Your cart is empty now.
'खानदेश कथाप्रबोध' या कथात्मक संपादनाचा बी.ए. प्रथम वर्षासाठी समावेश करण्यात येत आहे. खानदेशला साहित्याची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. विविध वाड्मयप्रकारात खानदेशी साहित्यिकांनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्याअनुषंगाने पदवी स्तराच्या पहिल्या वर्षासाठी खानदेशच्या मातीतील कथानकांची ओळख महत्त्वपूर्ण ठरावी.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये विकसनशीलता आणू पाहते. आकलन क्षमतेसह कौशल्ये निर्माण व्हावीत यासाठी आणि सर्जनशीलतेतून सृजनशीलता फुलून यावी म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंवादी राहण्याचा मराठी अभ्यासमंडळाचा हा प्रभावी प्रयोग आहे.
खानदेशच्या मातीतील कथा ह्या आशयघन आहेत. त्यांना बहुआयामी सांस्कृतिक संदर्भ असलेले आढळतात. त्या सांस्कृतिक संदर्भाचा अमिट ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर उमटावा आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाड्मय क्षेत्रामध्ये निर्मितीसाठी प्रेरणाकारक ठरावी; त्यामुळे खानदेशातील महत्त्वपूर्ण कथाकारांच्या एकूण बारा कथांचा समावेश अभ्यासक्रमातील या संपादित ग्रंथात करण्यात आलेला आहे.