Your cart is empty now.
प्रस्तुत पाठ्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी मिळते. तसेच या समाजशास्त्रज्ञांचे कार्य केवळ शैक्षणिक दृष्टीनेच नव्हे, तर राष्ट्रभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचे प्रतीक म्हणून समोर येते. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, चिकित्सक विचारशक्ती आणि सामाजिक वास्तवाचे भान विकसित होते.
आजच्या बदलत्या सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक संदर्भात जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूल्ये, जसे की सामाजिक समता, लोकशाही, सहअस्तित्व, बंधुता आणि न्याय यांची रुजवणूक या अभ्यासक्रमातून प्रभावीपणे होते. त्यामुळे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या अध्ययनप्रक्रियेला दिशा देणारा, त्यांच्या ज्ञानकक्षेचा विस्तार करणारा व समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित करणारा आहे. त्या दृष्टीने भारतीय सामाजिक विचारवंत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैचारिक विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल,