• भारतीय सामाजिक समस्या

    मानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा समाजाचा कोणताही कालखंड घेतला तर असा कोणताच कालखंड नाही की ज्यात सामाजिक समस्या नव्हत्या. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, आदीम समाजापासून तर 21 व्या शतकातल्या प्रगत समाजापर्यंत सामाजिक समस्या नेहमीच आढळून येतात.

    मात्र सामाजिक समस्या सार्वत्रिक व सार्वकालीन असल्या तरी स्थळ व काळानुसार त्याचे स्वरुप बदलत जाते. आदिवासी समस्या प्रगत समाजाच्या समस्यापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण समाजाच्या समस्या नागरी समाजाच्या समस्येपेक्षा भिन्न असतात भारतीय सामाजिक समस्यांची ओळख व्हावी.

    सदरील पुस्तकात सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, भारतातील लोकसंख्येची समस्या, ग्रामीण भारतातील समस्या, मद्यपानाच्या समस्या, भ्रष्टाचार, दहशतवादाची समस्या, भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या, नागरीकरणाशी संबधित समस्या, असहिष्णुता दंगली आणि गुन्हे इ. घटकांची विद्यार्थ्यांना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ओळख व्हावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

    Bhartiy Samajik Samasya

    375.00
    Add to cart
  • भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि सामाजिक परिवर्तनाचा इतिहास

    प्राचीन काळी आशिया व युरोप यांच्यातील व्यापार प्रामुख्याने भूार्गे चालत असे. हिंदुस्थानवर सर्वात प्रथम आक्रमण पर्शियन साम्राज्याचे झाले. बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाबचा काही भाग हे पर्शियन साम्राज्यात समाविष्ट झाले होते. त्यानंतर अलेक्झांडरने आक्रमण करून हिंदुस्थानचा काही भाग आपल्या साम्राज्याला जोडला. पुढे शक, हुण, कुशाण, तुर्क आणि मोगल अशा अनेकांची आक्रमणे येथे झाली. 15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. प्रबोधनामुळे धर्मसत्तेचे जोखड झुगारून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुक्त समाजव्यवस्था निर्माण झाली. सर्वप्रथम वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी इ.स. 1498 मध्ये भारतात आला. त्यापाठोपाठ पाश्चात्य प्रवासी व व्यापार्‍याकरीता व्यापारी कंपन्यांचा ओघ सुरू झाला. या प्रयत्नात पोर्तुगाल,स्पेन, स्वीडन, फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड इ. राष्ट्रे आघाडीवर होती. भारतातील गोंधळाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अखेर इंग्रजांना यश आले. इंग्रजांची राजवट अन्यायी, अत्याचारी, जुलूमी होती. इंग्रजांनी राज्य करण्यासाठी त्यांच्या हितासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्यात. इंग्रजी शिक्षणाचे द्वार भारतीयांना खुले केले. परिणामी भारतीयांना पाश्चात्य ज्ञान मिळून भारत पारतंत्र्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतीयांनी आपापल्या परिने स्वातंत्र्यलढा सुरू केला. सामाजिक व राजकीय लढे देखील सुरू झाले. सरतेशेवटी ब्रिटीशांच्या जुलूमी सत्तेचा शेवट होऊन भारत स्वतंत्र झाला.

    Bharatiy Swatantrya Andolan ani Samajik Privartanacha Itihas

    425.00
    Add to cart
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1858 ते 1947)

    ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ.स. 1757 मध्ये भारतात आपली सत्ता स्थापन केली, परंतु इ.स. 1857 मध्ये भारतीय संस्थानिकांनी कंपनीच्या विरोधात उठाव केल्यामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आली व येथे ब्रिटिश राजसत्ता स्थापन झाली. पुढे भारतात राष्ट्रवादाचा उदय होऊन इ.स. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरु केली. हीच चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळ होय. या चळवळीचे नेतृत्त्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांनी केले. याच चळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस व क्रांतिकारकांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. शेवटी इ.स. 1947 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातला स्वातंत्र्य मिळाले. या ग्रंथात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

    Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1858 te 1947)

    350.00
    Add to cart
  • भूरुपशास्त्र

    भूरूपशास्राचा अभ्यास भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. भूरूपशास्रातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. भूरूपशास्र हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. भूरूपशास्रातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील ॠशेोीहिेश्रेसू हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा मला विश्वास आहे.

    Bhurupshastra

    550.00
    Add to cart
  • महाराष्ट्र पर्यटन

    Maharashtra Paryatan

    250.00
    Add to cart
  • महाराष्ट्र प्रशासन

    Maharashtra Prashasan

    195.00
    Add to cart
  • महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल

    भारतात महाराष्ट्र राज्याचे स्थान वैशिष्ट्येपूर्ण आहे. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचे राज्य आहे. मुंबई बंदरामुळे भारताने पश्चिमेकडील देशांशी सहजरित्या व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले होते. त्याचप्रमाणे पूर्वेकडील देशांशीदेखील व्यापार वाढत आहे. शेतीवर आधारीत उद्योगधंद्याना शेतीमधूनच कच्चा माल उपलब्ध होतो. महाराष्ट्राच्या शेती अर्थव्यवस्थेत तृणधान्ये, कडधान्ये, अन्नधान्ये, तेलबिया, फळफळावळ व नगदी पिके महत्वाची आहेत. शेती भारताच्या व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा मूलाधार आहे. शेती व्यवसायामुळे अनेक मूलभूत गरजा भागविल्या जातात. भारतात लोहखनिजाचा अंदाजे साठा 1346 कोटी टनांचा आहे. यापैकी 20% साठा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विषम वितरणामुळेच व्यापाराची सुरवात झालेली आहे. आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञान व जागतिकीकरणामुळे व्यापाराची एक नवीन संकल्पना उदयास आल्याने जगातील अनेक देशांनी व राज्यांनी एकमेकाशी सहकार्य करार केल्याने व्यापाराची एक नवीन पद्धत रुजू लागली आहे. अभ्यासक्रमातील सर्व संज्ञा व संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य वाचकाला, विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलाची तोंडओळख व्हावी हा या पुस्तकामागील उद्देश आहे. त्यासोबत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण स्वतंत्र पद्धतीने लिहिलेले असल्याने पुस्तक सुटसुटीत आहे.

    Maharashtracha Arthik Bhugol

    160.00
    Add to cart
  • महाराष्ट्रातील किल्ले सांस्कृतिक योगदान

    कोणताही समाज हा साहित्यावर टिकतो, तो केवळ पूजा-पाठ आणि कर्मकांड यांच्यावर टिकत नसतो. साहित्य हा समाजाचा मूळ पाया असतो. तो दृढ करण्याचे महत्वाचे कार्य मध्ययुगीन काळात दुर्गांनी केले. हेमाद्रिचा चर्तुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ दौलताबादच्या किल्ल्यात लिहिला गेला. जैनांचा पहिला ज्ञानकोश याच दुर्गावर कलानिधी वैद्यनाथ यांनी तयार केला. इ.स.1493 च्या सुमारास जैन महाकवी जिनदास आणि पुण्यसागर यांनी हरिवंश पुराणाची रचना केली. हा ग्रंथ 67 अध्यायांचा असून त्यात अकरा हजार ओव्या आहेत. या ग्रंथातून जैन परंपरेत श्रीकृष्णाची असलेली व्यक्तीरेखा महाराष्ट्राला समजू शकेल. केशव याने वैद्यकशास्त्रावर तर त्याचा पुत्र बोपदेव याने व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, साहित्यावर तीन, भागवत तत्त्व विशद करण्यासाठी तीन आणि तिथी निर्णयावर एक इतक्या ग्रंथ रचना स्वत: केल्या. बागलाणची राजधानी मुल्हेर किल्ल्यावर इ.स.1610 मध्ये कवी मधुकर याने कथा कल्पतरू हा ग्रंथ पूर्ण केला. तो मुल्हेरचा उल्लेख वाटिकानगर, मयुराचल असा करतो. त्याच्या ग्रंथातून तत्कालिन बागलाणच्या राजाच्या व मुल्हेर किल्ल्याच्या वैभवाची व समृद्धीची कल्पना येते. पन्हाळा येथे पंडित रामचंद्र अमात्य यांनी मराठा राजनीतीवरील आपला प्रसिद्ध ग्रंथ आज्ञापत्र हा लिहिला. लोकमान्य टिळकांनी सिंहगडावर आर्क्टिक होम इन द वेदाज आणि गीतारहस्य या दोन प्रसिद्ध ग्रंथांच्या मुद्रण प्रती येथेच तयार केल्या. गोपाल नायक, शारंगदेव, कवी नरेंद्र यांच्या कला दुर्गातच विकसित झाल्या म्हणून दुर्ग हे साहित्य आणि कलेचे सृजनदाते होते असे म्हटले पाहिजे.

    Maharashtratil Kille Ani Sanskrutik Yogdan

    395.00
    Add to cart
  • महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक चळवळी

    महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सुरू झालेली पहिली सामाजिक चळवळ म्हणून सत्यशोधक चळवळीचा विचार होतो. तत्कालिन समाज व्यवस्थेत ब्राह्मण पुरोहित वर्गाचे वर्चस्व खूप वाढले. त्यांनी बहुजन समाजाला रूढी, प्रथा, परंपरा तसेच अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून ठेवल्याने सत्यशोधक चळवळीने त्याचा प्रचंड विरोध केला. धार्मिक परंपरावादाला व अंधश्रद्धेला आव्हान देणारी तसेच मुस्लीम समाजात आधुनिक सुधारणावादाचे बिजारोपण करून प्रबोधन घडवून आणण्यात मुस्लीम जगतातील पहिली चळवळ म्हणून मुस्लीम सत्यशोधक चळवळीचा उल्लेख करावा लागतो. हिची स्थापना महाराष्ट्रात पुणे येथे 22 मार्च 1970 रोजी हमीद दलवाई यांनी मुस्लीम युवकांच्या बैठकीत केली. यासोबतच दलित चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आदिवासी चळवळींचा देखील उल्लेख करावा लागेल. क्रांतीकारी परिवर्तनवादी चळवळ म्हणून महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात भारताच्या इतिहासात दलित चळवळीचे योगदान आहे. प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर कालखंडात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने गती घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अनेक प्रयत्न झाले. याचप्रमाणे बिहार व अन्य राज्यांतही आदिवासी चळवळी अत्यंत तीव्र व व्यापक स्वरूपाच्या होत्या. पण महाराष्ट्रात मात्र तसे आढळून येताना दिसत नाहीत.

    Maharashtratil Rajkiya V Samajik Chalwali

    150.00
    Add to cart
  • मानव संसाधन विकास

    Manav Sansadhan Vikas

    135.00
    Add to cart
  • मानवी हक्क

    मानव म्हणून जगण्यासाठी आवश्यक, मानवाच्या नैसर्गिक अस्तित्वाशी संबंधित अशा सर्व अधिकारांना मानवाधिकार म्हणतात. प्रत्येकात आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी, आपले व्यक्तिगत गुण, बुद्धिमत्ता व स्वत्त्व भावनेची जपणूक करण्यासाठी मानवाधिकाराची आवश्यकता असते. मानवी हक्कांमध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क. अन्न, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत. स्वतंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधीची चर्चा हे हक्क करतात. तसेच मानवी हक्कांना नैतिक हक्क. तसेच कायदेशीर हक्क असेही म्हणता येईल.

    या ग्रंथात मानवाधिकार, बालविकास, महिला विकास, तरुणवर्गाचा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वृद्धांचे कल्याण, कामगार कल्याण, अपंग कल्याण, लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण मूल्ये आणि नैतिकता इ. प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

    Manavi Hakka

    695.00
    Add to cart
  • मानवी हक्क

    Manavi Hakka

    150.00
    Add to cart
  • मानवी हक्क : सद्यस्थिती आणि आव्हाने

    मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करुन घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जेा परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास द्धि असतो, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो रुढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसर्‍याच्या शिकवणीने वागत नाही, कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवीत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता, त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरुन जात नाही, दुसर्‍याच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.

    – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    Manvi Hakk Sadhasthiti ani Avahane

    595.00
    Add to cart
  • मूलभूत अर्थशास्त्र

    अर्थशास्त्र हे एक गतिमान शास्त्र आहे. काळाबरोबर त्याचे स्वरूप आणि व्याप्ती बदलत गेली. अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत अशा आर्थिक व्यवहारांचे अध्ययन करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवी जीवनात धन किंवा संपत्तीला अनन्य साधारण महत्त्व अहे. विकासाबरोबर मानवाच्या गरजांचे स्वरुप बदलत गेले आणि व्याप्ती विस्तारत गेली. गरजांची अमर्यादितता आणि साधनांची मर्यादितता व पर्यायी वापराची शक्यता यामुळे मानवासमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांची मानवाला आपल्या पातळीवर सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रश्नांची सोडवणूक करताना वर्तमान काळाबरोबर भविष्यकालीन विकासाचाही त्याला विचार करावा लागतो. आर्थिक क्रियातून धन किंवा संपत्तीची प्राप्ती, त्यातून स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणात वाढ, दुर्मिळ अशा साधनसामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त वस्तू व सेवांचे उत्पादन आणि जास्तीत जास्त गरजांची पुर्तता, अर्थव्यवस्थेचा विकास आणि वृद्धी इत्यादींशी संबंधीत बाबींचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. सदर पुस्तकात सतत विकास, समावेशक विकास, मानव विकास निर्देशांक, दशलक्ष विकास लक्ष्य, विकास व्यूहरचनेसाठी औद्योगिकीकरण की कृषी, बाजार की सरकार, चलन निचलनीकरण, रोख विरहित व्यवहार, देणी देण्याच्या आणि त्यांचा निपटारा करण्याच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक पद्धती या मुद्द्यांचा समावेश केला आहे.

    Mulbhut Arthashastra

    375.00
    Add to cart
  • मोगलकालीन भारताचा इतिहास (१५२६ ते १७०७)

    जहिरूद्दीन मोहम्मद बाबर यांनी २१ एप्रिल १५२६ रोजी दिल्लीचे सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव करुन भारतात मोगल राजघराण्याची सत्ता स्थापन केली. हे राज्य इ.स. १७०७ पर्यंत प्रभावी होते. तर इ.स. १७०७ पासून १८५७ पर्यंत नामधारी होते. या काळात दिल्ली ही राज्याची राजधानी होती. मोगल घराण्यात जहिरूद्दीन बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे कर्तबगार सम्राट होऊन गेले. प्रस्तुत ग्रंथात मोगलकालीन भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थिती आणि प्रशासन, कला व वास्तुकलेचा आढाव घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.

    Mogalkalin Bhartacha Ithihas (1526 te 1707)

    375.00
    Add to cart
  • लोकप्रशासन

    Lokprashasan

    250.00
    Add to cart
  • विज्ञान व तंत्रज्ञान विकास

    Vidnyan V Tantradnyan Vikas

    110.00
    Add to cart
  • शिक्षक पात्रता परीक्षा TET (पेपर – 1)

    Shikshak Patrata Pariksha TEL (Paper – 1)

    460.00
    Add to cart
  • संपूर्ण पर्यावरणशास्त्र

    विनाशाच्या पायरीवर उभ्या असलेल्या मानवाने पर्यावरण संदर्भात केलेल्या चुका सुधारण्यासाठी अत्यंत अत्यल्प वेळ बाकी आहे. पृथ्वीवरील तापमान वाढते आहे अन् धृवावरील बर्फ वितळू लागले आहे; समुद्री पाण्यातील तापमान बदलून प्रवाळ नष्ट होवू लागली आहेत, ओझोन छत्रीची घडी विस्कटली आहे, आपल्या सुखोपभोगात पर्यावरण संतुलनाकडे पाठ फिरवणार्‍या मानवाने पर्यावरण प्रदुषण वाढवून स्वतःच्या आणि अन्य सजीवसृष्टीच्या जीवाला धोका पोहचविलेला आहे. जैव विविधतेतील नष्ट होणार्‍या जाती-जमाती आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा प्रतिकूल परिणाम अभ्यासण्यासाठीच संपूर्ण पर्यावरण! जलसंपत्ती, वनसंपदा, प्राणीजीवन आणि परिसरातील आशावादी जीवनाची सुखद वाट जाणून घेण्यासाठीच संपूर्ण पर्यावरण… पर्यावरणशास्त्रातील परीक्षेत घवघवीत यश संपादनासाठीच संपूर्ण पर्यावरण….

    Sampurna Pryavaranshastra

    495.00
    Add to cart
  • समाजशास्त्र

    Samajshastra

    175.00
    Add to cart
  • समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना

    कोणत्याही भूप्रदेशावरील मानवांच्या परस्पर संबंधांची व्यवस्था किंवा पद्धती म्हणजे समाज होय. एकविसाव्या शतकाकडे झेपावणार्‍या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. मात्र या विकासाबरोबर सामाजिक विकासाचीही आवश्यकता भासली. समाजाच्या विकासाचा, सामाजिक संबंधांचा किंवा सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करणारे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा पाया घातला गेला. समाजशास्त्राच्या बाबतीत 18 वे शतक हे एक संस्मरणीय शतक म्हणून ओळखले जाते. सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संस्था, अर्थसंस्था, धर्मसंस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक नियंत्रण व सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रक्रिया मानली जाते. 1924 साली डॉ. गोविंद घुर्ये यांनी भारतातील आदिवासी समुदाय, जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, भारतीय रुढी, प्रथा व परंपरांचे सामाजिक कार्य अशा विविध विषयांवर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून संशोधन केले. आधुनिक काळात समाजशास्त्र हा विषय एक उपयोजनात्मक विषय व व्यावहारवादी विषय मानला जात असल्यामुळे या विषयाचे अध्ययन व संशोधन करणार्‍या अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदर पुस्तकात विविध मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

    Samajshtratil Mulbhut Sankalpna

    250.00
    Add to cart
  • स्थानिक स्वराज्य संस्था

    भारतात स्थानिक स्वराज्य संस्था अतिप्राचिन काळापासून अस्तित्वात असलेल्या दिसून येतात; त्यात कालानुक्रमे, दिवसेंदिवस बदल व परिवर्तन होत गेले. त्यामुळे त्यांचा विकास होत गेला. तसेच ब्रिटीश काळातही बरेचसे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. लॉर्ड रिपन भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर त्यांनी स्थानिक संस्थांबाबतीत जनतेच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेऊन त्यात आमुलाग्र बदल घडवून आणले.

    या ग्रंथात एकूण 20 प्रकरणांचा आढावा घेण्यात आलेला आहे; त्यात प्रामुख्याने भारतातील स्थानिक स्वराज्य, स्वशासनाची उत्क्रांती, उगम-विकास इतिहास, महाराष्ट्रातील नागरी स्वशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, स्थानिक स्वशासन, लोकशाही विकेंद्रीकरण, नागरीकरण, स्थानिक स्वशासनाची वैशिष्ट्ये, घटनात्मक, सामूहिक विकास, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगर पंचायत, प्रशासकिय अधिकारी आणि राजकीय अधिकारी यांच्यातील फरक, स्थानिक स्वशासनातील दोष, नगरपालिकांच्या निवडणूका, वित्तिय व्यवस्था, नियंत्रण समस्या, भारतातील शहरीकरण आणि त्यांच्या समस्या, भारतातील प्रमुख महानगरपालिका व मूल्यमापन या प्रकरणांचा मुद्देसूद आढावा घेण्यात आलेला आहे.

    सदरहू ग्रंथ युजीसी पॅटर्नप्रमाणे असून एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांना अत्यंत उपयोगी आहे. तेव्हा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ आहे.

    Sthanik Swarajya Sanstha

    425.00
    Add to cart