Your cart is empty now.
प्रत्येक नवा दिवस नव्या प्रमाणेच उगवतो. नव्या दिवसाची पहाट म्हणजे सुर्य-किरण जसे तांबडे फुटते व दाही दिशांना किरण उधळले जातात ते किरण म्हणजेच प्रत्येक जीवात्म्याचे नशिबाचा डाव असतो. प्रत्येक सकाळी आपल्याला कोणते नविन पत्ते येणार हे माहित नसते. (संकटे, नवी परिस्थिती) तो डाव शेवट पर्यंत खेळायचाच असतो. कधी जिंकतो तर कधी हरतो. रात्रंदिवस आम्हां युध्दांचा प्रसंग, म्हणून वर्तमान जगायला शिकायला पाहिजे. कारण वर्तमानकाळात आपण चांगले जगलो, तर भूतकाळ व भविष्यकाळ हे दोन्हीही आपसूकच चांगले होतील. जीवन कसे जगावे यासाठीच हा लेखनप्रपंच!