• खानदेशमधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास (खानदेशचा इतिहास)

    इतिहासाचे पुनर्लेखन ही जशी काळाची गरज आहे तसेच प्रादेशिक इतिहास लेखन हे सुद्धा आवश्यक आहे. आजपर्यंत भारतीयांनी प्रादेशिक इतिहासाकडे दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या चळवळीत हिंदुस्थानातील सर्व प्रदेशांचे योगदान आहे. पण त्यांच्या कार्याची फारशी नोंद झाली नाही. ती व्हावी या हेतूने हा ग्रंथ लिहिला आहे. यांत राजकीय चळवळीबबरोबर सत्यशोधक चळवळ, गुला महाराजांचे भिल्लांतील प्रबोधन, मंदिर प्रवेशाची चळवळ, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न, हिंदुस्थानातील ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रथमच भरलेले फैजपूरचे अधिवेशन व त्यात शेतकर्‍यांसंबंधी झालेले ठराव आदि अनेक गोष्टींचा आढावा घेतला आहे. खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी लोक आहेत. त्यांनीच पहिल्या प्रथम ब्रिटीश सत्तेला खानदेशच्या भूमीवर विरोध केला. म्हणून खर्‍या अर्थाने ते महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक होत. काझीसिंग व भागोजी नाईक आदि भिल्ल क्रांतीकारकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून खानदेशमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. अशा वंचित नि उपेक्षित जनता व प्रदेशाचा इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ होय.

    Khandeshmadhil Rashtravadacha Uday Ani Vikas (Khandeshcha Itihas)

    595.00
    Add to cart
  • मध्ययुगीन खानदेश

    दख्खनच्या सहा सुभ्यापैकी खानदेश हा एक महत्त्वाचा आणि समृद्ध सुभा होता. इ. स. 1752 साली भालकीच्या तहाने तो मराठ्यांच्या ताब्यात आला. या सुभ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सुभ्यातील प्रशासनाचे कांही पैलू हे मराठी राज्यात अस्तित्वात असलेल्या प्रशासनापेक्षा भिन्न होते. त्यावर फारुकी आणि मोगल शैलीचा प्रभाव होता. यात मराठा काळात कांही बदल झालेत काय? किंवा मराठा प्रशासन आणि येथील प्रशासनात कोणता फरक होता याबाबत आजपर्यंत कोणी संशोधन केले नाही. खानदेशच्या प्रशासनात अनेक कर्तबगार अधिकारी होवून गेलेत. कुकुरमुंढ्याचा कमाविसदार असाच एक कर्तबगार अधिकारी होता.

    कुकरमुंढ्याच्या कमविसदाराला त्या भागातील रयतेची पिके भिल्लांचा उपद्रवापासून वाचविणे महत्त्वाचे होते. म्हणून तो आपल्या पत्रात पुढे पेशव्यांना लिहितो की, कंकालेकर भिल्लांचा मोड करणे हे अशक्य आहे असे नाही. पण जमा थोडी खर्च फार ऐसा प्रकार आहे. म्हणून कंकालेकाराशी करार केला. अशी बुद्धिचातुर्य वापरणारी अधिकारी मंडळी या सुभ्यात होवून गेली. ती प्रथम अप्रकाशित पेशवे दप्तरातून या ग्रंथाद्वारे उजेडात येत आहे.
    खानदेशमधील शहरे, उद्योगधंदे, सावकारी व्यवसाय, ग्राम वतनदार, वस्तूंच्या किंमती, कृषी जीवन, चलन व्यवस्था आणि येथील सांस्कृतिक जीवन यांचा अप्रकाशित मौलिक साधनांच्या सहाय्याने आढावा घेत हा ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवीत आहे. तो मराठ्यांच्या इतिहासात नक्कीच भर टाकणारा आहे. या आत्मविश्वासाने हा ग्रंथ आपल्या हाती सुपुर्द करीत आहे.

    Madhyaugin Khandesh

    495.00
    Add to cart