Your cart is empty now.
भारतीय समाजाच्या विकासाचा विचार करताना महिलांची भूमिका आणि त्यांची सामाजिक स्थिती हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. भारताची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक रचना यामध्ये महिलांना कधी “गृहलक्ष्मी”, “जननी” आणि “शक्तीचे प्रतीक” म्हणून गौरवण्यात आले, तर काही काळात त्यांना दुय्यम स्थानही दिले गेले. त्यामुळे भारतीय महिलांची स्थिती समजून घेताना पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून तिचा विचार करणे आवश्यक ठरते. या पुस्तकामध्ये भारतीय महिलांची पारंपरिक आणि आधुनिक स्थिती, त्यांच्या भूमिका, सामाजिक प्रश्न, आरोग्यविषयक समस्या, कामाच्या ठिकाणच्या अडचणी, उपेक्षित महिलांचे प्रश्न आणि महिला सक्षमीकरणाचे विविध पैलू यांचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि समाजातील सर्व घटकांना महिलांच्या समस्यांची जाणीव होऊन त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिलांचा सन्मान, समानता आणि सशक्त सहभाग अत्यावश्यक आहे. “महिला सशक्त तर समाज सशक्त” ही जाणीव प्रत्येकाने मनात ठेवून अधिक समतावादी आणि प्रगत समाज घडविण्याचा प्रयत्न करणे.