
वर्तमान परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता
Rs.650.00‘जनतेचे सरकार, जनतेसाठी सरकार व सरकार जनतेचे’ हा सिद्धांत आपण टिकविण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्यासाठी आपल्या मार्गात येणार्या वाईट गोष्टी, अडथळे ओळखण्यात वेळ दवडता कामा नये. जेणेकरुन आपण आपल्या लोकांना जनतेसाठी सरकार ऐवजी जनतेचे सरकार ही भूमिका स्वीकारायला भाग पाडू. अयोग्य सरकारे हलविण्यात आपण दुबळे राहणार नाही. हाच एक देशसेवा करण्याचा मार्ग आहे. यापेक्षा चांगला मार्ग मला माहीत नाही.
26 जानेवारी 1950 रोजी भारत एक लोकशाहीवादी देश होईल. याचा अर्थ, या दिवसापासून भारतात लेकांचे सरकार असेल, लोकांनी चालविलेले सरकार असेल, व लोकांसाठी सरकार असेल. पुन्हा तोच विचार माझ्या मनात घोळत राहतो, भारताच्या लोकशाहीवादी घटनेचे काय होईल…? भारतीय लोक ही घटना अबाधित ठेवतील काधधध? का ही घटना नष्ट होईल…? हा विचार माझ्या मनात येतो तेव्हा मी खूप चिंताग्रस्त होतो.
– डॉ. बी. आर. आंबेडकर
Vartaman Paristhitit Dr. Babasaheb Ambedkaranchya Vicharanchi Avashyakta

वर्तमान परिस्थितीत पंडित नेहरुंच्या विचारांची आवश्यकता
Rs.495.00भारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्मांच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धर्म नेहमी अंधविश्वास, मतांधता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविषयी मला प्रेम व आदर असल्यामुळे पार लौकिक जीवनाविषयी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.
धर्मांमुळे जर राष्ट्रा-राष्ट्रात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.
Vartman Paristhitit Pandit Nehrunchya Vicharanchi Avashykta


