Your cart is empty now.
प्राचीन भारताची संस्कृती ही परंपरा, शिक्षण व साहित्याच्या वैविध्यामुळे आकारास आली आहे. प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ग्रामीण भागातूनच मोठ्या प्रमाणात जोपासली गेली आहे. म. गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र देवून ग्रामीण भागात रुढी, परंपरा जोपासण्याबरोबर खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षणामुळे साहित्याची निर्मिती होण्यास मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण साहित्याची निर्मिती वाढली असून नव्याने लिहाणारे तरुण आपल्या परिसरातल्या, आपल्या गावातल्या, कुटूंबातील माणसांच्या व्यथा वेदना, विविध समस्या आणि जगण्यासाठी त्यांना घ्याव्या लागणार्या संघर्षाचे चित्रण आपल्या लेखनातून करत आहे. ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचे कारण शोधत असतांना एक गोष्ट लक्षात येते. समाजजीवनातील साचलेपणा समाज आणि साहित्य भाषा आणि जीवन, भाषा, समाज, संस्कृती यांची अतुट अस नातं असतं. समाजाचे प्रतिबिंब शब्दांच्या माध्यमातून साहित्यात चित्रित होत असते. त्या दृष्टिने ग्रामीण समाजाचा अभ्यास व्हावा यासाठी या पुस्तकात त्यांच्या परंपरा, शिक्षण व साहित्य याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.