• जीवन कौशल्य शिक्षण

    जीवनकौशल्ये ही प्रत्येक मानवाची गरज आहे. त्यातून आपल्या क्षमतांची जाणीव होते. तसेच आपल्या जीवनातील अपयशासाठी इतरांना दोषी ठरविले जात नाही. कारण प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याची क्षमता यातून विकसित होते. सर्जनशील विचारांची शृंखला निर्माण होते. वैयक्तीक जीवनात समायोजन क्षमता वाढून बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जीवन कौशल्यांमधून विविध मानसिक क्षमतांचा विकास नकळतपणे होतो. सकारात्मकता वाढीस लागते. आधुनिकीकरणाने भारावलेल्या समाजाला जीवनकौशल्ये शिक्षणाची आवश्यकता आहे. शालेय स्तरावर जीवनकौशल्य शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रस्तुत पुस्तकात जीवन कौशल्ये शिक्षणाचे स्वरूप संकल्पना सोबतच थकज ने पुरस्कृत केलेल्या दहा गाभाभूत जीवनकौशल्यांचे विवेचन केलेले आहे. आंतरवैयक्तीक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबाची भूमिका नेहमीच महत्वाची आहे. परंतु आज कुटुंबातील सदस्यदेखील एकमेकांपासून दुरावत आहे. विद्यार्थीदशेतच ही बाब समजणे व त्यात सुधारणा आवश्यक आहे. तणाव आणि भावना यावरील नियंत्रण राखणे आज गरजेचे आहे. जीवन कौशल्यांचे शिक्षण यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच विद्यार्थीदशेत जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला काय करता येईल यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Jeevan Kaushaly Shikshan

    175.00
    Add to cart
  • जीवन कौशल्ये

    Jivan Kaushalya

    275.00
    Add to cart
  • दूरसंवेदन आणि जागतिक स्थान निश्चिती प्रकल्प अहवाल

    दूर संवेदन हे तंत्रज्ञान संगणक व अवकाश विज्ञानातील एक प्रभावी असे तंत्र आहे. पहिल्या महायुद्धानंतर हवाई छायाचित्रापासून सुुरुवात झालेल्या या तंत्राचा वापर आज शेती, खाणकाम, संरक्षण, बांधकाम, सर्वेक्षण, हेरगिरी, खाजगी उद्योग अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज उपग्रहाच्या मदतीने सगळ्या पृथ्वीचे व इतर ग्रहांचे, अवकाशातील तार्‍यांचे सेकंद आणि सेकंद चित्रण सुरू आहे. त्यातून भरपूर माहितीचे संकलन होत आहे.
    दूर संवेदन तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा होणारा मोठ्या प्रमाणावरील उपयोग यासाठी हे तंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे आहे. यासाठी या प्रगत तंत्रज्ञानाची मराठी भाषेतून ओळख करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे.
    दूर संवेदन या विषयाचा अभ्यास करणार्‍या आमच्या विद्यार्थी मित्रांना व अभ्यासकांना या पुस्तकाचा निश्चितपणे उपयोग होईल अशी आशा आहे.

    Dursanvedan

    125.00
    Add to cart
  • नागरी सेवा आणि सुशासन

    भारतात नागरीसेवेचा (लोकसेवा) विकास वा प्रारंभ प्राचीनकाळी झालेले पहावयास मिळते. ज्याचे वर्गीकरण प्राचीनकाळ, राजपूतकाळ, सल्तनत काळ, मूगलकाळ, ब्रिटीशकाळ, स्वातंत्रोत्तर काळात झालेले आढळते. सन 1919 ते 1947 पर्यंंतच्या कालावधीत केंद्रिय सचिवालयातील बदल वा जडणघडण विशेष महत्वाचे होते. ब्रिटीश शासन कालखंडात प्रशासनिक व्यवस्थेचे महत्व लक्षात घेऊन लोकसेवेची स्थापना करण्यात आली. लोकप्रशासन मध्ये कर्मचारी हे मुख्य तत्व आहेत. नागरी सेवा म्हणजे नोकरशाही या अर्थानेही ही संकल्पना परिचित आहे. जर्मन तत्ववेत्ता ‘मॅक्सवेबर’ या प्रशासकीय अभ्यासकाने ‘नोकरशाही’ ही संकल्पना उपयोगात आणली. धोरणे आणि प्रशासन या संदर्भात नागरी सेवेची भूमिकाही खुप महत्वाची असते. तसेच जागतिकीकरणात विशेषतः 1990 नंतर सु-शासन ही संकल्पना अध्ययनाद्वारे चर्चेत आली. सु-शासन ही संकल्पना मानव समुदायाच्या हिताशी वा विकासाशी संबंधित आहे. ती एक बहुआयामी प्रक्रिया सुध्दा आहे. आजच्या परिप्रेक्ष्यात बहुतांश राष्ट्रांनी या संकल्पनेचा स्विकार हा स्वच्छेने व स्वंयप्रेरणेने केले आहे.

    Nagari Seva and Sushasan

    275.00
    Add to cart
  • निर्णयनासाठी वित्तीय व्यवस्थापन

    निर्णयनासाठी वित्तीय व्यवस्थापन या पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे. ‌‘वित्तीय व्यवस्थापन’ हा शब्द दोन शब्द ‌‘वित्तीय’ आणि ‌‘व्यवस्थापन’ ह्या शब्दांनी बनला आहे. ‌‘वित्तीय’ शब्दाचा अर्थ हा धन प्राप्तीच्या साधनांना एकत्रित करणे तथा व्यवसायाच्या मौद्रिक आवश्यकतांचे पूर्वानुमान करणे. त्याचे आधारावर ह्या साधनांचे वितरण करणे असा आहे. तर ‌‘व्यवस्थापन’ शब्दाचा अभिप्राय हा एखाद्या संस्थेचे उद्देश प्राप्त करण्यासाठी मानवीय क्रिया आणि भौतिक संसाधनांचे नियोजन, संगठन, समन्वय आणि निर्णय ह्यांच्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे ‌‘वित्तीय व्यवस्थापन’ ही व्यावसायिक व्यवस्थापनाची ती शाखा आहे जी संस्थेच्या वित्तीय संसाधनांचे नियोजन आणि नियंत्रणाच्या संबंधित आहे अर्थात वित्त कार्याचे व्यवस्थापन.
    आधुनिक विचारधारेनुसार वित्तीय व्यवस्थापनाला सामान्य व्यवस्थापनाचेच एक अभिन्न असे मानले जाते. वस्तूत: ते सामान्य व्यवस्थापनाच्या कार्यात्मक क्षेत्राचे स्वरूप आहे. उत्पादन व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, सेवावर्गीय व्यवस्थापनाप्रमाणेच वित्तीय व्यवस्थापन हे कार्यात्मक व्यवस्थापनाच्या श्रेणीत येते. सामान्यत: वित्तीय व्यवस्थापनाचा आशय हा वित्तीय नियोजन, वित्त प्राप्ती, संपत्ती व्यवस्थापन तसेच विविध वित्तीय क्षेत्रात संतुलन स्थापित करणे असा आहे. ह्यात पुंजी, रोख प्रवाह, प्रत्याय, मूल्य आणि लाभ निती, निष्पत्ती नियोजन आणि मूल्यांकन तथा आयव्ययक नियंत्रण निती आणि प्रणाली यांचा समावेश होतो. प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    175.00
    Add to cart
  • निवडक दलित एकांकिका : एक चिंतन

    दलित रंगभूमीला सशक्त, संपन्न आणि प्रयोगक्षम बनविणारे संवेदनशील नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी संपादित केलेल्या ‘मराठी दलित एकांकिका’ यावरील परिचयात्मक लेखन म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. शाळा, महाविद्यालय, शासन व विविध संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणार्‍या अनेक स्पर्धांमधून ‘एकांकिका’ जनसामान्यांपर्यंत पोहचली. तरुणाईचा तर जिव्हाळ्याचा विषय झाली. ‘एकांकिका’ हा शिकण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वत:ला घडवून घेण्याचा कला प्रकार आहे. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा आग्रह धरीत मराठी दलित एकांकिकांची निर्मिती झाली.
    प्रस्तुत पुस्तकातील एकांकिकांचा अभ्यास करताना, समीक्षा करताना नाट्य वाङ्मयाच्या सर्व प्रकारच्या आकृतिबंधांना जाणीवपूर्वक महत्त्व दिले, त्याचप्रमाणे विषय आणि तंत्र दृष्ट्याही दिलेले महत्त्व लक्षणीय असेच आहे. समीक्षेच्या अंगाने किचकट करण्यापेक्षा एकांकिकांचे सहज, सोप्या पद्धतीने आकलन होईल अशाच पद्धतीने प्रस्तुत पुस्तकाची प्रामाणिक मांडणी केलेली आहे. मानवी मनाच्या समृद्धीसाठी, वाङ्मयीन परिघाच्या विस्तारण्यासाठी तसेच वाङ्मयाभिरुचीच्या समृद्धीसाठी सदर पुस्तक बहुमूल्य ठरेल यात शंका नाही.

    Nivadak Dalit Ekankika : Samiksha

    150.00
    Add to cart
  • निवडणूक व्यवस्थापन

    निवडणुका हा लोकशाही गाभा आहे. लोकशाहीचा डोलारा निवडणुकीवर आधारलेला आहे. निवडणुका शांतता आणि योग्य मार्गांने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते. निवडणुका योग्य, पारदर्शी आणि लोकशाही मार्गांने पार पाडल्या नाहीत तर अयोग्य प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता आहे. निवडणुकाच्या माध्यमातून अपेक्षित राजकीय बदल वा परिवर्तन घडवून आणता येते. आधुनिक काळात निवडणूक प्रक्रियेत अनेक तांत्रिक गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. 1990 ते 1996 या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टी.एन. शेषन यांची कारकिर्द विशेष गाजली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्गांना दूर केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. परिणाम त्यांचे व राजकीय पक्षांचे वारंवार खटके उडाले. सद्यकाळात राजकीय पक्षांनी देखील निवडणूक आचारसंहिता व सुधारणांना मान्यता प्रदान केलेली आहे.

    सदरील पुस्तकात निवडणूक व्यवस्थापनाशी निगडित सर्व संकल्पनांचा यथायोग्य आढावा घेवून निवडणूक प्रक्रिया संबंधित सर्व घटकांचा साकल्याने विचार केलेला आहे. पुस्तकातील एकूण चार प्रकरणात अनुक्रमे निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व घटक, निवडणूक प्रक्रिया आणि प्रचारासाठी संबंधित माहिती आणि निवडणुकीसंबंधित मतदान प्रक्रिया आणि राजकीय सहभाग इ. माहितीचा समावेश असून प्रस्तुत पुस्तकलेखनातून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासकांना निवडणूक व्यवस्थापनातील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल यात शंका नाही.

    Nivadnuk Vyavsthapan

    185.00
    Add to cart
  • परिचयात्मक अर्थशास्त्र

    मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचं अध्ययन करण्याचं महत्त्वाचं कार्य अर्थशास्त्र करते. ही मानवी वर्तणूक उपभोक्ते, उत्पादक, वितरक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. त्यांचे कार्य अर्थव्यवसथेला गतिमान करणार ठरते. यातून अर्थशास्त्रीय ज्ञानशाखा उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण यांचे सैद्धांतिक विश्लेषण करतात. यासाठी रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्रीय अभ्यास शाखांचे दोन भागात विभाजन केले आहे. (1) सूक्ष्मलक्षी अध्ययन (2) समग्रलक्षी अध्ययन. हे विभाजन आर्थिक विकासाची धोरणे निश्चित करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या दोन्ही अभ्यासशाखांच्या आधारावरच ‌‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या क्रमिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांची व त्यांची व्यावहारिक प्रासंगिकता कशी महत्त्वपूर्ण आहे याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्यात अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी, त्याला आपल्या भविष्याला आकार देता यावा व सामान्य माणसांच्या आर्थिक प्रश्नांची त्याच्यात समज निर्माण व्हावी, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने धडपड करावी हा प्रयत्न आहे.
    म्हणून या पुस्तकात मागणी, पुरवठा, रोजगार, पैसा, आधुनिक बँकींग, व्यापार, सरकारचे उत्पन्न-खर्च, आर्थिक विकास, नियोजन आयोग, निति आयोग, व्यावसायिक जीवनातील सांख्यिकीचे योगदान, या संकल्पनांची त्याला ओळख होण्यास मदत होईल. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.

    Parichyatmak Arathashastra

    395.00
    Add to cart
  • पर्यटन भूगोल

    पर्यटन भूगोल ही मानवी भूगोलाची अतिशय नाविन्यपूर्ण अशी शाखा आहे. 1950 च्या दशकापर्यत पर्यटन भूगोलाला स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणून स्विकारले गेले होते. संयुक्त संस्थाने व जर्मनीतील वैज्ञानिक कार्यात पर्यटन भूगोलाचे अभ्यास क्षेत्र आधोरेखित केले गेले. भूगोल तज्ञांनी नव्या क्षेत्रांचा अभ्यास करुन पर्यटन भूगोलाची अचूकता सुधारण्यास मदत केली. सध्याच्या काळातील ‘पर्यटन’ हा शब्द प्रयोग 13 व्या शतकापासून प्रचलित झाला.
    पर्यटनासाठी पर्यटक हा महत्वाचा केंद्र बिंदू आहे. पर्यटन हा मानवाचा अत्याधुनिक आर्थिक व्यवसाय असुन तो फार झपाट्याने विकसित होत आहे. पर्यटन व्यवसाय पर्यावरणाशी संबधित आहे. पर्यावरण व त्यातील बदल मानवाचे आर्थिक व्यवहार व साधनसंपत्ती त्याचे स्थळ व काळ संदर्भातील अध्ययन भूगोलशास्त्रात केले जाते. त्यातूनच पर्यटन भूगोल हि शाखा निर्माण झाली.

    प्रस्तुत पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख, पर्यटनात आधुनिक आणि पर्यटन प्रकार, पर्यटनाचे परिणाम, भारतातील पर्यटन, कोकणातील पर्यटन विकास, खान्देशातील पर्यटन विकास, गुजरात राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्रातील गड किल्ले इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केल्याने सर्वांसाठी ते उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

    Paryatan Bhugol

    275.00
    Add to cart
  • पर्यटन भूगोल

    ‌‘पर्यटन भूगोल’ या पुस्तकाच्या माध्यमातून पर्यटन भूगोलाचे महत्त्व विविध अंगांनी समजून घेता येईल त्यात जगातील विविध स्थानांची भौगोलिक स्थिती, वैशिष्ट्ये, आणि पर्यावरणीय परिस्थिती. पर्यटन क्षेत्राचा विकास केल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना, रोजगाराची संधी आणि त्यामुळे स्थानिक व्यवसायांना मिळणारे प्रोत्साहन. पर्यटनामुळे स्थानिक संस्कृती, परंपरा आणि कला यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होते, कारण पर्यटक स्थानिक सांस्कृतिक आकर्षणांचा अनुभव घेतात. याचबरोबर पर्यटन भूगोलामुळे विविध देशांमधील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होते, ज्यामुळे जागतिक संबंध समजून घेण्यास मदत होते. याशिवाय पर्यटन भूगोलातील अभ्यासाने पर्यटन स्थळांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होते, ज्यामुळे पर्यटन स्थळे सुरक्षित आणि आकर्षक राहतात. या सर्व कारणांमुळे पर्यटन भूगोलाचे महत्त्व व्यापक पातळीवर फायद्याचे ठरते.
    पर्यटन भूगोल या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध विवेचन सोप्या भाषेत केले असून हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक यांनाच उपयुक्त नसून समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त आहे.

    140.00
    Add to cart
  • पर्यावरण अभ्यास

    21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरण अभ्यास या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
    मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
    पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.

    235.00
    Add to cart
  • पर्यावरण भूगोल

    Paryavaran Bhugol

    175.00
    Add to cart
  • पर्यावरण भूगोल

    मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याची स्वयंचलित व स्वनियंत्रित यंत्रणा निसर्गाजवळ आहे. परंतु अलीकडच्या काळात निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे असंतुलन निर्माण झाले. त्यातून अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्यात. ह्या पर्यावरणीय समस्या विश्वव्यापी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळेच 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या जागतिक परिषदेत पर्यावरणीय समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली व तेव्हापासूनच जगातील सर्व देशांचे लक्ष ह्या जागतिक समस्येकडे वेधले गेले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक असल्याची जाण प्रत्येक राष्ट्र, शासन व समाजाला होऊ लागली. यातूनच पर्यावरण अभ्यासास महत्त्व प्राप्त झाले. पर्यावरणविषयक जागृती व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला पर्यावरणाचे महत्त्व कळावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करू शकतो? पर्यावरण संतुलन ढासळल्यामुळे किती भयानक समस्या निर्माण झाल्यात? या संबंधीची माहिती प्रत्येकास व्हावी, या दृष्टिकोनातूनच प्रस्तुत पुस्तकाची मांडणी केली आहे.
    या पुस्तकाच्या माध्यमातून जैवविविधतेचे महत्व, राष्ट्रीय पर्यावरण धोरण, धोरणावर आधारित अंमलबजावणी, वने व वन्यजीवांचे संवर्धन, विकसित व विकसनशील देशातील पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न अशा महत्वपूर्ण मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व स्वच्छ पर्यावरणासाठी या सर्व बाबींचे आकलन समाजाला होणे आवश्यक आहे. ही माहिती समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सारे प्रयत्न करू या.

    Paryavran Bhugol

    175.00
    Add to cart
  • पर्यावरण शिक्षण

    20 व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात खर्‍या अर्थाने पर्यावरण शिक्षणाच्या संकल्पनेला गती मिळाली. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती आहे. मानव, प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्या सभोवतालच्या परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरणात केवळ एकाच घटकाचा समावेश होत नाही तर त्यात अनेक प्रकारचे घटक असतात. यामध्ये भौतिक, जैविक व रासायनिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो. पर्यावरण स्थळ-काळानुसार बदलते. एका सजीव जातीला अनुकूल असलेले पर्यावरण दुसर्‍या सजीव जातीला प्रतिकूल असू शकते. सद्य:स्थितीत नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अनिर्बंध वापरामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज या नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य पद्धतीने जतन केले तरच भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आपल्याला भावी पिढीसाठी हा निसर्गाचा ठेवा सुरक्षित ठेवायचा असेल तर नैसर्गिक साधनसंपत्तीचे व एकूणच पर्यावरणाचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

    पर्यावरण आणि पर्यावरण प्रदूषण हा आज कळीचा मुद्दा झालेला आहे. या प्रदूषणापासून आपणच आपल्या सुंदर पृथ्वीला वाचवायचे असेल तर सामूहिक बदलांऐवजी वैयक्तिक बदल महत्त्वाचे आहेत. आपण वेळीच याबाबत दक्ष राहिलो नाही तर येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी धोकादायक असणार आहे. आपला आजचा प्रत्येक दिवस पर्यावरण रक्षणासाठी मोलाचा आहे. प्रत्येक मानवाने आपली जीवनशैली बदलली तर स्वतःपासून केलेला हा बदल एक चळवळ बनायला वेळ लागणार नाही.

    सदरील पुस्तकात पर्यावरण व पर्यावरण शिक्षणाशी संबंधित सर्वच मुद्यांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सखोल विचारमंथनातून अभ्यास व संशोधनातून प्रस्तुत पुस्तक तयार झालेले आहे. विविध उदाहरणे तसेच सध्याच्या वेब युगाचा विचार करुन भरपूर प्रमाणात आकृत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यासक, संशोधकांनासुद्धा पुस्तकाचा उपयोग होणार आहे.

    Paryavaran Shikshan

    180.00
    Add to cart
  • पर्यावरणशास्त्र परिचय

    21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरणशास्त्र परिचय या संदर्भग्रंथात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
    मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, एड्स बाबतीतील जनजागृती व सद्य परिस्थिती, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
    पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.

    Paryavaranshastra Parichay

    375.00
    Add to cart
  • पालकत्व शिक्षण

    पालकत्व शिक्षण या पुस्तकात एकूण चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यात पालकत्व शिक्षणाचा अर्थ, स्वरुप, व्याप्ती, उद्दिष्ट्ये, मार्ग, गरज, महत्व तसेच पालकांचा बालकाच्या शिक्षणात व शाळेत सहभाग, पालक शिक्षक संघ, पालकांची भूमिका व जबाबदार्‍या, कुटूंबाचा, सामाजिक व आर्थिक स्थितीचा परिणाम, पालकत्व शैली, पालकत्व शिक्षणातील नवप्रवाह यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

    या पुस्तकातून पालकत्व शिक्षणाबद्दल अपेक्षित व तपशीलवार मुद्देसूद माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून संपूर्ण अशी माहिती किंवा ज्ञान आपणास मिळणार नाही. परंतु याचा शिक्षण क्षेत्रातील उपयोग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना या पुस्तकाद्बारे एकाच ठिकाणी पालकत्व शिक्षणाचे साहित्य उपलब्ध होईल व त्यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल अशी खात्री आहे.

    Palaktva Shikshan

    160.00
    Add to cart
  • पालकत्व शिक्षण

    पालक बनणे हे व्यक्तीच्या जीवनात खूप आनंद देणारी बाब आहे, तरी पालकत्वाची जबाबदारी पार पाडणे तेवढीच कठीण आहे. आपल्या बालकाला वाढवणे, त्याच्या योग्य विकासाला दिशा देणे हे एक आव्हानात्मक कार्य आहे. आपल्या मुलांसोबत चांगला संवाद असणे आजच्या इंटरनेटच्या युगात दुरापास्त झाले आहे. पालक अशिक्षित असो वा सुशिक्षित, गरीब वा श्रीमंत सर्वांना आपापल्या बालकांविषयी काही ना काही समस्या, शंका जाणवतात. या शंका कशा दूर कराव्यात. समस्या कशा सोडवाव्यात हे कोणत्याही स्तरावरील शिक्षणात शिकवले जात नाही. कारण पालकत्व ही नैसर्गिक गोष्ट मानली जाते.

    पालकत्वाचे शिक्षण ही संकल्पना भारतीयांसाठी नवीन आहे. पाश्चात्य देशात या शिक्षणाची मुळे रूजली आहेत. भारतात परंपरेने कुटुंबाकडून बालकाचे संगोपन, शिस्त, त्याचे भविष्य याविषयी निर्णय घेतले जातात. इथेच पिढीतील अंतराची ठिणगी पडते. बालहक्कांची घुसमट होते, हे सर्व होवू नये म्हणून पालकत्व शिक्षणाची रूजवात भारतात झाली.

    प्रस्तुत पुस्तकात पालकत्व शिक्षण संकल्पना, अर्थ, गरज, महत्व, व्याप्ती, पालक शिक्षणाचे विविध दृष्टिकोन, विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले उपागम, पालकांची भूमिका, जबाबदार्‍या यांचे तपशीलवार विवेचन केलेले आहे. भारतातील समाजात अस्तित्वात असलेल्या विविध कुटुंबातील आंतरक्रिया बालकांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग, भारतातील पालक शिक्षण, पालकत्व शैली, पालकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा बालकावर होणारा परिणाम या बाबी नवीन नसल्या तरी त्यांची मांडणी पालक, शिक्षणाच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

    Palakatv Shikshan

    195.00
    Add to cart
  • पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.
    प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अ‍ॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.

    Pashchimatya Rajkiya Vicharwant

    235.00
    Add to cart
  • पुराभिलेखागार

    21 व्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरातील सर्व तर्‍हेची माहिती महाजालामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेली असली तरी जुनी कागदपत्रे जपणारे पुराभिलेखागार आजही महत्वाचे आहेत. पुराभिलेख म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आलेख दर्शविणारी साधने.
    इ.स.पू. 327 च्या सुमारास अलेक्झांडरबरोबर भारतात आलेल्या निआर्कसने ‘हिंदू लोक रुई (कापूस) कुटून कागद तयार करतात’ असे लिहून ठेवले आहे. भारतात मध्यकाळापासूनच कागदपत्रे जतन करून ठेवण्याची पध्दत रूढ असल्याचे दिसून येते. पूर्वी संस्थानात कायम सांभाळून ठेवण्याजोगी कागदपत्रे लाल रुमालात बांधत तर पस्तीस, बारा व तीन वर्षे राखून ठेवण्याची कागदपत्रे पांढर्‍या रुमालात बांधत असत. इ.स. 1818 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली. यावेळी करण्यात येत असलेला सरकारी पत्रव्यवहार, जनतेचे तक्रार अर्ज व इतर कागदपत्रे सरकार दरबारी जमा होऊ लागली.
    सदरील पुस्तकात अभिलेखागारविषयक सर्व उपयुक्त माहितीसोबतच मुंबई अभिलेखागार, मुंबई, पुण्याचे पेशवे दफ्तर (पुणे अभिलेखागार) आणि इ.वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथील पुराभिलेखागारांचाही समावेश आहे. ‘डिजिटल अभिलेखागार’ या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थी, शिक्षक व नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल असा विश्वास आहे.

    Purabhilekhagar

    160.00
    Add to cart
  • प्रगत विपणन

    ‘प्रगत’ हे पुस्तक क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.कॉम.II
    (सत्र-3) वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2024-25 पासून सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी माध्यमातून लिहिलेले पाठ्यपुस्तक आपल्या हाती देताना आनंद होत आहे.
    प्रस्तुत पुस्तकात प्रगत विपणनाची ओळख- प्रगत विपणनाची ओळख – संकल्पना, महत्त्व, आव्हाने आणि ट्रेंड. व्युहरचनात्मक विपणन नियोजन – नियोजनाची भूमिका, विपणन वातावरणाचे विश्लेषण, रणनीती आणि युक्त्या.
    ग्राहक संबंध व्यवस्थापन – महत्त्व, ग्राहक धारणा धोरणे आणि तंत्रज्ञान. बाजार संशोधन आणि ग्राहक वर्तन – संशोधनाचे संचालन, ग्राहक वर्तनाची विश्लेषण.
    ब्रँड व्यवस्थापन आणि विपणन संप्रेषण- ब्रँड इक्विटी, पोझिशनिंग, एकात्मिक विपणन धोरणे. डिजिटल मार्केटिंग आणि आंतरराष्ट्रीय विपणन – डिजिटल स्वरूप, ऑनलाइन ग्राहक वर्तन, जागतिक आव्हाने इत्यादी घटकांविषयी विस्तृत माहिती स्पष्ट करण्यात आलेली आहे. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे.

    250.00
    Add to cart
  • प्रतिनिधि लघुकथाएँ एक अध्ययन

    कहानी कहने की प्रवृत्ति मनुष्य में चिरकाल से विद्यमान रही है। आपबीती और जगबीती को सुनने-सुनाने की परम्परा सभ्यता की विकास-यात्रा के साथ-साथ सभी देशों की सांस्कृतिक निधि रही है। कहानी साहित्य की लोकप्रिय विधा है। कथा की परम्परा बहुत पुरानी है। पहले के जमाने में जनसाधारण का ज्ञान संकुचित और सिमीत था, अतः उन्हें बहुत ही सरस व लोचदार तरीके से समझाने की आवश्यकता थी। इसका निर्वाह कहानी ने बडी सफलता से किया। पहले कथा और बाद की कहानी काफी लम्बी और वर्णनात्मक हुआ करती थीं किन्तु कालान्तर में इनका कलेवर संकुचित होता गया, क्योंकि एक तरफ जनसाधारण के ज्ञान का विस्तार होता गया तो दुसरी और उसकी व्यस्तता भी बढती गई, समय का अभाव भी होता गया। अतः कथा अब लघु आकार की होने लगी और लघुकथा के नाम से ख्यात होने लगी।
    इस पुस्तक में कहानी एवं लघुकथा का उद्भव एवं विकास, कहानी एवं लघुकथा के तत्वों का विवेचन, कहानी एवं लघुकथा में अंतर और हिंदी की प्रतिनिधिक 20 लघुकथाओं का संकलन किया गया है। जो शोधार्थी एवं विद्यार्थियों को लिऐ महत्वपूर्ण है।

    125.00
    Add to cart
  • प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती

    प्रिय वाचक मित्रांनो, ‌‘प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती’ (Corporate Law and Secretarial Practice) हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुनर्रचित अभ्यासक्रमाअंतर्गत लिहिलेले पुस्तक आपल्याकडे सोपवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
    प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने प्रमंडळ निर्मितीसाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबीचे सविस्तर विवरण करण्यात आलेले आहे. कोणत्याही देशातील औद्योगिक क्षेत्र हे त्या देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक घटक असतो. त्यामुळे कंपनीच्या अंतर्गत नियमावलीच्या संदर्भात त्याचप्रमाणे विशेष करून सचिवाच्या कार्यपद्धती संदर्भात या पुस्तकांमध्ये पूर्णपणे विवेचन करण्यात आलेले आहे. सचिव हा कोणत्याही प्रकारच्या कंपनीतील उच्च पातळीवरील व्यवस्थापनातील महत्त्वाची व्यक्ती असतो. प्रमंडळाच्या यश अपयशामध्ये सचिवाने घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत असतो. खरे तर सचिवाद्वारे कोणत्याही कंपनीची कायदेशीर धुरा सांभाळली जात असते. कंपनी कायदा 1956 नुसार व्यवसायाच्या संदर्भातील संपूर्ण तरतुदी त्याचप्रमाणे कायदेशीर संकल्पनांचा या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे. कंपनी कायदा 2013 मधील जे ठळक बदल आहेत त्यांचाही अंतर्भाव सदर पुस्तकांमध्ये दिसून येईल. कंपनी कायदा 2013 मधील काही ठळक वैशिष्ट्यांपैकी प्रमाणाच्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि इतरच्या बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कंपनीवर आणि त्या कंपनीच्या विकासावर या कायद्याचा परिणाम होत असताना दिसून येतो.

    110.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोल

    प्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्‌‍य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.
    प्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.

    Prakurtik Bhugol

    595.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोल

    प्राकृतिक भूगोल या पुस्तकात भूगोलाच्या विविध अंगाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीचे अंतरंग, भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबंधित सिद्धांत, खडक आणि विदारण, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा इत्यादी घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याशिवाय वातावरणाचा अर्थ, वातावरणाची घटना आणि संरचना, तापमान, सौरशक्ती, वायूभार, वारे व वाऱ्याचे प्रकार, आर्द्रता, वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार, महासागर तळरचना, या तळरचनेमध्ये हिंदी व अटलांटिक महासागराच्या तळरचनेचा अभ्यास, सागरी प्रवाह, हिंदी व अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाचे चक्र इत्यादी घटकाविषयी अतिशय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
    विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

    Prakurtik Bhugol

    285.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण आणि जलावरण)

    नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतूदींच्या अनुषंगाने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकृतीबंधानुसार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश असलेले ‌‘प्राकृतिक भूगोल’ हे पुस्तक विद्यार्थी मित्र, अभ्यासक आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
    प्रस्तुत ग्रंथात प्राकृतिक भूगोलाची ओळख, आपली पृथ्वी, खडक व विदारण पृथ्वीच्या शक्ती, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वाटा यांचे स्पष्टीकरण तसेच वातावरणाचा परिचय, सौरशक्ती आणि हवेतील तापमान, वातावरणीय दाब आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, जलावरणाचा परिचय, महासागरजलाच्या हालचाली इत्यादी घटकांचे योग्य विश्लेषण, आकलन करुन लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनाचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून हा ग्रंथ भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

    310.00
    Add to cart
  • प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण व जलावरण)

    सूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे अवघे विश्व कसे निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले, विश्वाची व्याप्ती किती आहे आदींसारखे अनेक प्रश्न मानवाला सुरुवातीपासून भेडसावत होते. त्याअनुषंगाने प्राचीन काळापासून ते आजतागायत पुष्कळशा परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत. अठराव्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. पृथ्वीचे अंतरंग हे निसर्गातील सर्वात मोठे गुढ आहे. भूकवचात बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने काही शक्ती अथवा प्रेरणा करीत असतात हे स्पष्ट होते.
    प्रस्तुत ग्रंथात काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, पृथ्वीचे अंतरंग, खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, खडक आणि विदारण, नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य, वातावरण आणि सौरशक्ती, वायुभार आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, सागरतळ, समुद्रप्रवाह इ. विविध मुद्यांचा परामर्ष घेतलेला असून साध्या-सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

    Prakurtik Bhugol (Shilavaran, Vatavaran V Jalavaran)

    295.00
    Add to cart
  • प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)

    प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.

    प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.

    Prachin Bhartacha Itihas (BC 3000 to CE 1200)

    325.00
    Add to cart
  • प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा

    भारताची प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा हा जगाला प्रेरणादायक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आधारे, आपल्या तरुणपिढीला प्राचीन भारतीय ज्ञान, मूल्यं आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
    यात गुरुकुल परंपरेच्या माध्यमातून आचार्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचा उलगडा केला आहे. योगसाधना, ज्योतिष, साहित्य, संगीत, कला, दर्शनशास्त्र, नीतीशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, पारंपरिक चिकित्सा, आरोग्य, संरक्षण आणि युद्धकलेसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य विषय : प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली व ज्ञानस्रोत, प्राचीन भारतीय विद्यापीठांचे योगदान, प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय कला व सांस्कृतिक परंपरा.
    विद्यार्थ्यांच्या उपासना, व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, मानवतेचा आदर आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले आहे.

    260.00
    Add to cart
  • प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली

    मानवी सभ्यतेत ज्ञानाचे व शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या मानवी समुहाने आत्मसात केलेले ज्ञान हे त्याच्या प्रगतीचे व मानवी सभ्यतेचे द्योतक असते. भारतीय ज्ञानप्रणालीचे शिक्षण संक्रमणातील स्थान व एकूणच शैक्षणिक उत्क्रांतीतील महत्त्व व मानवी सभ्यतेचे ऐतिहासिक उल्लेख लक्षात घेता भारतीय ज्ञानप्रणाली व तिचे महत्व जाणून घेणे अगत्याचे आहे. मौखिक ज्ञान परंपरा, मानवी संस्कृतीला विविध आयाम प्रदान करणाऱ्या चालीरीती, सण-उत्सव, धार्मिक ग्रंथ, परंपरागत व्यवसाय, प्राचीन तंत्रज्ञान याद्वारे भारतीय ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांकडे संक्रमित होतांना दिसते. अर्थात भारतीय ज्ञानप्रणालीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. या ज्ञानप्रणालितूनच भारत एक राष्ट्र म्हणून सांस्कृतिक एकात्मतेच्या बहुसांस्कृतिक धाग्यात जोडला गेला आहे. भारतीय राष्ट्रवादाचे अधिष्ठान ‌‘भारतीय संस्कृतीत’ आहे, असे डॉ. राममनोहर लोहिया यांनी म्हटले आहे.

    – राजेंद्र नन्नवरे
    वन्यजीव अभ्यासक

    175.00
    Add to cart
  • प्रात्यक्षिक भूगोल

    Pratyakshik Bhugol

    475.00
    Add to cart
  • प्रादेशिक नियोजन आणि विकास

    प्रादेशिक संकल्पनाच्या विकासातील महत्वाचा टप्पा म्हणजे 20व्या शतकाचा प्रारंभ होय. या शतकात प्रादेशिक भूगोलांच्या अध्ययनावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला होता. 20 शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्स मधील प्रसिद्ध तज्ज्ञ विदाल-द-ला-ब्लाश, यांनी प्रादेशिक भूगोलाच्या अध्ययनावर लक्ष केंद्रीत करून या शाखेचा विकास घडवून आणला.

    प्रादेशिक नियोजनाच्या संदर्भात नियोजन प्रक्रियांचा विचार करताना त्यामध्ये सर्व समावेशक घटकांची एकत्रित मांडणी आवश्यक असते. नियोजनाचा उपयोग वेगवेगळ्या विषयामध्ये अनेक वर्षापासून होत असला तरी प्रादेशिक नियोजन ही संकल्पना मात्र 20व्या शतकात प्रामुख्यान विकसित झालेली संकल्पना होय. सर्व साधारणपणे गेल्या 50 वर्षात जगातील विविध देशांनी सामाजिक व आर्थिक पातळ्यांवर एकत्र येऊन नियोजनाच्या माध्यमातून विकासाच्या संदर्भात विविध योजना तयार करण्यास सुरुवात केलेली दिसते. यातूनच प्रादेशिक नियोजनाची आवश्यकता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रादेशिक योजनाचा उपयोग विकसित व विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

    प्रादेशिक नियोजनाची संकल्पना, वैशिष्ट्ये, महत्व, प्रादेशिक नियोजनाचे प्रकार, प्रादेशिक विकास, प्रादेशिक विकासाची आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय निर्देशके, प्रादेशिक विकासाचे सिद्धांत व प्रतिमाने, या सोबतच भारतातील प्रादेशिक नियोजन व विकासाशी संबंधित घटकांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे. निती आयोगाची सखोल माहिती देखील विविध संदर्भांच्या सहाय्याने नमूद करण्यात आली आहे.

    Pradeshik Niyojan aani Vikas

    150.00
    Add to cart
  • प्रादेशिक नियोजन आणि विकास

    प्रादेशिक नियोजनाकरीता भूमी उपयोग, कृषी क्षेत्राचे संरक्षण, ग्रामीण व शहरी भागांचा विकास, औद्योगिक वसाहती, दळणवळणाचे मध्यवर्ती स्थान, पायाभूत सुविधा, लष्करी तळ आणि रिकाम्या जमिनी किंवा क्षेत्रांची आवश्यकता असते. यांच्या आधारे प्रादेशिक नियोजन साधले जाते. प्रादेशिक नियोजन हे एखाद्या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधा व पट्ट्यांची कार्यक्षमप्रणाली राबविणारे शास्त्र आहे. नियोजनांतर्गत एखादा ‘प्रदेश’ प्रशासकिय किंवा अंशतः कार्यशील असू शकतो आणि त्यात वस्ती आणि क्षेत्रीय नेटवर्कची वैशिष्ट्ये समाविष्ट असतात. एखाद्या प्रदेशाचे नियोजन हे त्या प्रदेशातील प्रादेशिक गरजा व उपलब्ध संसाधने यांना विचारात घेऊन केले जाते.

    भारतातील प्रादेशिक विकासात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, प.बंगाल, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत तर मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश व ओरीसा ही राज्ये मागासलेली आहेत. या सर्व राज्यांना समान पातळीवर आणण्याकरीता प्रादेशिक नियोजनाच्या माध्यमातून संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून केला जात आहे. प्रादेशिक नियोजन ही अलीकडच्या काळात प्रगत झालेली एक लोकप्रिय व आधुनिक संकल्पना आहे. ज्यात मर्यादित साधनांचा जास्तीत जास्त व पर्यायी उपयोग करून अधिकाधिक गरजांची पूर्तता करणे व जास्तीत जास्त लोकांना मुलभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवन सुखमय करयाच्या हेतूने संतुलित विकास साधून संबंधित प्रदेशातील लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्याचा स्वीकृत मार्ग म्हणजे ‘प्रादेशिक नियोजन’ होय.

    ‘प्रादेशिक नियोजन व विकास’ या विषयावरील शक्यतो प्रत्येक घटकावर या पुस्तकात चर्चा करण्यात आलेली आहे. पुस्तकात बर्‍याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सोप्या करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून आपल्याला हे कळेलच. याशिवाय नियोजनाचे प्रकार, उद्देश, दृष्टीकोन, विकास योजना, ग्रामीण विकास, आदिवासी विकास व विकासाचे प्रतिमान व सिद्धांत या बाबतीतले लिखाण या पुस्तकातून आम्ही केले असल्याने प्रादेशिक नियोजनाची व्याप्ती आपल्या लक्षात येईल.

    Pradeshik Niyojan aani Vikas

    150.00
    Add to cart
  • बँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार

    बँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार या ग्रंथात बँकिंगचा अर्थ, व्याख्या, उद्गम, कार्ये व सेवा, आर्थिक विकासातील भूमिका, भारतीय बँकींग प्रणालीची रचना, बँकांचे रचनात्मक, कार्यात्मक, मालकीनुसार, आधुनिक बँका, पेमेंट व सेटलमेंट सिस्टिम अंतर्गत इलेक्ट्रानिक बँकिंग, नेट बँकिंग व बँकिंगच्या नवीन उत्पादनाचा समावेश केला आहे. तसेच पतनिर्मिती प्रक्रिया, सुदृढ बँकिंगची रोखता, सुरक्षितता आणि लाभप्रदता तत्त्वे, रोखता आणि लाभप्रदता तत्वातील आंतरविरोध, अनुत्पादक मालमत्ता, मध्यवर्ती बँक, तिचा अर्थ, कार्ये अर्थव्यवस्थेतील भूमिका आणि मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यांच्यातील फरक या मुद्द्यांचे विस्तृत विवेचन केलेले आहे.
    प्रस्तुत पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.

    225.00
    Add to cart
  • बँकींगची तत्त्वे आणि व्यवहार

    बँकींग हा वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेचा आत्मा आहे. व्यावसायिक / उद्योजक कितीही हुशार, कार्यक्षम आणि त्याच्या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नसेल तर तो यशस्वी ठरु शकत नाही. बँकींग हा व्यवसायाचा असा एक भाग आहे जो जनतेकडून ठेवी स्विकारुन उद्योग-व्यवसायाला भांडवल उपलब्ध करुन देण्याचे मध्यस्थ म्हणून कार्य करतो. ज्या देशातील बँकींग आणि वित्तीय प्रणाली विकसित आहे त्या देशाचा आर्थिक विकास वेगाने होतो. बँकींग प्रणाली ही अर्थव्यवस्था रुपी शरीराला रक्त पुरवठा करण्याचे कार्य करते.

    Bankingchi Tatve ani Vyavhar

    450.00
    Add to cart
  • बाजार संरचना आणि घटक किंमतीचे अर्थशास्त्र

    ‌‘बाजार संरचना आणि घटक किंमतीचे अर्थशास्त्र’ या ग्रंथात बाजाराचे स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पविक्रेताधिकार आणि द्विविक्रेताधिकार असे प्रकार पडतात. बाजारात पूर्ण स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा असताना उद्योग संस्था आणि उद्योगाचे वर्तन वेगवेगळे असते. कोणत्याही बाजारात उद्योग संस्था किमान खर्च घटक संयोगाच्या साहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन करुन नफ्याचे महत्तमीकरण करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक बाजारात उद्योग संस्था उत्पादन आणि किंमत निश्चिती करते. उत्पादनाबरोबरच भूमी, श्रम, भांडवल, संयोजन या घटकांना त्यांच्या वापराबद्दल खंड, वेतन, व्याज आणि नफा रुपात मोबदला दिला जातो. म्हणजेच वस्तू प्रमाणेच घटकांचीही किंमत निश्चित केली जाते.
    प्रस्तुत पुस्तकात या सर्व प्रमुख व उपमुद्द्यांची पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.

    225.00
    Add to cart