• ‘घुमान’ मधील बाबा नामदेवजी

    घुमान आणि संत नामदेव यांचे पारस्परिक नाते असे विलक्षण आहे. नामदेवांच्यामुळेच घुमान वसले. काही एक विशिष्ट जीवनकार्य मनाशी निश्चित करुन चांगले वीस वर्षे नामदेव तिथे राहिले. तिथल्या जनसमुदायाशी समरस झाले. तिथली भाषा त्यांनी आत्मसात केली. त्या भाषेत पदरचना करुन आपली आध्यात्मिक अनुभूती त्यांनी शब्दांकित केली. समाजात नवे क्रांतिकारी विचार पेरले. तिथे त्यांना महंतपद प्राप्त झाले. त्यांचा शिष्यपरिवार वाढत गेला. त्यांचे मंदिर बनले. महाराष्ट्रात विठ्ठलाच्या भक्तीने वेडा होऊन नाचणारा एक भावुक भक्त दूरदेशी पंजाबात जाऊन ख्यातकीर्त महात्मा बनला. घुमान या सगळ्याचे साक्षी बनून राहिले.

    – डॉ. निशिकांत मिरजकर

    ‘Ghuman’ Madhil Baba Namdevji

    120.00
    Add to cart
  • अष्टांग-योग (मराठी) भाग 1

    समिक्षा आणि अभिप्रायांमधून प्राप्त झालेले सार :
    एक सांभाळून ठेवण्याजोगे पुस्तक…

    – मैरी जे. के. स्टालवर्ट

    एका गंभीर असूनही रोचक अशा विषयावर असलेले पुस्तक खरोखरीच डॉ. सहर एक प्रतिभावान व्यक्ती आहेत. एक ‌‘संपूर्ण मनुष्य’ ज्यांच्यासाठी मानवी अध्यात्मिक विषयामधला कोणताही पैलू अनोळखी नाही.

    – प्रो. जुजुकी ओकासा

    हे पुस्तक वाचणाऱ्या कोणाही व्यक्तीला हे जाणवल्यावाचून राहणार नाही की तो एका भविष्यवेत्या प्रतिभावंताच्या सान्निध्यात आहे. जो एकाचवेळी विश्वात आणि प्रबुद्ध असा लेखकही आहे.

    – अर्ल पी. के. रुधरफोर्स

    सरतेशेवटी आपल्याजवळ आता एका अश्या लेखकाचं पुस्तक आहे की ज्याने ह्या पुस्तकांत लिहिलेल्या प्रत्येक अध्यात्मिक अवस्थेचा स्वतः अनुभव घेतलेला आहे.

    – योगी राज कृष्णा, हिमालय वन विश्वविद्यालय

    लेखकाने तिबेटीयन गुढ योगामधील सर्वात गहन अश्या रहस्यांची दिक्षा घेतलेली आहे. सहर हे आपल्या ह्या आजच्या युगातले ‌‘मिलारेपा’ (तिबेटातील सर्वात प्रसिद्ध असे योगी) आहेत.

    – लामा टिलकू

    सध्या हयात असणाऱ्या कोणत्याही विद्वानापेक्षा सदर योग आणि बौद्ध धर्माचे अधिक चांगले जाणकार आहेत.

    – प्रो. डॉ. तारापोरे

    हे पुस्तक (सहर ह्यांचे) बऱ्याच जणांमध्ये आत्मज्ञान जागवेल.

    – स्वामी रामचंद्र

    सहर जी विज्ञानातील सर्वात आधुनिक शोधांचा उपयोग प्राचीन ज्ञानाच्या पुष्ठ्यर्थ करतात. त्यांच्यासाठी दोन्ही प्रकारचे ज्ञान सहजसाध्य आहे.

    – गुरु सत्यानंद

    मानवी जीवनाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी सदर ह्यांनी केलेल्या ह्या कार्याची आलोचक सुद्धा प्रशंसा करतात.

    – प्रिंसिपल जॅक्सन

    वाचक जसजसा हे पुस्तक वाचत जातो, हे पुस्तक त्याच्यावर आपला प्रभाव टाकत जातं. हे महान पुस्तक कालातीत आहे आणि मुमुक्ष्‌ंना (जे सत्याचा शोध घेतात) ह्या पुस्तकाची नक्कीच शिफारस करता येईल.

    – डीन इंगेरसोल

    Ashtang-Yog

    250.00
    Add to cart
  • इंडियन बिझिनेस लेजंड्स

    भारतात जन्माला आलेल्या व भारतातच उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून जगभर प्रसिद्ध झालेल्या उद्योजकांची ओळख सर्व भारतीयांना व्हावी यासाठी सदरील पुस्तकात सात सुप्रसिद्ध यशस्वी उद्योजकांचा परिचय घेतलेला आहे. उद्योजकांच्या जीवनाचा वेध घेतांना उद्योजकांच्या व्यापारी संघर्षाची व कठोर मेहनतीची माहिती नव्या पिढीच्या तरूणाईला मिळून उत्तर आयुष्यात येणार्‍या अडचणींचा ते सहज सामना करू शकतील. करीअर घडवण्यासाठी उद्योजकांच्या विविध प्रासंगिक, व्यावसायिक क्लृप्त्या त्यांना दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडू शकतील.

    सदरील पुस्तकात जहांगीर टाटा, जीडी बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, आदित्यविक्रम बिर्ला व राहुल बजाज अशा सात मान्यवर उद्योजकांचे संक्षिप्त जीवन चरित्र रेखाटलेले आहे. या जीवन चरित्रात उद्योजकांनी उद्योगधंद्याची केलेली सुरूवात, उद्योग उभारतांनाचा जीवघेणा संघर्ष, उद्योगाच्या विस्तारासाठी घेतलेले कठोर परिश्रम यांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे.

    सदरील ‘इंडियन बिझिनेस लेजंड्स’ हे पुस्तक नव्या पिढीला मार्गदर्शनपर ठरेल यात शंकाच नाही.

    Indian Business Legends

    125.00
    Add to cart
  • एकसंघ भारताचे शिल्पकार : सरदार वल्लभभाई पटेल

    वयाच्या तब्बल चाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्यलढ्यापासून अलिप्त राहिलेल्या सरदारांनी स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश केल्यावर त्यास मिळालेली ऊर्जा, गती, दिशा व अनुषंगाने बदललेली लढ्याची सर्वसमावेशक दशा याचे समग्र, सादयंत शब्दचित्रण लेखिकेने प्रभावीपणे, समर्थपणे चित्तारले आहे.
    महात्माजींच्या अहिंसेचा सार्थ अर्थ आणि हेतू सरदारांमुळे सिद्ध होतो. शारीरिक मानसिकदृष्ट्या समर्थ असूनही अहिंसेने ‘लढा देऊन’ संघटनशक्तीने विघटनशक्तीचे उच्चाटन करण्याचा पराक्रम ‘सरदारच’ करू जाणे या सर्वांचा शब्दवेल्हाळ परिचय करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.
    ‘अहिंसेचे जनकत्व’ जसे बापूंकडे जाते तसे भारताच्या अखंडतेचे मातृत्व सरदारांकडे जाते. अखंड, एकसंघ, एकात्म भारतीय संघराज्याच्या निर्माणाचा पुरूषार्थ घडवितांनाच्या घटना, प्रसंग घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे समग्र विवेचन परिणामकारकरित्या या पुस्तकात समर्पक व सहज सुलभ शब्दात आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

    Eksangh Bharatache Shilpkar : Sardar Vallabhbhai Patel

    110.00
    Add to cart
  • ग्रंथरुपी ग्रंथपाल

    ‘ग्रंथरुपी ग्रंथपाल’ या आत्मचरित्रपर लेख संग्रहात शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्रंथालयात कार्यरत असणार्‍या ग्रंथपालांच्या लेखांचा समावेश आहे.
    या मधील बहुसंख्य ग्रंथपालांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गरिबीची परिस्थिति, परंतु गरिबीवर मात करत सतत पुढील शिक्षण घेण्याचा ध्यास घेऊन बहुतेकांनी बी.लिब, एम.लिब पदव्या प्राप्त केल्या आहेत. एवढेच नव्हे तर नेट/सेट परीक्षा देखील उत्तीर्ण करुन कायमस्वरुपी नोकर्‍या प्राप्त केल्या आहेत तर अनेकांनी याही पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजली जाणारी पीएच.डी पदवी देखील प्राप्त केली आहे. या ग्रंथपालांनी त्यांच्या उच्च शिक्षणाचा उपयोग वाचकांना उत्तम संदर्भ सेवा देण्यासाठी केला आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालय सेवा देण्याचे पवित्र कार्य गेल्या दोन-तीन दशकांपासून करत आले आहेत. काही ग्रंथपालांना त्यांनी वाचकांना दिलेल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल पुरस्कारही सुध्दा प्राप्त झाले आहेत. अशा ग्रंथपालांच्या या यशोगाथा नवीन पिढीला प्रेरणादायी जरुर ठरतील.

    Grantharupi Granthapal

    250.00
    Add to cart
  • घनगडी

    Ghangadi

    499.00
    Add to cart
  • जिभाऊ : प्रा. डॉ. विजय पवार यांची चरित्रगाथा

    नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये ते ‘जिभाऊ’ या नावाने परिचित होते.
    साडेतीन दशकांचा काळ सरांच्या सहवासात राहिले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मी प्रत्यक्षपणे अनुभवले, त्यांचा विनम्र पण करारी स्वभाव. स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, दुसर्‍यांना सतत मदत करण्याची धडपड आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे नेण्याची त्यांची वृत्ती, मलाही फार आवडायची. म्हणून मी सतत त्यांच्या सोबत असायची.
    जेव्हा त्यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला तेव्हा त्यांच्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मला परिचय झाला. गरीब म्हणून लाचारी न पत्करता प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचं धाडस व कसबही त्यांच्याकडे होते. संपूर्ण आयुष्य ते स्वाभिमानाने जगले. त्यांच्या नावातच ‘विजय’ असल्यामुळे हार पत्करणे त्यांना कधी रुचलेच नाही.

    Jibharu : Prof. Dr. Vijay Pawar Yanchi Charitragatha

    150.00
    Add to cart
  • तेजस्वी प्रज्ञावंत

    प्राचीन काळी भारतवर्षात ब्रह्मयज्ञात बालकांना, शिष्यांना शिक्षण देण्याची परंपरा होती. तेथील विविध प्रकारच्या गहन संशोधनातून, लेखनातून, तत्त्वमय आचरणातून, गहन चिंतन-मननातून विविध बालकांचे रूपांतर प्रज्ञावंतांत झाले. आपल्या मुलांना/मुलींना विविध प्रज्ञावंताची ओळख झाली तर ते योग्य मार्ग पत्करू शकतील. आपल्या पाल्याला खेळ, संगीत, नाटक, कथा इत्यादी सर्वांची कला अवगत होणे आवश्यक आहे. लहान बालकांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अतिजागरूकतेने, संवेदनशीलतेने त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान देण्याकडे कटाक्ष ठेवावा. लहान बालके हीच भारतवर्षाची भविष्यकालीन संपत्ती असून, बालकांची क्षमता असतानादेखील त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवणे चुकीचेच ठरते. बुद्धीमत्ता, अंतर्गत आवडी-निवडीच्या नैसर्गिक सृष्टीतील बालके मौल्यवान रत्ने आहेत. बुद्धी नैसर्गिक दैवी शक्ती असली तरी तिचे सामर्थ्य, क्षमता वाढविणे पालकांच्या, गुरुजनांच्याच हातात असते. बुद्धी आणि ज्ञानसंपन्नता प्रगल्भतेचे लक्षण आहे. लहान बालकांना प्रज्ञावंतांची ओळख लहान वयातच व्हावी, त्यांनी विविध गुणांचे जोपासून त्यात वाढ करावी, याच निरामय हेतूसाठी सदरील ग्रंथलेखनाचे प्रयोजन.

    Tejaswi Pradnyawant

    175.00
    Add to cart
  • तो हा पांडुरंग – पी. ई. तात्या पाटील

    पांडुरंगा, तुम्ही केळीच्या पानासारखे खुल्या दिलाचे आहात, मात्र बेभान होऊन अविचाराने जीवनात काहीही करु नका. वादळाच्या, गारपिटीच्या तडाख्यानं केळीची पानं टरा् टरा् फाटतात आणि मग त्या केळी पानांचया झिरमाळ्या, तोरणं होतात. केळी बागांसारखी वादळाला अडविण्याची, गारांना अंगाखांद्यावर नाचविण्याची जोखीम घेऊ नका. समाजाकारण, राजकारण करण्याची तुमची इच्छा आहे पण ते केळीच्या पानासारखे अंगावर संकट झेलणारे राजकारण, समाजकारण करु नका. तर ते चिंचेच्या पानासारखे सुरक्षित असू द्या.

    To Ha Pandurang – P. E. Tatya Patil

    150.00
    Add to cart
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर

    ‌‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर’ हे सुंदर पुस्तक वाचकांसमोर आणल्याबद्दल लेखिका वर्षा भरत शिरसाठ यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
    खरे तर रमाईच्या त्यागावर आज तुमचे आणि आमचे सुंदर जीवन सजलेले आहे. तुम्ही आणि आम्ही खात असलेली भाकर ही रमाईने तयार केलेली आहे. आमचे वैभव हे रमाईच्या प्रचंड अश्रुंनी मिळालेली किंमत आहे. तुमचे-आमचे ऐश्वर्य हे रमाईच्या चार मातीत गेलेल्या लेकरांमुळे आहे. म्हणून रमाईचा त्याग आपण कधीही विसरायला नको. लेखिका वर्षा भरत शिरसाठ यांनी हे सारे आपल्या छोट्याशा पुस्तिकेमध्ये सुंदर पद्धतीने गुंफलेले आहे. रमाईच्या लेकरांच्या जाण्याचा प्रसंग हा हृदय पिळवटून टाकतो. डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागतात. पुस्तक पुढे जाऊन आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडते. रमाईच्या त्यागमय जीवन प्रवासात पुस्तिका कशी संपते, हे आपल्याला सुद्धा कळत नाही. या सुंदर पुस्तिकेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, हे आवाहन करतो व वर्षा शिरसाठ यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो !

    – प्रा. शुक्राचार्य गायकवाड

    Tyagamurti Mata Ramabai Ambedkar

    70.00
    Add to cart
  • दखल

    Dakhal

    175.00
    Add to cart
  • नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य (जीवन व कार्य)

    स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योतर काळात भारतीय राजकारणात नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांनी भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रस्तुत पुस्तकात त्या त्या काळातील सामाजिक-राजकीय व्यवस्थेचे विवेचनासोबतच जिल्ह्यातील बदलत गेलेले राजकारणाचाही समावेश होतो. नाशिक लोकसभा मतदारसंघ अत्यंत जागरुक व संवेदनशील असल्याचे जनतेने वेळोवेळी दाखवून दिले आहे. गेल्या 70 वर्षातील लोकसभेच्या उमेदवारांची माहिती, जिल्ह्यातील राजकीय पक्ष, चिन्ह, विविध नेते, निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या वेळेच्या निवडणुकीतील वातावरण यांचाही यथायोग्य समाचार लेखकाने प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे.

    नाशिक जिल्ह्यातील लोकसभा आणि राज्यसभा यांचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रदीप देशपांडे यांनी प्रस्तुत लिखाणातून घेतला आहे.

    सदरील ग्रंथ नाशिक, मालेगांव, धुळे या जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते सामाजिक, राजकीय कार्याचे अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच पत्रकार, राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि जिज्ञासूंकरीता उपयुक्त ठरेल.

    Nashik Jilhyatil Sansad Sadsya (Jeevan V Karya)

    350.00
    Add to cart
  • निवडक वाटचाल

    Nivadak Vatchal

    45.00
    Add to cart
  • पंढरीनाथ पाटील – राजकीय व सामाजिक कार्य

    भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात अनेकांनी नि:स्वार्थीवृत्तीने सहभाग घेवून लाठीमार, तुरुंगवास, गोळीबार सहन केलेला आहे. हे कार्य करत असतांना त्यांनी कुटूंबाचा, नातेवाईकांचा कोणताही विचार न करता स्वातंत्र्य मिळविणे हेच आपले ध्येय असल्याचे सिद्ध करुन दाखविले. अशा सामान्य लोकांसाठी ‘स्वातंत्र्य लढयाचे पाईक’ असा शब्द प्रयोग वापरणे योग्य ठरेल. असे पाईक खेडयांपासून ते शहरीभागांपर्यंत निर्माण झालेले होते. त्याचाच एक भाग म्हणजे बुलडाणा जिल्हयात कार्यरत असणारे पंढरीनाथ पाटील हे गांधीवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. घरातील आर्थिक अडचणींवर मात करुन घेतलेले शिक्षण हे त्यांना पुढील काळात अत्यंत उपयोगी ठरल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ पाटील यांनी गांधी कालखंडातील असहकार, सविनय कायदेभंग व भारत छोडो हया तिन्ही आंदोलनात केलेल्या कार्यावर लेखकांनी दूर्मिळ माहिती उजेडात आणलेली आहे. पंढरीनाथ पाटीलांनी बेळगाव, चिखली, जस्तगाव, कल्याण, वर्धा, पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी ठिकाणच्या परिषदांमध्ये मांडलेल्या विचारांचा आवर्जून हया संदर्भ ग्रंथात उल्लेख केलेला आहे. त्यावरुन पंढरीनाथ पाटील हे बौद्धिकतेची कास धरणारे व्यक्तीमत्व होते असे निश्चित सांगण्यात येते.

    पंढरीनाथ पाटील हे स्वातंत्र्य आंदोलनाचे पाईक तर होतेच पण त्याच बरोबर सामाजिक जागृतीलाही प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व होते. विधवा पुर्नविवाह व अस्पृश्योद्धारासाठी केलेल्या कार्याची नोंद घ्यावी लागेल. स्वत:च्या पुढाकाराने त्यांनी दोन बालविधवा मुलींचा पुर्नविवाह घडवून आणला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसमवेत अस्पृश्योद्धाराचे कार्य केले. याशिवाय अंबादेवी मंदिर खुले, वर्‍हाड प्रांतीय अस्पृश्य महार परिषद, तुरुंगात अस्पृश्यांवर होणारा सामाजिक अन्याय, अस्पृश्यता निवारण मंडळाद्वारे कलेले कार्य विस्तृत स्वरुपात मांडलेले आहे. पंढरीनाथ पाटील हयांचे अस्पृश्य समाजातील अनेक मित्र असल्याचे नावानूसार उल्लेख दिल्याने भर पडली आहे. थोडक्यात विदर्भात अस्पृश्य निवारण्यासंदर्भातील एक कृतिशील समाजसुधारक म्हणून पंढरीनाथ पाटीलांचा उल्लेख करावा लागेल.

    Pandharinath Patil – Rajkiya & Samajik Karya

    350.00
    Add to cart
  • पीटर ताबीची …आग्रह ‘जीवन’ शिक्षणाचा!

    ”I am pleased, honoured and humbled to be selected from thousands of applicants from around the world to be one of the Top 10 Finalists for the 2019 Prize! I appreciate this great recognition on behalf of all the hardworking teachers throughout the world whose great achievements go unnoticed. This nomination has made me view teachers as superstars that the world needs to recognize. My enormous salute goes to all of this year’s finalists who have transformed and are transforming the lives of learners and that of the society in different ways. Very special thanks to the Global Teacher Prize Team for selecting me.”

    Peter Tabichi – Aagrah Jivan Shikshanacha

    95.00
    Add to cart
  • प्रबोधनकार संत तुकाराम

    Prabodhankar Sant Tukaram

    325.00
    Add to cart
  • बहुआयामी : जयवंत दळवी

    जयवंत दळवी म्हणजे साहित्यसृष्टीत अवतरलेले बहुआयामी सुंदर वास्तव!! दळवींनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने साहित्यातील अनेक प्रकार हाताळलेत. आणि प्रत्येक साहित्यप्रकारात आपल्या ‘परीसस्पर्शाने’ सुवर्णमयी आदर्श निर्माण केलेत. दळवींची प्रतिभा साहित्यप्रवाहात अखंड प्रवाहित राहिली. तिला आटणे माहित नाही. त्यामुळे दळवींच्या अनेक साहित्यकृती जन्माला आल्या अनेक कथा, कादंबर्‍या, अनेक नाटके, अनेक कलांतर-प्रकारांतर, प्रवासवर्णन सदरलेखन यामुळे दळवींचे आपोआपच बहुआयाम सिद्ध झालेत.

    Bahuaayami : Jaywant Dalvi

    195.00
    Add to cart
  • भारतीयांच्या हृदयातले सरदार वल्लभभाई पटेल

    वयाच्या तब्बल चाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्यलढ्यापासून अलिप्त राहिलेल्या सरदारांनी स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश केल्यावर त्यास मिळालेली ऊर्जा, गती, दिशा व अनुषंगाने बदललेली लढ्याची सर्वसमावेशक दशा याचे समग्र, सादयंत शब्दचित्रण लेखिकेने प्रभावीपणे, समर्थपणे चित्तारले आहे.

    महात्माजींच्या अहिंसेचा सार्थ अर्थ आणि हेतू सरदारांमुळे सिद्ध होतो. शारीरिक मानसिकदृष्ट्या समर्थ असूनही अहिंसेने ‘लढा देऊन’ संघटनशक्तीने विघटनशक्तीचे उच्चाटन करण्याचा पराक्रम ‘सरदारच’ करू जाणे या सर्वांचा शब्दवेल्हाळ परिचय करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.

    ‘अहिंसेचे जनकत्व’ जसे बापूंकडे जाते तसे भारताच्या अखंडतेचे मातृत्व सरदारांकडे जाते. अखंड, एकसंघ, एकात्म भारतीय संघराज्याच्या निर्माणाचा पुरूषार्थ घडवितांनाच्या घटना, प्रसंग घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे समग्र विवेचन परिणामकारकरित्या या पुस्तकात समर्पक व सहज सुलभ शब्दात आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

    भारतीयांच्या हृदयातले ‘सरदार’ वल्लभभाई पटेल हे चरित्र्यपुष्प सरदारांच्या अनेकविध लोकदुर्लभ गुणवैशिष्ट्यांचा अजरामर कस्तुरीसुगंध भारतीय वाचकांपर्यंत खचितच पोहचविणार आहे यात शंका नाही.
    या पुस्तकाच्या अनुषंगाने सरदारांवरील मराठी वाङ्मयात नक्कीच भर पडली आहे. सदर पुस्तक हे समस्त भारतीयांना सरदारांच्या विषयी असलेल्या जिज्ञासेला नक्कीच पूर्ण करेल.

    Bharatiyancha Hridyatle Sardar Vallabhabhai Patel

    399.00
    Add to cart
  • मराठी साहित्यातील ‘कर्ण’ जीवन

    महाभारतातील पांडवांच्या पक्षाला ‘कृष्ण’ महत्वाचा आहे त्याप्रमाणे कौरवांच्या पक्षाला ‘कर्ण’ महत्वाचा आहे. दोघांच्याही भूमिकांनी महाभारताच्या जडणघडणीत मोलाचे कार्य केले आहे. कृष्णजीवना इतकेच ‘कर्णजीवनाचे’ आकर्षण प्रतिभावानांना नेहमीच निर्माण झाले आहे. कर्णजीवनात त्याच्या व्यक्तिमत्वातील ‘सुष्ट आणि दुष्ट’ वृत्तीचा संघर्ष आहे. त्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोन भिन्नतेतून ‘कर्णजीवन’ विविधांगी झाले. साहित्य वाङ्मय प्रकारातून ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न प्रतिभावानांनी कसा केला आहे. याचे अभ्यासपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तक मांडणीतून लेखिकेने केला आहे. रसिक वाचकांना मराठी साहित्यातील कादंबरी, नाटक, चरित्रग्रंथ, ललितगद्य ग्रंथ इत्यादी वाङ्मय प्रकारांतील प्रमुख 15 ग्रंथातील आशयाद्वारे ‘कर्णजीवन’ एकत्रितपणे समजून देण्याचा लेखिकेचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. अभ्यासकाच्या भूमिकेतून कर्णजीवनावर आधारित पंधरा साहित्यग्रंथाचे केलेले हे विश्लेषण रसिक वाचकांना त्या-त्या ग्रंथवाचनाचा पुनःप्रत्यय देणारे ठरणार आहे.
    पीएच.डी. साठी सादर केलेल्या प्रबंधाचे पुस्तकरुपाने डॉ. वैशाली गालापुरे प्रकाशन करीत असल्याचा आनंद आहे. त्यांचे अभिनंदन! रसिक वाचक त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करतीलच!
    ‘शुभास्ते पंथानः सन्तु । शुभं भवतु ॥’

    Marathi Sahityatil ‘Karna’ Jeevan

    250.00
    Add to cart
  • महात्मा ध्यास व्हावेत तरुणांचे

    पूजा व प्रार्थनेसाठी आदर्श गुणांनी संपन्न अशी सगुण मूर्ती डोळ्यासमोर असावी लागते. यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेची निवड करता येऊ शकते. समाज ज्यांच्यासाठी मंदिर होते, सत्य हाच ज्यांचा परमेश्वर होता, सेवा ज्यांची प्रार्थना होती, अहिंसा ज्यांची भक्ती होती, मानवता टिकवण्याचा ज्यांचा संकल्प होता, नैतिकता ज्यांचा श्वास होता आणि निष्काम कर्म ज्यांचा ध्यास होता त्या राष्ट्रपित्या महात्म्याच्या चारित्र्याची निरलस व निष्पाप मनाने साधना करणे म्हणजे पूजा किंवा प्रार्थना ठरू शकते. पूजा चरित्राची व्हावी, चित्रांची नव्हे. महात्म्याच्या चरित्रांचे वाचन व मनन व्हावे हा प्रामाणिक हेतू “महात्मा – ध्यास व्हावेत तरुणांचे” या पुस्तिकेचा आहे.

    80.00
    Add to cart
  • महाराजा सयाजीराव गायकवाड

    “उनके विजन में भारतीय विचारधारा की अक्षुण्ण परंपरा और आधुनिक विचारों के समन्वय की अद्भुत शक्ति है| मुझे लगता है यही गुण एक शासक के रूप में उन्हें दूसरों से अलग करता है!”

    – साहित्य नोबेल पुरस्कृत रवींद्रनाथ टैगोर

    “मला त्यांनी जे शिक्षण दिले. त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांच्याइतके अस्पृश्य जातीसाठी दुसरे कोणीही कार्य केले नाही!”

    – संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    मी बनारस हिंदू विद्यापीठाचा ‌‘महाराजा सयाजीराव गायकवाड अध्यासनाचे’ पहिले प्राध्यापक होतो. एवढेच नाही तर सयाजीराव त्या विद्यापीठाचे कुलपती होते. त्या विद्यापीठाच्या उभारणीत महाराजांचा मोठा वाटा आहे!

    – राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

    श्रीसंत तुकाराम हे सयाजीरावांचे आवडते कवी होते. त्यांनी माझ्याकडून अनेक वेळा तुकारात गाथा वाचून घेतली. एकदा बडौदा संस्थानात दुष्काळ पडल्यावर तुकोबांच्या गाथ्यातील दुष्काळावरील जे अभंग होते. त्यावर चर्चा करून उपायाचा शोध घेतला!

    – ‌‘रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई

    “महाराष्ट्रातील शंभर वर्षातील कर्तृत्ववान व्यक्तीत पहिलं नाव घ्याव लागत सयाजीरावाचं.”

    – इतिहासाचार्य राजवाडे

    Maharaja Sayajirao Gaikwad (Khandeshna Ahirani Dhorkya Raja Jhaya)

    275.00
    Add to cart
  • माझी सावित्रीमाई आणि आजची स्त्री

    होय. मी ही म्हणेल, माझी सावित्रीमाई जगाची शिलेदार आहे. आणि आम्हा स्त्रीजातीसाठी मिळालेली अमूल्य अशी जीवनदायिनी आहे. माझी सावित्रीमाई म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी आपल्या देशात पहिली शाळा सुरू करणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पत्नी या भारताची पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवयित्री, साहित्यिक, भारताची पहिली धर्मपरिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारणारी महिला म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय.
    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सर्वांना आणि सर्वच वाचकांना ज्ञात आहे. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य सर्वांना माहित आहे. तरी पण ‌‘माझी सावित्रीमाई आणि आजची स्त्री’ या पुस्तकात काय वेगळ असणार. असे असंख्य प्रश्न तुम्हा वाचकांना नक्कीच पडले असणार.

    Mazi Savitrimai Aani Ajachi Stree

    55.00
    Add to cart
  • शामल

    Shamal

    130.00
    Add to cart
  • श्री संत रत्नमाला

    • संसारी जनांपेक्षा साधक श्रेष्ठ, साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ, सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ मानले जातात. संत ही पदवी सर्वात मोठी आहे. संत हे पवित्रतेमध्ये गंगेपेक्षा महान आहेत. – ह.भ.प. न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री
    • अंतर्यामीच्या आमल अंतरात आसणार्‍या अखिल अल्पमती अन्तःकरणस्थांच्या अपरंपार, अवर्णनीय आनुकंपेमुळेच अशांच्या आत्मोध्दारास्तव ईश्वराने, आपल्या आचरणाने अज्ञानांपासून आत्मज्ञान्यांपर्यतांना आनंदविणार्‍या आत्मान्तःस्थांना अवनीवर अवतरविलेले आहे. – ह.भ.प. प्रज्ञाचक्षु मुकूंदकाका जाटदेवळेकर
    • माणसाच्या मनातील सत्प्रेरणा जागृत करणार्‍या साध्या सात्विक भक्तीची शिकवण संतांनी समाजाला दिली. – ह.भ.प. वेदांताचार्य नारायण महाराज
    • मानवी जीवनामधे जीवन प्रवास करत आसतांना अनेक मार्ग, दिशा, वळणे लागतातच. असा खडतर चढ-उतार पार करतांना संतांची संगती असेल तर मार्ग सुखरूपपणे पार पडतो. – ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कराळे
    • संतांची चरित्रे उद्बोधक असतात. ही चरित्रे माणसाच्या मनावर चांगले संस्कार करणारे एक फार श्रेष्ठ साधन आहे. – ह.भ.प. रामगिरी महाराज
    • संत सर्वांचे मंगल, सर्वांचे भले व सर्वांना सुखी करतात. संतांच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी आपापसात स्नेहाने, परस्परांशी प्रेमाने चांगला व्यवहार व चांगले कर्म करावे. – ह.भ.प. रामायणाचार्य ढोक महाराज
    • संतांचे कार्य व त्यांच्या स्मृती समाजाला भविष्यकाळात अतिशय गरजेच्या व मार्गदर्शक ठरणार आहेत. – अ‍ॅड. भास्करराव आव्हाड
    • संत महंतांना समाजचिंतक व समाज सुधारकांची दृष्टी लाभलेली असते. त्यांचे कार्य अखील मानवी जीवनाला दिशादर्शक व प्रेरणादायी आसते. – प्रा. डॉ. लिला गोविलकर
    • परतत्वाचा चिरंतन निवास आसलेला गर्भगिरी ही सिध्दांची, संतांची आणि दृढश्रध्दावंतांची सात्विक भूमी. या भूमीतील चिरनिवासी, संजीवक परतत्व स्वयंस्फुरकतेने साकारते आणि योगीराज अवतरत असतात. – प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

    Shree Sant Ratnamala

    150.00
    Add to cart
  • श्रीरामभक्त हनुमान

    Shrirambhakta Hanuman

    150.00
    Add to cart
  • श्रीसंत आदिशक्ती ॥मुक्ताई गाथा॥ (अर्थ व संक्षिप्त चरित्रासह)

    श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरती

    नित्यमुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ।
    आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते ॥धृ॥
    विठ्ठल-रूक्मिणी आईबाप तंव कठीण व्रतचरणी ।
    निवृत्ति सोपान ज्ञानदेव हे बंधू बुधवाणी ।
    संतमंडळी मुक्ताई तूं सान ज्ञानवंते ॥1॥
    शिष्यपुत्र तंव चांगदेव हा चौदा शतकांचा ।
    विसोबा खेचर शिष्योत्तम हरी गर्व नामयाचा ।
    मुक्ताई तूं स्वयंमुक्त भवबंध विमुक्ते ॥2॥
    प्रथम विरक्ति निवृत्तीची ज्ञानवंत होणे ।
    सायुज्याच्या सोपानाने मुक्त श्रेष्ठ होणे ।
    मुक्ताई तूं हीच शिकवणी नित्य आम्हा दे ॥3॥
    संतांची तूं मुक्त विरक्ति भक्तांची भक्ति ।
    ज्ञानाचे गे ज्ञान आणि तूं कर्मयोग मुक्ति ।
    ‘दाशरथी’ची साध्य-साधना तूंच सर्व माते ॥4॥

    – अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरीकृत (दाशरथी)

    Shrisant Aadishakti || Muktai Gatha || (Artha V Sankshipta Charitrasah)

    350.00
    Add to cart
  • सागरवीर

    खेळ खेळता खेळता त्यात स्वतःला झोकून देवून आपली, त्या खेळाची प्रतिष्ठा टिकवत, थोरामोठ्यांचा आदर ठेवणार्‍या बिनधास्त, अतिउत्साही पण तेव्हढ्याच संयमी व्यक्तिमत्वाची ही प्रेरणादायी कहाणी…
    ऑलिंपिक सारख्या स्वप्नांची उमेद आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट घेणार्‍या चिमुकल्या स्पर्धकाची, मुलाच्या छंदासाठी डोळ्यात तेल घालून क्षणाक्षणाला जागृत राहणार्‍या त्याच्या कुटुंबियांची आणि त्याच्या भोवती तयार झालेल्या सक्षम वलयाच्या झगमगाटाला लागलेल्या गालबोटाची ही कहाणी…!
    चुकलेल्या टाईमिंग ची कहाणी…

    Sagarveer

    250.00
    Add to cart
  • -50%

    सुबोध श्री पंतगुरुचरित्र पोथी

    Subodh Shri Pantgurucharitra Pothi

    Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.
    Add to cart
  • सुवर्ण संतरत्न (चरित्र संग्रह)

    Suvarna Santratna (Charitra Sangrah)

    100.00
    Add to cart
  • स्मृती किरणे

    प्रस्तुत ग्रंथ म्हणजे प्राचार्य डॉ. गजानन महादेव तल्हार यांच्या जीवनातील आठवणींचा जागर आहे. या आठवणी म्हणजे त्यांचे आत्मचरित्र किंवा चरित्र ही नाही. हे खरे असले तरी ऐंशी नव्वदच्या दशकातील खान्देशातील शैक्षणिक चळवळीच्या दिशा आणि दशा यांचा इतिहास अधोरेखित करण्याचा एक प्रयास आहे. डॉ. ग. म. तल्हार यांच्या आठवणी स्व’चा इतिहास सांगत असल्या तरी सभोवतालचे शैक्षणिक पर्यावरण विलक्षण आत्मीयतेने रेखाटतात, हे या ग्रंथाचे बलस्थान आहे .
    प्राचार्य डॉ. ग. म. तल्हार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. विटे जि. सांगली, रत्नागिरी, फैजपूर आणि मु. जे. कॉलेज, जळगाव अशा विविध ठिकाणी वाणिज्य विषयाचे अध्यापन करतांना एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. धरणगाव आणि बाहेती महाविद्यालय जळगाव येथे एकूण 18 वर्षे प्राचार्यपद भूषविले. प्राचार्यांचे प्राचार्य म्हणून ते ओळखले जातात.
    प्राचार्य तल्हार यांनी जीवनप्रवासात अनेक चढउतार पाहिले. संघर्षाचे क्षण अनुभवले. संकटांवर मात केली. अत्यंत जीवघेण्या हृदय विकारातूनही सहीसलामत सुखरुप वाचले. हा जीवनप्रवास त्यांना जसा आठवला तसा स्मरणरंजनासारखा शब्दबद्ध केला आहे. त्यांच्या सोबत काम केलेल्या सहकार्‍यांचेही लेख तल्हार सरांचे व्यक्तिमत्व साकार करतात.
    कोणताही आडपडदा न ठेवता, आत्मस्तुतीचा दोष न पत्करता अत्यंत प्रांजळपणे केलेलं हे आत्मनिवेदन आहे. परिश्रम आणि पुरुषार्थाच्या बळावर माणूस यशाचे शिखर गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राचार्य तल्हारांचा हा जीवन प्रवास ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता॥’ या संत वचनानुसार सत्याच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा वाचकांना यातून मिळेल याचा मला विश्वास आहे.

    – ह.भ.प. प्रा. सी. एस्. पाटील

    Smruti Kirane

    150.00
    Add to cart