Your cart is empty now.
जीवनात नावीन्यपूर्ण करण्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा लिखाणरूपी शब्दसखा रुसून बसतो. परंतु जेव्हा या पुस्तकाचे लिखाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा ही अनुभूती झाली नाही, कारण हे पुस्तक लिहिताना विषयाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा कयास होता. मानवाच्या जीवनाची यशस्विता ही त्यांच्या योग्य व्यवस्थापनावरच अवलंबून असते. यशस्वी होण याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. एका अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहिती पुस्तिकेसारखा आहे. जीवनात यशस्वितेची कास धरण्यासाठी नियोजन, योग्य निर्णय व प्रेरणा या गोष्टींना फार महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल याची मी ग्वाही देतो.