Your cart is empty now.
शैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानसशास्त्र अभ्यास मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेषत्वाने ज्या नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आदींचा सविस्तरपणे उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे बदल हा विश्वाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून सातत्याने प्रवाही राहणे नवनवीन बाबींचा स्वीकार करणे ह्या विचारसरणीला अनुसरुन या पुस्तकात संशोधनातून प्राप्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यातही काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा त्रुटी आपल्या निदर्शनास आल्यास मला अधिकारवाणीने लेखी किंवा तोंडी स्वरूपात दिल्यास त्यांचे मी स्वागतच करेन यामध्ये जे काही चांगले योग्य निर्माण झाले, याचे सर्व श्रेय वाचकांचेच असेल.
विद्यार्थीकेंद्रीत पुस्तक होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने पुस्तकाची भाषा सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भारतीय मानसशास्त्रातील अभ्यासकांच्या द्वारे प्राप्त माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये किती यशस्वी झालो हे वाचकांनीच ठरवावे.