Your cart is empty now.
युद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षा ही काही केवळ सैन्याचीच जबाबदारी नसून ती देशाच्या सर्व नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आणि मूलभूत कर्तव्य आहे. मानसशास्त्रीय व आर्थिक युद्धामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शत्रूच्या लढण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण करावयाचे असते. तर आण्विक-रासायनिक आणि जैविक युद्धामध्ये संपूर्ण मानवी संस्कृती नष्ट होण्याची क्षमता असून हे अत्यंत अमानवीय असे आहे. भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि संरक्षण व सुरक्षा याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी देशाच्या संरक्षणविषयी जागरूक असणे खूप गरजेचे असून विद्यार्थ्यांनी युद्ध, संघर्षांची कारणे आणि परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पनांचे अध्ययन केल्याने त्यांना युद्धांचे गंभीरपणे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे सोपे जाईल.