Your cart is empty now.
मानवी शक्ती अगाध असून आंतरिक शक्ती आणि बाह्य शक्तीच्या जोरावर मानव आपल्या कार्यात यशस्वी होत असतो. त्यासाठी विज्ञानयुगातील डॉक्टर्स किंवा औषधे शरीरस्वास्थ्य कायम टिकविणारे ठरु शकत नाहीत. तर मानवाचा आंतरिक शक्तीवरील विश्वास वाढणार म्हणूनच मनाचे आरोग्याला महत्व आहे. कोणत्याही संसर्गविनाशक औषधीला किंवा प्रोटीन्सला अधिक महत्व न देता मानवाचे लक्ष भौतिक पदार्थापेक्षा मनाच्या समृद्धीकडे, श्रीमंतीकडे आणि स्वच्छतेकडे रहाणार आहे. तसेच अदृश्यांचा अनुभव घेण्यासाठी, रहस्ये जाणून घेण्यासाठी नव्या दृष्य परिणामांचा तसेच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न सुरु राहील. भारतीय पारंपारिक विद्येतील, आयुर्वेद, प्राणायाम, योगासने, स्पर्श चिकित्सा, ॲक्युप्रेशर यासारख्या आरोग्य सुखावह ज्ञानाकडे सर्व विश्वाचे
लक्ष आहे. आपणही या ज्ञानातील स्पर्शचिकित्सा, रेकी संदर्भात जाणून घेऊन त्याद्वारे जीवनमार्ग सुलभ करु शकतो. ‘रेकी’चा आणि मन सुखदु:खाचा रक्तसंबंध आहे. आपले अंर्तमन सतत आपल्यात उत्क्रांती घडवून आणण्यात दंग असते. नाविन्यपूर्णतेची ओढ असलेले. मन आणि हृदयातील तीव्र आंतरिक इच्छाच आपल्याला
यशाकडे पोहचविते. सूर्य-पृथ्वी-चंद्र या शक्ती चक्रातील ‘पिरॅमिड’ हे ब्रम्हांडातील ऊर्जेचे पृथ्थ:करण करणारे साधन मानले गेले आहे. चिन आणि यांग ब्रह्मांडातील आधारभूत ऊर्जा मानल्या जाऊन ‘फेंगशुई’ला ही महत्व दिले गेले आहे, मात्र लक्षात असु द्या की, अनावश्यक वस्तुंची अडगळ दूर केल्याशिवाय फेंगशुईच्या कोणत्याही उपचाराचा उपयोग होत नसतो. स्पर्श चिकित्सेतही अशी भिन्नता आढळते. चला ज्ञानवर्धिनीकडे मार्गक्रम करुया.