Your cart is empty now.
‘भारतीय राजकीय विचारवंत' हे पुस्तक वाचकांच्या हातात देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. राज्यशास्त्राच्या विविध शाखामध्ये राजकीय विचाराच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (NEP 2020) अनुसरून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र कला शाखेच्या पाचव्या सत्रातील अभ्यासक्रमासाठी प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. या पुस्तकाची निर्मिती करताना हे पुस्तक विविध विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करणांऱ्या, विविध स्पर्धा परीक्षेचा (M.P.S.C., U.P.S.C., S.E.T., N.E.T. ई) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून निर्मिती करण्यात आली आहे. निश्चितच हा ग्रंथ या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याची आम्हाला खात्री आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये निवडक चार राजकीय विचारवंताच्या विचारांचा सखोल परामर्श घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखन व मांडणी करताना विद्यार्थ्याना, वाचकांना व संशोधकांना समजेल उमजेल अशा साध्या-सोप्या भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. भारतीय राजकीय विचारवंताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी ग्रंथाची भासणारी उणीव या ग्रंथाच्या माध्यमातून थोडीशी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.