Your cart is empty now.
खान्देशातील महाराष्ट्राला परिचित असलेले, ख्यातनाम ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ज्यांना ‘साहित्य अकादमी-2000′ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांचा हा 84 वर्षांच्या काळातील तिसरा खंड. 1958 सालापासून सर्वप्रथम लोकसाहित्य संकलन व संशोधन करून, मराठी वाचकांना अहिराणी साहित्याची गोडी कळावी व एक आदर्श संस्कृतीशी परिचय व्हावा या उदात्त हेतूने प्रेरीत होवून महाराष्ट्रातील निरनिराळ्या दिवाळी अंक, दैनिकात विविध विषयांवर सुमारे 100 लेख प्रसिद्ध केले. त्यांचे अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 (सण आणि उत्सव), खंड-2 (नाती-गोती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई-32 ने प्रकाशित केले असून त्या ग्रंथांचा एम.ए.द्वितीय वर्षाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. खान्देशच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विषय, जावय-आसरा-बोन, जलमदिन-पाँची-बारस, डाग-डागीना, प्रथा-रुढी-रितीरिवाज, इत्यादींचा ‘वानवळा’ वाटायला आता ते निघालेले आहेत. समस्त सुज्ञ मराठी वाचकांनी त्यांची चव अवश्य चाखावी!