Your cart is empty now.
भारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्मांच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धर्म नेहमी अंधविश्वास, मतांधता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशाी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविषयी मला प्रेम व आदर असल्यामुळे पार लौकिक जीवनाविषयी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.
धर्मांमुळे जर राष्ट्रा-राष्ट्रात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.