Your cart is empty now.
नाटक ही समूहाने आस्वाद घेण्याची कला आहे. त्याच्या पाठ्याच्या आपल्याकडच्या जडणघडणीच्या प्रेरणा मात्र केवळ पाठ्याच्या एकेक एकेकट्याच्या आस्वादनाच्या असल्यामुळे आपल्याकडे सशक्त असे मंचित पाठ्य निर्माण होऊ शकले नाही. अशा प्रकारे नव्वदपूर्वीच्या मराठी नाटकामध्ये शब्द आणि प्रयोगामध्ये त्याचा उच्चार पर्यायाने वाचिक अभिनय महत्त्वाचा ठरला. सत्तरोत्तर रंगभूमीचे अवलोकन केले असता शब्दाचे महत्त्व कमी झालेले दिसून येते. पण त्याचे कारण या काळात सशक्त असे मंचित पाठ्य निर्माण झाले एवढेच फक्त नाही.
– प्रा. डॉ. प्रवीण भोळे,
विभाग प्रमुख, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे