Your cart is empty now.
हे समग्र लेखन वाचनीय नव्हे तर चिंतनीय आहे. ‘समीक्षा’ म्हटली की ती ‘दुर्बोध’ हवीच, असा एक समज मराठी साहित्यात झाला आहे. अलीकडील तरुण समीक्षक तो खोटा ठरवून आस्वादात्मक समीक्षेला सखोल चिंतनाची, तर्कनिष्ठ चिकित्सेची जोड देऊन एक सृजनशील क्रांती मराठी वाङ्मय प्रांतात करीत आहेत.
डॉ. संजय कांबळे याच पिढीचे समीक्षक आहेत. एका अलिप्ततेतून ते वाङ्मयीन विवेचन करतात. अनेक संदर्भातून आपली मते ठोसपणे मांडतात. त्यात अभिनिवेश किंवा आग्रह कुठेही नाही. एक प्रकारची रुजुता त्यांच्या लेखनात प्रत्ययाला येते. हीच गोष्ट मला आशादायी आणि महत्त्वाची वाटते.