Your cart is empty now.
सद्य:स्थितीत फार मोठ्या प्रमाणात ताणतणाव, चिंता, भीती, आसक्ती वाढत आहे. त्यामुळे सुख, समाधान मानवी मनापासून दुरावल्या गेले आहे, मानसिक समस्या वाढत आहे त्यामुळे शारीरीक समस्या निर्माण होत आहे. व्यक्तीची जसजसी दमछाक व कोंडी होत आहे तसतसा व्यक्ती केंद्रित होत आहे. त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग व्यक्ती चोखाळतांना दिसतो, यासाठी सामान्य व्यक्तीलाही ‘मानसशास्त्र’ हा विषय सद्यास्थितीत महत्वाचा, वरदानच ठरत आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणांमध्ये प्रत्येक घटक हा व्यवस्थित व साजेश्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यातून विद्यार्थ्यांना व सामान्य व्यक्तीला सुद्धा या पुस्तकातील सर्वच संकल्पना स्पष्ट होतील व जीवन उपयोगी ठरतीलच.