-
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
Rs.450.00भारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण आहे. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. देशांच्या बदलाचे नेतृत्व महाराष्ट्राने केलेले दिसून येते. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. इ.स. 1818 नंतरची महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आढावा प्रस्तुत संदर्भ ग्रंथात घेण्यात आलेला आहे. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील वृत्तपत्रे, शिक्षण, प्रशासन, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य याबद्दलचे विवेचन करण्यात आलेले आहे. देशाच्या सामाजिक सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. टिळक युग, क्रांतिकारी चळवळ गांधीयुग व महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ यांचा ऊहापोह केलेला आहे. तसेच स्त्रीमुक्ती चळवळ, कामगार चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ व संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचा विचार केलेला आहे.
प्रस्तुत ग्रंथ महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक, एमपीएससी व युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.Aadhunik Maharashtracha Itihas
-
नारो शंकर राजेबहाद्दर आणि मालेगांवचा इतिहास
Rs.425.00नारोशंकर राजेबहाद्दर आणि त्यांच्या घराण्यासंबंधी माहिती गोळा करण्याकरीता मराठ्यांच्या इतिहासाच्या सागरात उडी टाकून त्यातून हिरे जवाहिर शोधून आणणे अतिकष्टाचे कार्य होते. मालेगांवची ही वसाहत कशा पध्दतीने टप्प्याटप्प्याने उदयास आली आणि कशा पध्दतीने ती वाढली? भूतकाळातील एक लहानसं खेडं क्रमाक्रमाने इतक्या मोठ्या शहरामध्ये कसे रुपांतरीत झाले. विविध टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीची काय कारणे होती? हिंदू आणि मुसलमान कोठून आले? केव्हा आले? त्यांच्या स्थलांतराची काय कारणे होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सदर ग्रंथात मालेगांवचा भूगोल आणि नामकरण, मालेगांव कोणत्या काळात कोणाचे राज्य होते, नारो शंकर राजे बहाद्दर घराण्याचा इतिहास, मालेगांवच्या भुईकोट किल्ल्याची रचना, मालेगांवच्या किल्ल्याचे युध्द, बस्ती बसना खेलना ही है, हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य युध्दात मालेगांवचा सहभाग, नैसर्गिक आपत्ती आणि रोगांच्या साथी, पॉवरलूम उद्योगाचा इतिहास, मालेगांवातील इस्लामी शिक्षणाचा इतिहास या सर्व घटनांचा परामर्श डॉ. इलियास सिद्दीकी यांनी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेला आहे.