-
अनुभूती
Rs.95.00शिक्षकात कवी असणं यांस मी अहोभाग्य समजतो. कारण शिक्षकाला रंजन आणि प्रबोधन या दोन्ही वाटा एकाच वेळी समृद्ध करीत विद्यार्थी वर्गाचं संगोपन, संवर्धन करावं लागतं. या ध्यासाला जतन करीत जे आतून येतं. आणि शब्दरुप होतं. याचा एक आगळा आनंद असतो. यालाच साहित्यात ‘स्वानंदासाठी’ केलेले लेखन असेही संबोधले जाते.
सरांनी प्रस्तुत संग्रहातून ज्या ज्या भावनांना वाट करुन दिलीय. त्या वाटेवर सुख-दुःखाच्या दाहक वास्तवाबरोबर अंतरीच्या घावांसह केलेली ‘शल्य’ चिकित्सा वाचकाची अस्वस्थता वाढविणारी ाहे. कवीच्या दुःखाशी संवादी होतांना तो स्वतःच्या दुःखाची कवी दुःखाशी तुलना करीत स्वतःचे दुःख शितल करतो. येथेच कवीचे आणि कवितेचे यश दडलेले असते. म्हणूनच सृजन म्हणजे मानवी मनाच्या तळाशी असणार्या जखमांना सावरणारी निसर्गदत्त देणगीच वाटते.Anubhuti
-
अमरस्वर
Rs.125.00माझे ६ वे पुस्तक ‘अमर स्वर’ वाचकांच्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे.
माणसाचे जीवन कुणाच्या तरी आदर्शानी फुलून यावे. काव्यमय प्रांतात मला थोर विशाल हृदयी अनेक माणसं भेटली. त्यांच्या भेटीने तृप्त झालो. अस्वस्थता वाट्याला आली नाही, की नैराश्य शिवले नाही. सदा न कदा समाधान, आनंद, निखळ
हास्याचे क्षण वाट्याला आले. वास्तववादी क्षणांना सुख मानुन काही काळ कवटाळलेही म्हणून शब्दांच्या साम्राज्यात वावरणेही झाले.२०१६ पासून ‘उन्हं तापली रे’ या पहिल्या काव्यसंग्रहाने समाजात कवी म्हणून ओळख झाली. ‘पाखरा उड उड रे’ या काव्यसंग्रहाने मला एका विशिष्ट उंचीवर आणून ठेवले; ‘नांगरफाळ’, ‘चांदणवेडा’ नंतर श्री. डी. बी. पाटील या द्रष्ट्या
व्यक्तिमत्त्वाविषयी ‘कीर्तीगंध’ हे पुस्तक स्वतः संपादित केले. ‘अमर स्वर’ याद्वारे जगविख्यात गायिका, गानसम्राज्ञी लतादिदींकरिता त्यांच्या अमरस्मृतींना मनोभावे नमन करण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात देशाकरिता हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांचे स्मरण म्हणून काही कविता या पुस्तकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना माझा हा प्रयत्न नक्कीच भावेल अशी मनोकामना व्यक्त करतो, वाचन संस्कृती वाढीस लागो या सदिच्छांसह…सदैव तुमचाच,
रमेश जे. पाटील