालल्याच्या वर्तमानात, माणसातलं माणूसपण हरवत चालल्याच्या काळात माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करत ही कवयित्री शब्दधन पेरीत चालली आहे. ‘सारी एकाच धरतीची लेकरं’ असं मानणाऱ्या, समतेची भावना जोपासत माणसं जोडणाऱ्या, ‘भावनेचा होता गुंता – कविता होऊन सोडवितो’ असं म्हणणाऱ्या ‘जावे गुंफित अक्षरे’ हा कवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) यांचा पहिलावहिला कवितासंग्रह तमाम मराठी वाचकांना भावेल असाच आहे.\u003cbr\u003eआजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंगांची अंतर्मनात सातत्याने नोंद घेत त्यांना शब्दरूप देत साकारलेल्या या कवितासंग्रहाची साहित्यविश्वानं निश्चितच दखल घ्यावी, अशी कवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) यांची काव्यप्रतिभा आहे. त्यांना मनापासून सदिच्छा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. किसन वराडे, अंबरनाथ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication.","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479715426533,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jave-Gunfit-Akshare_Sau-Sandhya-Bhole_cnvt-1.jpg?v=1772258759"},{"product_id":"तान्हूले-तू-आलीस-खरी","title":"तान्हूले तू आलीस खरी","description":"\u003cp\u003eकवी शशिकांत बारी हे एक बहुआयामी कवी आहेत. भारतातील पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्रीच्या मार्गात असंख्य काटे पेरलेले आहेत. भारतीय संविधानाने स्रीला स्वातंत्र्य दिले. परंतु येथील सद्यस्थितीत समाज व्यवस्था ते स्वीकारायला तयार नाही. स्रीयांच्या याच प्रश्नांनी कवी व्यथित झालेले दिसतात. बेभरोसा पावसामुळे शेतकऱ्यांची स्वप्नं उद्ध्वस्त होवून ते सावकारीचा फास गळ्यात टाकतात. एक संवेदनशील बापही त्यांच्या शब्दांमधून डोकावतांना दिसतो. कवीची नजर चौफेर फिरत आहे. समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर ते चिंतन करीत आहेत. कवी शशिकांत यांच्या कवितेत बहुजन मुक्तीची आस आहे. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीप्रति प्रचंड निष्ठा आहे. त्यांच्या मनात येथील उपेक्षितांना न्याय देण्याची तळमळ आहे. त्याच तळमळीतून त्यांचा हा कवितासंग्रह एल्गार करतो. जवळपास अडतीस कविता असलेल्या काव्यसंग्रहात मुक्त छंदातील रचना अधिक आहेत. चळवळीच्या विषयांव्यतिरिक्त प्रेमाच्या काही कविताही या संग्रहात पाहायला मिळतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. भरत आ. शिरसाठ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479791317221,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tanhule-Tu-Aalis-Khari_Shashi-Bari_cnvt-1.jpg?v=1772266825"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9.oembed?page=5","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}