Your cart is empty now.
मराठ्यांचा इतिहास हा महाराष्ट्राची अस्मिता आहे. या राज्याचा उदय कसा झाला आणि त्याचा विस्तार हा केंद्रबिंदु मानून या ग्रंथाची रचना केली आहे. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे आणि शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण हे सर्व लक्षात घेवून हा ग्रंथ सिध्द केला आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याचा पाया तर घातलाच परंतु मराठा राज्य टिकले पाहिजे याचीही त्यांनी काळजी घेतली औरंगजेबासारखा बलाढ्य मोगल राजा की जो उमलते मराठ्यांचे राज्य कुस्करून टाकण्यासाठी अधीर झाला होता पण त्यालाही छत्रपती शिवाजी महाराज हे पुरून उरले. त्यासाठी त्यांनी जिंकलेल्या राज्याची नीट घडी बसविली. प्रशासनात एकात्मता आणली. सामाजिक जीवनात स्थैर्य यावे म्हणून त्यांनी अनेक कुरूढीवर हल्ला चढविला जाति भेदाला वाव दिला नाही. वतनदार हे राज्याचे शत्रूच होत असा अनुभव घेवून त्यांनी नवीन वतने देणे बंद केले. स्त्रीयांचा सन्मान केला. त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा राज्याचा इतिहास म्हणजे हा ग्रंथ होय. तो सर्वांना उपयुक्त ठरेल या आशेने हे मनोगत पूर्ण करतो.