Your cart is empty now.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक 'अ' श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक सूचनांनुसार द्वितीय वर्ष कला स्तर-५.० या वर्गातील अर्थशास्त्र हा विषय विशेष प्राविण्यासह व विशेष प्राविण्यासह संशोधन (With Honours and Honours with Research) या आधारावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) व्ही. एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रो. (डॉ.) एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्रो. (डॉ.) जगदीश पाटील (मानव्यविद्याशाखा), प्रो. (डॉ.) अनिलजी डोंगरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने केली आहे. सामान्य स्तरावरील हा विषय मायनर म्हणून MIN-2 Eco 224 सत्र-IV साठी १९९१ पासुनची "भारतीय अर्थव्यवस्था" (Indian Economy Since-1991) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी २ श्रेयांक (क्रेडिट) निर्धारित करण्यात आलेले असून एकूण मूल्यांकन ५० गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मूल्यांकन २० गुणांचे व बहिस्थ मूल्यांकन ३० गुणांचे करण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने १९९१ पासून नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार करून भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणाचा भाग बनली.