Your cart is empty now.
समर्थांचा उपदेश मानवी जीवन सुखकारक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ‘मनाचे श्लोक’ ही अजरामर कलाकृती आहे. पृथ्वीवर जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत ‘मनाचे श्लोक’मधील उपदेशाची, नितीमूल्यांची अपरिहार्यता अबाधित राहील. ही नितीमूल्ये माणसाला सावरणारी, दिशा देणारी असल्याने मानवी जीवन उन्नत होण्याकामी ती अखिल जगाला दीपस्तंभासम आहेत. ‘मनाचे श्लोका’त असलेली – सुसंवादित्व, समाधान, सुविद्या, विश्वास, प्रयत्नवाद, निर्गर्वीता, अद्वैत, विरक्ती, मौन, देहातितता, क्रियाशीलता, कृतिउक्तीसाम्यता, लोभहीनता, दया, निष्कामता यांसारख्या मानवी मूल्यांची आत्यंतिक गरज आजच्या विकल वर्तमानात आहे. या मूल्यांचे आचरण समाजाने केले तर मानवी समूह सुखी होण्यास वेळ लागणार नाही. समर्थांना अभिप्रेत असणारा समर्थ संप्रदाय आकारास येण्यासाठी यातल्या मानवी मूल्यांचे दर्शन जागरूकतेने होणे हीच आजच्या काळाची नितांत गरज आहे.
Manache Sholkatil Manvi Mulye