• Psychology of Happiness and Wellbeing

    Dr. Sateesh Surye deserves congratulations for his insightful book, Psychology of Happiness and Wellbeing, which is both relevant and practical for everyday life. The book is structured into six chapters, each delving into essential psychological concepts that contribute to a fulfilling and peaceful existence.The first two chapters provide a thorough analysis of happiness, exploring its various dimensions. The next two chapters shift focus to wellbeing, examining its connections with positive emotions and mindfulness. The final chapters address Emotional Intelligence, gratitude, and forgiveness, offering valuable perspectives on these crucial aspects. This comprehensive approach ensures that the book is accessible and beneficial not only to psychology students but also to a broader audience seeking to enhance their understanding of happiness and wellbeing.

    185.00
    Add to cart
  • आंतरराष्ट्रीय व्यापार : सिद्धांत आणि व्यवहार

    आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पाहिले जाते. व्यापार माध्यमातून जगातील सर्वच देशांचा कमी-जास्त वेगाने आर्थिक विकास होऊ लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापार माध्यमातून प्रत्येक देश आपला विकास साध्य करण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांवरील अवलंबित्वातूनच जगातील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो. व्यापार मुळात लाभ मिळविण्याच्या हेतुने केला जातो. एखादा देश आर्थिकदृष्ट्या कितीही संपन्न असला तरी संपुर्णत: स्वयंपूर्ण असू शकत नाही. कारण देशात सर्वच वस्तू व सेवांचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होतेच असे नाही. वस्तू व सेवांची देशांतर्गत टंचाई दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते, तसेच देशातील वस्तू व सेवांचे अतिरिक्त उत्पादन खपविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारातून देशा-देशांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध निर्माण होतात, सहकार्याची आणि एकात्मकतेची भावना निर्माण होते, विकसित देश विकसनशील देशांना विकासासाठी मदत करतात.
    प्रस्तुत पुस्तकात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ-हानी, विविध सिद्धांत व धोरणे, व्यापारतोल, विदेशी विनिमय दर, विदेशी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय कंपन्या, विदेश चलन गंगाजळी, विविध आंतरराष्ट्रीय संस्था व परिषदा, जागतिक वित्तीय संकट 2008, रुपयाचे अवमूल्यन आणि परिवर्तनियता इ. मुद्द्यांचा सविस्तर परामर्श घेतलेला आहे.

    – प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण

    Antarrashtriy Vyapar And Vyavahar

    395.00
    Add to cart
  • आंतरराष्ट्रीय सुरक्षा समस्या

    दुसर्‍या देशावर आक्रमण करुन त्याच्या जमिनीवर कब्जा करणे आता अशक्य आहे, या संभावित अंदाजाला आज चीनच्या आक्रमक व निष्ठूर धोरणाने तडा जावून युध्दाची प्रमेये बदल्याचा समज फोल ठरतो आहे. जगात संघर्षाचे स्वरुप बदलून त्यात विद्यूत गतीने फेरबदल होत आहेत. पारंपरिक युध्दांची जागा आता दहशतवाद, अराष्ट्रीय घटकांचा हिंसाचार व धार्मिक मूलतत्त्ववादाने घेतलेली आहे. शीतयुध्दानंतर जगातील संघर्ष कमी होतील; युध्द जवळपास नष्ट होऊन सर्वसमावेशक लोकशाहीची प्रस्थापना जगात सर्वदूर होईल या भाकीताला तडे गेले आहेत. एकीकडे अण्वस्त्र-अवकाश स्पर्धा, सायबर हल्ले, वैचारीक व मूलतत्त्ववादी संघर्ष, इस्लामी दहशतवाद्यांचे घृणास्पद अमानवीय कृत्ये, आर्थिक युध्दाचे वातावरण तर दुसरीकडे मानवी प्रमादांमुळेच निर्माण झालेले निसर्गाचे असंतुलन यामुळे मानवी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचे जीवघेणे आगमन हेदेखील अत्यंत चिंताजनक आहे. प्रस्तुत पुस्तकात या सर्व मुद्द्यांचा यथायोग्य आढावा घेण्यात आलेला आहे.

    Antarrashtriya Surksha Samasya

    295.00
    Add to cart
  • आधुनिक बँकींग आणि भारतीय वित्तीय बाजार

    आजच्या प्रगत काळात दिवसेंदिवस बँक व्यवहाराचे व वित्तीय बाजाराचे महत्त्व वाढत आहे. अर्थव्यवस्थेत बँका व वित्तीय संस्थांचा जस-जसा विकास आणि विस्तार होत जातो, तस-तसा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. अर्थव्यवस्थेत बँकांचे महत्व अनन्य साधारण आहे. बँक जे व्यवहार करते त्यात बरीच जोखीम असते. त्या जोखीमचे व्यवस्थापन करावे लागते. भारतासह जगातील सर्वच बँक व्यवसायामध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यात प्रामुख्याने बँकांचे संगणकीयीकरण, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, कोअर बँकींग, एटीएम, डेबीट कार्ड, टेली बँकींग, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस, स्वीफ्ट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, रियल टाईम ग्रास सेटलमेंट, नॅशनल सेटलमेंट सिस्टीम, ई-परचेस, ई-मनी, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अ‍ॅट पाँईट ऑफ सेल इत्यादी साधनांचा वापर केला जात आहे. प्रतिभूती बाजार हे वित्तीय बाजाराचे एक अभिन्न अंग आहे. वित्तीय बाजारात अल्पकालीन आणि दिर्घकालीन कर्जाची देवाण-घेवाण केली जाते. नाणेबाजारात अल्पकालीन कर्जाची देवाण घेवाण चालते. यासाठी अल्पसूचनेद्वारे परत मिळणारी कर्जे, कोषागार हुंड्या, व्यापारी हुंडया या साधनांचा वापर केला जातो. भांडवल बाजार दीर्घकालीन कर्जे, गुंतवणूक देवाण घेवाण केली जाते.
    प्रस्तुत पुस्तकात आधुनिक बँकींग व वित्तीय बाजाराची इत्यंभूत माहिती देण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे.

    Adhunik Banking Ani Bharatiya Vittiya Bajar

    325.00
    Add to cart
  • आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. 1780 ते 1945)

    मध्ययुगात युरोप हा धर्मगुरू व राजा यांच्या गुलामगिरीत वाढलेला. इंग्लंडने गुलामगिरीचे सर्वप्रथम उच्चाटन केले. फे्रंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद व राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. वैज्ञानिक शोधांमुळे ‘औद्योगिक क्रांती’ युरोपमध्ये उदयास आली. वसाहतीच्या शोधामुळे युरोपमध्ये विनाशकारी साम्राज्यवादाचा उदय झाला. संपूर्ण जगाला विनाशाच्या गर्तेत फेकणार्‍या दोन्ही महायुद्धांना युरोप कारणीभूत ठरले. दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी, आर्थिकहानी झाली. मानवजातीचा समूळ विनाश करणार्‍या विध्वंसकारी अणुबॉम्बचा शोध याच काळात लागला. महायुद्धांतील संहारक अस्त्रांमुळे मानव जात स्तब्ध झाली. जगात पुन्हा महायुद्ध होऊ नये, विध्वंसकारी अणुबॉम्बच्या वापरास निर्बंध घालावा तसेच शांततापूर्ण सहकार्य यासाठी यूनो या जागतिक दर्जाच्या संघटनेची निर्मिती झाली.
    प्रस्तुत पुस्तकात इंग्लंडमधील लोकशाही, फे्रंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्र संघटना यांची निर्मिती, रशियन राज्यक्रांती, फॅसिझम, नाझीझम, तुर्कस्थानचे आधुनिकीकरण इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.

    Aadhunik Yuropcha Itihas (A.D. 1780 – 1945)

    225.00
    Add to cart
  • आर्थिक भूगोल

    ‘आर्थिक भूगोल’ ही मानवी भूगोलाची एक महत्वाची शाखा असून भूगोलशास्त्राच्या अभ्यासात या ज्ञानशाखेच्या अध्ययन-अध्यापनास अनन्य साधारण महत्व आहे. बदलत्या परिस्थितीत विविध उपक्रमांचे आर्थिक नियोजन करणे हा आर्थिक भूगोलाचा महत्त्वाचा उद्देश आहे. एखाद्या भूभागाची प्रगती व विकास नेहमीच सुबध्द नियोजनाव्दारेच घडून येतो. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर, आपण आपल्या उपलब्ध साधनसामग्रीचा आढावा घेणे गरजेचे असते. आपण कोणत्या उत्पादनांमध्ये सक्षम आहोत व कोठे कमी पडतो? यावर विचार करणे आवश्यक आहे. त्यानुसार विकासाची दिशा ठरविण्यास मदत होते. साधनसंपत्तीचा अंदाज व्यक्त करण्यासाठी आर्थिक भूगोलाचा उपयोग होऊ शकतो. सर्वसाधारणपणे विविध मार्गाद्वारे उपाय योजून, मानव स्वत:च्या आर्थिक, सामाजिक व बौद्धिक गरजा भागवितो त्यास आर्थिक क्रिया असे म्हणतात.
    उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर विविध प्रकारच्या प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होतो. या घटकांचे प्रमाण व स्वरूप सर्वदूर सारखे आढळत नाही. परिणामी उद्योगधंद्यांचा विकास सर्वदूर सारखा झालेला दिसून येत नाही. उद्योगधंद्यांच्या स्थानावर परिणाम करणार्‍या या विविध घटकांचा पद्धतशीर अभ्यास करून जर्मन अर्थशास्त्रज्ञ ऑल्फ्रेड वेबर यांनी 1909 मध्ये उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणाच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला. त्यास ‘ऑल्फ्रेड वेबरचा सिद्धांत’ असे म्हणतात. कोणताही उद्योग उभारतांना किमान उत्पादन खर्च लागेल असे स्थान शोधण्यासाठी हा सिद्धांत अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे या सिद्धांतास ’ङशरीीं उेीीं चेवशश्र’ म्हणूनही संबोधले जाते. देशाचा आर्थिक विकास त्या देशातील उपलब्ध खनिजसपंत्तीवर आणि उद्योगधंद्यांच्या विकासावर अवलंबून असतो.

    Arthik Bhugol

    160.00
    Add to cart
  • इतिहासातील संशोधन पद्धती

    इतिहासकार कसा असावा याबाबत महान इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
    इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्तिप्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनाविरहित, आपुलकिची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे. इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे त्यांचे मन पाहिजे. खोटे-नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे म्हणजे सत्यानिष्ठा हा इतिहासाचा आत्मा असतो. डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासावर जे लिखाण केले ते वस्तुनिष्ठता व सत्यनिष्ठेने केले.

    डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
    (शुद्र मूळचे कोण होते)

    Itihaas Sanshodhan Paddhati

    150.00
    Add to cart
  • क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाची तोंडओळख

    ‘क्षेत्राभ्यास’ हे भूगोल विषयातील संशोधनातील एक महत्वाचे अंग आहे. योग्य शास्त्रीय तंत्र व तंत्रज्ञान वापरुन क्षेत्राचा पद्धतशीरपणे अभ्यास करता येतो. क्षेत्रकार्य करतांना संशोधकाला किंवा अभ्यासकाला भौगोलिक व वैज्ञानिक दृष्टीकोन वापरता आला पाहिजे. क्षेत्रकार्यामुळे चिकित्सक वृत्तीचा विकास होतो. क्षेत्रकार्य करतांना काही नितीमूल्यांचे पालन करणे आवश्यक असते. अभ्यासक्षेत्र हे कोणत्या स्वरूपाचे आहे हे क्षेत्रकार्य करण्यापूर्वी जाणून घेणे महत्वाचे असते. क्षेत्राभ्यास हा निरिक्षण पद्धतीने, प्रश्नावलीच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून पार पडतो.
    ‘नमुना संकलन’ हे क्षेत्रकार्या दरम्यानचे एक महत्वाचे कार्य आहे. नमुना निवडीच्या अनेक पद्धती आहेत. समग्रातून निवडलेल्या नमुन्याच्या विश्लेषणावरुन संपूर्ण सामग्रीबद्दल निष्कर्ष मांडता येतो. लघु संशोधन सादरीकरण हे प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून करतात. प्रकल्पाचे सादरीकरण अनेक मुद्द्यांमधून मुद्देसूदपणे करतात. ध्येय, उद्दीष्ट्ये, गृहीततत्वे, अभ्यासपद्धती, विवेचन, निष्कर्ष, अनुमान इत्यादी मुद्द्यांच्या आधारे प्रकल्पाचे सादरीकरण केले जाते.

    95.00
    Add to cart
  • खान्देश का लोकसाहित्य

    भाषा और साहित्य यह एकमात्र ऐसा साधन होता है जिसके माध्यम से हम किसी भी प्रांत अथवा भूप्रदेश की लोक-भाषा, लोक-साहित्य, लोक-संस्कृति तथा लोक-परंपराओं का अध्ययन अध्यापन कर सकते है । वैश्वीकरण या भूमंडलीकरण के इस युग में जब एक विश्वग्राम, एक विश्वबाजाऱ की तरह एक विश्वभाषा की कल्पना संजोयी जा रही है तब उसके परिणामस्वरूप हम देख रहे है कि आए दिन किसी न किसी लोक-भाषा और लोक-संस्कृति का कैसे लोप होता जा रहा है । सुप्रसिध्द भाषाविद् डॉ. गणेश देवी द्वारा किए गए ‘भाषा सर्वेक्षण’ से प्राप्त निष्कर्ष इस बात के प्रत्यक्ष प्रमाण है । इसलिए ऐसी विपरित परिस्थितियों में अपने-अपने भूप्रदेश और प्रांत की लोक-भाषा और लोक-संस्कृति का संरक्षण और संवर्धन करना तथा आने वाली नई पीढ़ी को इससे अवगत कराना यह हर एक का कर्तव्य बन गया है। इसी उद्देश्य को केंद्र में रखकर विश्वविद्यालय अनुदान आयोग, नई दिल्ली ने तथा भारत सरकार द्वारा प्रस्तावित नई शिक्षा नीति ने लोक-भाषा और लोक-संस्कृति का संरक्षण और संवर्धन करने हेतु उसे पाठ्यक्रम में समाविष्ट करने के निर्देश भारत में स्थित सभी विश्वविद्यालयों को दिए हैं । उन्हीं निर्देशों का अनुपालन करते हुए कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के हिन्दी अध्ययन मंडल ने स्नातक स्तर (बी.ए.) तृतीय वर्ष के षष्ट सत्र के अंतर्गत हिंदी विषय का चयन करने वाले छात्रों के लिए खान्देश का लोक साहित्य यह प्रश्नपत्र रखने का क्रांतिकारी निर्णय लिया । यह निर्णय आगत भविष्य काल में ग्लोबल के साथ-साथ लोकल का नारा बूलंद करेगा यह हमें पूर्णरूपेण विश्वास है ।

    Khandesh Ka Loksahitya

    125.00
    Add to cart
  • नागरी सेवा आणि सुशासन

    भारतात नागरीसेवेचा (लोकसेवा) विकास वा प्रारंभ प्राचीनकाळी झालेले पहावयास मिळते. ज्याचे वर्गीकरण प्राचीनकाळ, राजपूतकाळ, सल्तनत काळ, मूगलकाळ, ब्रिटीशकाळ, स्वातंत्रोत्तर काळात झालेले आढळते. सन 1919 ते 1947 पर्यंंतच्या कालावधीत केंद्रिय सचिवालयातील बदल वा जडणघडण विशेष महत्वाचे होते. ब्रिटीश शासन कालखंडात प्रशासनिक व्यवस्थेचे महत्व लक्षात घेऊन लोकसेवेची स्थापना करण्यात आली. लोकप्रशासन मध्ये कर्मचारी हे मुख्य तत्व आहेत. नागरी सेवा म्हणजे नोकरशाही या अर्थानेही ही संकल्पना परिचित आहे. जर्मन तत्ववेत्ता ‘मॅक्सवेबर’ या प्रशासकीय अभ्यासकाने ‘नोकरशाही’ ही संकल्पना उपयोगात आणली. धोरणे आणि प्रशासन या संदर्भात नागरी सेवेची भूमिकाही खुप महत्वाची असते. तसेच जागतिकीकरणात विशेषतः 1990 नंतर सु-शासन ही संकल्पना अध्ययनाद्वारे चर्चेत आली. सु-शासन ही संकल्पना मानव समुदायाच्या हिताशी वा विकासाशी संबंधित आहे. ती एक बहुआयामी प्रक्रिया सुध्दा आहे. आजच्या परिप्रेक्ष्यात बहुतांश राष्ट्रांनी या संकल्पनेचा स्विकार हा स्वच्छेने व स्वंयप्रेरणेने केले आहे.

    Nagari Seva and Sushasan

    275.00
    Add to cart
  • निवडक दलित एकांकिका : एक चिंतन

    दलित रंगभूमीला सशक्त, संपन्न आणि प्रयोगक्षम बनविणारे संवेदनशील नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी संपादित केलेल्या ‘मराठी दलित एकांकिका’ यावरील परिचयात्मक लेखन म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. शाळा, महाविद्यालय, शासन व विविध संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणार्‍या अनेक स्पर्धांमधून ‘एकांकिका’ जनसामान्यांपर्यंत पोहचली. तरुणाईचा तर जिव्हाळ्याचा विषय झाली. ‘एकांकिका’ हा शिकण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वत:ला घडवून घेण्याचा कला प्रकार आहे. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा आग्रह धरीत मराठी दलित एकांकिकांची निर्मिती झाली.
    प्रस्तुत पुस्तकातील एकांकिकांचा अभ्यास करताना, समीक्षा करताना नाट्य वाङ्मयाच्या सर्व प्रकारच्या आकृतिबंधांना जाणीवपूर्वक महत्त्व दिले, त्याचप्रमाणे विषय आणि तंत्र दृष्ट्याही दिलेले महत्त्व लक्षणीय असेच आहे. समीक्षेच्या अंगाने किचकट करण्यापेक्षा एकांकिकांचे सहज, सोप्या पद्धतीने आकलन होईल अशाच पद्धतीने प्रस्तुत पुस्तकाची प्रामाणिक मांडणी केलेली आहे. मानवी मनाच्या समृद्धीसाठी, वाङ्मयीन परिघाच्या विस्तारण्यासाठी तसेच वाङ्मयाभिरुचीच्या समृद्धीसाठी सदर पुस्तक बहुमूल्य ठरेल यात शंका नाही.

    Nivadak Dalit Ekankika : Samiksha

    150.00
    Add to cart
  • पर्यावरण भूगोल

    Paryavaran Bhugol

    175.00
    Add to cart
  • पर्यावरण भूगोल

    मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याची स्वयंचलित व स्वनियंत्रित यंत्रणा निसर्गाजवळ आहे. परंतु अलीकडच्या काळात निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे असंतुलन निर्माण झाले. त्यातून अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्यात. ह्या पर्यावरणीय समस्या विश्वव्यापी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळेच 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या जागतिक परिषदेत पर्यावरणीय समस्यांवर सर्वाधिक चर्चा झाली व तेव्हापासूनच जगातील सर्व देशांचे लक्ष ह्या जागतिक समस्येकडे वेधले गेले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक असल्याची जाण प्रत्येक राष्ट्र, शासन व समाजाला होऊ लागली. यातूनच पर्यावरण अभ्यासास महत्त्व प्राप्त झाले. पर्यावरणविषयक जागृती व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला पर्यावरणाचे महत्त्व कळावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करू शकतो? पर्यावरण संतुलन ढासळल्यामुळे किती भयानक समस्या निर्माण झाल्यात? या संबंधीची माहिती प्रत्येकास व्हावी, या दृष्टिकोनातूनच प्रस्तुत पुस्तकाची मांडणी केली आहे.
    या पुस्तकाच्या माध्यमातून जैवविविधतेचे महत्व, राष्ट्रीय पर्यावरण धोरण, धोरणावर आधारित अंमलबजावणी, वने व वन्यजीवांचे संवर्धन, विकसित व विकसनशील देशातील पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न अशा महत्वपूर्ण मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व स्वच्छ पर्यावरणासाठी या सर्व बाबींचे आकलन समाजाला होणे आवश्यक आहे. ही माहिती समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सारे प्रयत्न करू या.

    Paryavran Bhugol

    175.00
    Add to cart
  • पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.
    प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अ‍ॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.

    Pashchimatya Rajkiya Vicharwant

    235.00
    Add to cart
  • प्रात्यक्षिक भूगोल

    Pratyakshik Bhugol

    475.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (इ.स. 1750 ते 1857)

    प्राचीन काळापासून भारताचे पाश्चिमात्य देशांशी व्यापारी संबंध होते. 18 व्या शतकाच्या मध्यकाळात भारतीय समाज एकसंघ नव्हता तो अनेक गटात विखुरलेला होता. निरनिराळ्या जातींच्या गटात रोटी-बेटी व्यवहार बंद होते. तरी देखील आर्थिक क्षेत्रात भारत संपूर्ण जगात संपन्न राष्ट्र गणले जात होते. भारतातील राजकीय स्थिती अनुकूल असल्याने इ.स. 1526 मध्ये बाबरने सुलतान इब्राहीम खान लोदीचा पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुगलांच्या सततच्या आक्रमणाने भारताची स्थिती अत्यंत दयनीय झाली. ब्रिटिशांनी भारतावर कब्जा केल्यानंतर 1757 ते 1857 या काळात त्यांनी अनेक बदल केले. मात्र प्रशासकीय व कायदेशीर सुधारणा राबवत असतांना आपल्या स्वार्थाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ब्रिटीशांच्या हिंदुस्थानातील आगमनानंतर पन्नास वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे समीकरण बिघडून हजारो लाखो कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गाची अक्षरक्ष: वाताहत झाली. याची परिणती 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात झाली, पण त्यात अपयश आले.
    प्रस्तुत पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालमधील सत्ता स्थापनेच्या अगोदरपासून ते भारतातील इ.स. 1857 च्या उठावाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास अतिशय मुद्देसूदपणे मांडला आहे.

    Bharatacha Itihas – Ad 1750 to 1857

    – डॉ. गोकूळ पाटील

    275.00
    Add to cart
  • भारतातील प्रवास आणि पर्यटन

    प्राचीन काळापासून ‘प्रवास’ ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आढळून येते. हळू-हळू मानव उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला, तसतसे त्याचे भ्रमंतीचे उद्देश्य तसेच वाहतूकीची साधनेही बदलत गेलीत. मोटारी, रेल्वे, विमान, जहाज इ. प्रगत व आधुनिक वाहतूकीची साधने उपलब्ध होत गेल्याने जगभर प्रवास करणे सुकर होत गेले. परिणामतः पर्यटन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वपूर्ण आर्थिक उद्योगक्षेत्र म्हणून विकसित झाले. सुक्ष्म नियोजन केल्यास पर्यटन क्षेत्राच्या साहाय्याने देशाचा आर्थिक व एकूणच सर्वांगीण विकास साध्य करणे कठीण नाही. भारतासारख्या भौगोलिक विविधता, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वप्राप्त देशात पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य स्थळे आहेत.
    प्रस्तुत पुस्तकात पर्यटनाचा अर्थ, स्वरूप, उद्दिष्ट्ये, प्रकार, भूमिका, नियोजन, वाहतूक साधने, निवास व्यवस्था, मार्गदर्शक या संबंधीचे सचित्र विवेचन सविस्तररित्या केलेले असून भारतातील महत्त्वपूर्ण व निवडक अशा धार्मिक स्थळे, लेण्या, किल्ले, स्मारके इत्यादींची उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे.

    Bharatatil Pravas And Paryatan

    250.00
    Add to cart
  • भारतातील वस्तुसंग्रहालयांचा परिचय

    वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. युरोपात कालांतराने अनेक खाजगी वस्तुसंग्रहालये स्थापन झाली. फे्ंरच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये खाजगी संग्रहालयाचे रूपांतर सार्वजनिक संग्रहालयात करण्यात आले आणि ही प्रथा कालांतराने भारतात सुरू झाली. भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालने इ.स. 1814 मध्ये पहिले वस्तुसंग्रहालय कलकत्ता येथे स्थापन केले आणि या संग्रहालयात सर्व प्राचीन वस्तूंचा संग्रह करून ठेवण्यात आला. यानंतरच्या काळात वस्तुसंग्रहाच्या कक्षा रुंदावल्या आणि पारंपरिक संग्रहालयाची जागा आधुनिक संग्रहालयाने घेऊन पारंपरिकरीत्या वस्तूंचा संग्रह करण्याची पद्धती मागे पडून राष्ट्रीय, प्रांतीय, स्थानिक, संस्थात्मक पातळीवर वस्तूंचा संग्रह करून वस्तुसंग्रहालये हे ज्ञान देणार्‍या संस्था बनलेल्या आहेत. भारतातील विविध वस्तुसंग्रहालयात पाच हजार वर्षांच्या कलाविषयक, सांस्कृतिक व समृद्ध इतिहासाचा ठेवा जपून ठेवलेला आहे. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने व विषयवार आकर्षक पद्धतीने वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. संग्रहालयामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडण्यास मदत होते. मानवी स्वभाव, संस्कृती, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, करमणुकीची साधने, आहार-विहार इत्यादींसारख्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडते. प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक व पुरातत्वविषयक वस्तुसंग्रहालयाचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Bharatatil Vastusangrahalyancha Parichay

    350.00
    Add to cart
  • भारतीय राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. जगातील; विशेषत प्राचीन भारतातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ अथवा अन्य ग्रंथसंपदा अभ्यासल्यास हे त्वरीत लक्षात येईल. आधुनिक भारताचा प्रारंभच मुळी भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटीशांचे विचार अथवा सुधारणा ह्या भारतीयांसाठी अकल्पनीय अशा होत्या. परिणामी भारतीयांमध्ये विचारमंथनास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधन काळाचा प्रारंभ केला. म. ज्योतीराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, ना. गोखले, आगरकर, न्या. रानडे, दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, अरविंद घोष, एम.एन. राय, मौलाना आझाद इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरूप व भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जतनेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी – सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रवादी, शांतता, सहअस्तित्व, भारताचे स्वातंत्र्य इ. विविध विषयांवर चिंतन करून वैचारिक मांडणी केली. प्रस्तुत पुस्तकात या विविधांगी निवडक घडामोडींचा समावेश केलेला आहे.

    Bhartiya Rajkiya Vicharvant

    235.00
    Add to cart
  • भौगोलिक माहिती प्रणाली

    भौगोलिक माहिती प्रणाली भौगोलिक घटकांच्या अभ्यासात एक वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करते. पृथ्वीवरील विस्तृतपणे पसरलेल्या भौगोलिक घटकांचे सर्वेक्षण, वर्गीकरण, सांख्यिकी मांडणी व तिचे विश्लेषण यांचे एक सर्व समावेशक सादरीकरण भौगोलिक माहिती प्रणाली मुळेच सहज सरळ व सोपे बनते. भौगोलिक माहिती प्रणाली या पुस्तकाचे लेखन करतांना आमचा प्रयत्न हाच राहिला आहे की, भौगोलिक माहिती प्रणाली सारख्या गुंतागुंतीच्या विषयाला सोपा, मनोरंजक, व्यवस्थित व क्रमबद्ध स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
    सदर पुस्तकात भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय, भौगोलिक माहिती प्रणाली सांख्यिकी रचना, भौगोलिक माहिती प्रणाली आकडेवारी विश्लेषण व भौगोलिक माहिती प्रणाली आकडेवारी विश्लेषण व भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन यात विविध उपघटकांना उदाहरण व आकृतीसह एक नवीन रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Bhaugolik Mahiti Pranali

    125.00
    Add to cart
  • भौगोलिक माहिती प्रणाली

    भौगोलिक माहिती प्रणाली ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे. अनेक विद्याशाखांतील संकल्पना व विचार यांचा अभ्यास करुन तयार केलेले तंत्र आहे. या तंत्रज्ञानामुळे विश्वाची भौगोलिकदृष्ट्या माहिती तंत्रज्ञानाबाबतची जवळीकता निर्माण झाली आहे. जीआयएस तंत्रज्ञानाची विलक्षण क्षमता व सहज वापरण्यायोग्य कार्यप्रणाली यामुळे हे तंत्रज्ञान काळाची गरज आहे. या तंत्राचा वापर अनेक क्षेत्रात नियोजन, व्यवस्थापन, अभियांत्रिकी व अनेक दैनंदिन व्यवहारासाठी वाढत आहे. पर्यावरणीय, परिस्थिकीय, वातावरणीय आणि अनेक जैविक घडामोडी मध्ये जीआयएसचा वापर होत आहे.
    भौगोलिक माहिती प्रणालीच्या अनेक आज्ञावली आहेत. काही आज्ञावली मोफत उपलब्ध आहेत तर काही विकत घ्याव्या लागतात. गरजेनुसार आज्ञावलींंचा शोध घेवून त्यांचा सर्वसामान्यपणे वापर करता येतो. भौगोलिक विश्लेषणासाठी जीआयएस आज्ञावली वापरल्या जातात.
    भौगोलिक माहिती प्रणाली अवकाशिक व गुणविशेष माहितीवर कार्य करते. या प्रणालीमध्ये जाळी सांख्यिकी व सदिश सांख्यिकी प्रतिमानात सांख्यिकी संकलित केली जाते.
    भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन विविध क्षेत्रात प्रभावीपणे केले जाते.

    Bhaugolik Mahiti Pranali

    110.00
    Add to cart
  • मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते इ.स. 1707)

    प्राचीन काळापासून भारतावर इराणी, ग्रीक, शक, कुशाण व हूण इ. अनेक परकीय जमातींनी आक्रमण केले. भारतीय संस्कृतीने या सर्वांना आपल्यात समाविष्ट करुन घेतले. परंतु 12 व्या शतकात आलेल्या मुसलमान आक्रमकांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपध्दती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी आपले वेगळेपण शेवटपर्यंत कायम राखले. इ.स. 1200 ते 1800 हा 600 वर्षांचा कालखंड मध्ययुगीन भारताचा कालखंड म्हणून ओळखला जातो. सुलतानशाही कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता स्थापन झाली होती. सुलतान तुर्क व अफगाण वंशातील होते. साधारणपणे याच कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. बाबरने 1526 मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतात मोगल राजघराण्याची स्थापना केली. हा सर्व कालखंड अत्यंत धामधुमीचा होता. सतत लढाया होत असे. सामान्य माणसाचे जीवन अत्यंत हलाखीचे होते.प्रस्तुत पुस्तकात मध्ययुगीन व्यापार, उद्योगधंदे आणि कृषी जीवन, सामाजिक-धार्मिक जीवन इ. मुद्द्यांचा अंतर्भाव केलेला आहे.

    Madhyayugin Bharatacha Itihas – Ad 1206 to 1707

    295.00
    Add to cart
  • मराठीचा भाषिक अभ्यास

    इ.स.दहावे शतकात यादव काळात मराठी भाषा-संस्कृतीची जडण-घडण झाली. यादव काळातील या मराठी भाषेचा ‌‘अमृतातेहि पैजा जिंके’ अशा शब्दात गौरव केला जातो. मराठीचे हे वैभव कालिक, राजकीय स्थित्यंतरांनी नष्ट झाले. बहामनीकाळात मुस्लिम राजवट व त्यांची ‌‘उर्दू-फारसीमिश्रित हिन्दी’ या भाषासंपर्कामुळे मराठी भाषा भ्रष्ट झाली. शिवकाळात तीने आपले पूर्वरुप प्राप्त केले. पेशवेकाळ व आंग्लकाळातील अन्यभाषिकांच्या संपर्कात तिचे स्वरूप बदलत गेले. आजच्या मराठी प्रमाणभाषेचा या स्थित्यंतराशी संबंध आहे.
    मराठी भाषेची पूर्वपीठिका, उत्पत्ती कालखंड, निश्चितीची साधने, त्यासंदर्भातील वैद्य-गुणे वाद, भाषा उत्पत्तीचे सिद्धान्त व भाषाकुल संकल्पना, मराठी भाषेवर झालेला अन्य भाषा परिणाम, प्रमाणभाषा व बोलीभाषा सहसंबंध, मराठीचे शब्दभांडार, मराठीचे कालिक भेद व प्रान्तिक भेद, भाषा आणि लिपी इ. घटकांचा संबंध ‌‘मराठीचा भाषिक अभ्यास’ या अभ्यासक्षेत्राशी निगडीत आहे. एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. स्पर्धात्मक परीक्षेत त्यांचा समावेश आहे. म्हणूनच विद्यापीठीय मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जातो. प्रस्तुत पुस्तकात या विषय घटकांच्या संदर्भात मान्यवर अभ्यासकांनी मांडलेल्या विचारांचा आधार घेतला आहे. नव्या पिढीतील मराठी अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना व भाषाभ्यासकांना अभ्यासपूर्ण विवेचनासाठीच प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन!

    – प्रा. डॉ. प्रभाकर जोशी

    Marathicha Bhashik Abhyas

    275.00
    Add to cart
  • माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्ये (भाग-2)

    आधुनिक समाजमाध्यमे ही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, ट्विटर, यूट्युब या आधुनिक समाज माध्यमांनी पारंपारिक मुद्रित व दृक्श्राव्य माध्यमांसमोर केवळ आव्हानच उभे केलेले नाही तर या माध्यमांना अधिक विकसित व प्रगत बनवले. सोशन मिडिया म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख व स्थान निर्माण केले. व्यक्तिकेंद्री असणार्‍या सोशल मिडियाने सामाजिक अभिव्यक्तीला रचनात्मक व प्रयोगशील बनवले. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला. आशयाचे विविध पदर उलगडले. एवढेच नव्हे तर आभासी विश्वाला तसेच त्यावर नोंदवल्या जाणार्‍या मतांना वास्तवात दखल घेण्यास भाग पाडले. म्हणून मानवी संज्ञापन क्रांतितील सोशल मिडिया हा महत्वाचा टप्पा ठरतो.

    Madhyamasathi Lekhan V Sanvad Kaushalye (Bhag 2)

    155.00
    Add to cart
  • यात्रा साहित्य का इतिहास

    भारतीय समाज और साहित्य में स्वतंत्रता के बाद आमूलाग्र परिवर्तन हुआ| परिवर्तन की तेज आँधी ने भारतीय समाज को बहुत ज्यादा प्रभावित किया है| साहित्य में नई विधाओं का जन्म हुआ वैसे-वैसे कई साहित्यकारों ने अपनी तुलिकाओं से इनमें तरह-तरह के रंग भरे| उसी तरह हिंदी साहित्य की महत्त्वपूर्ण विधा यात्रा-साहित्य भी है| कालानुरूप आधुनिक युग के सभी साहित्यकारों ने इस विधा को स्वीकार करते हुए उसके महत्त्व को भी प्रतिपादित किया है|
    मानव जीवन स्वयं एक यात्रा है| देश-विदेश के कई घुमक्कड प्राचीन काल से यात्राएँ करते आ रहे हैं| यात्रा का मानव विकास एवं संस्कृतियों के आदान-प्रदान में बहुत महत्त्व है| ‌‘मेरी जापान यात्रा’ यह यात्रा-साहित्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज इनके भारत के प्रतिनिधि के रूप में विश्वधर्म-विश्वशांति परिषद, जापान में सम्मिलित होने का यात्रा-वृत्तांत है| जापान देश की प्रगति का सार भी श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने बीच-बीच में प्रस्तुत किया है और भारत देश के प्रगति की कामन की है|

    Yatra Sahitya Ka Itihas

    135.00
    Add to cart
  • राजकीय पत्रकारिता

    आधुनिक काळात पत्रकारितेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येते. पत्रकारितेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाऊ लागले. पत्रकारितेला हे स्थान आपोआप मिळालेले नाही. लोकशाहीला विकसित करण्यात आणि मजबूती प्रदान करण्यात पत्रकारितेने बजावलेल्या भूमिकेवरून हे स्थान देण्यात आलेले आहे. प्रशासन आणि समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पत्रकारिता कार्य करत असते.
    प्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण सहा प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात पत्रकारितेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसर्‍या प्रकरणात जनसंचाराबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्‍या प्रकरणात पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिताविषयीची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या प्रकरणात पत्रकारितेच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सहाव्या प्रकरणात राजकारण आणि माध्यमे यांच्या परस्परसंबंधाविषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Rajkiya Patrakarita

    225.00
    Add to cart
  • राजकीय भूगोल

    ‘राजकीय भूगोल’ हा विषय थोडासा क्लीष्ट असल्याने पुस्तकात बर्‍याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून राजकिय भूगोलाचा परिचय, राज्य व राष्ट्र उत्क्रांती व विकास, भूराजनिती सिद्धांत आणि दोन राष्ट्रादरम्यान असलेला सिमा यावर सविस्तर लिखाण या पुस्तकातून आम्ही केला असल्याने ‘राजकिय भूगोलाची व्याप्ती’ आपल्या लक्षात येईलच.
    राजकिय भूगोल म्हणजे राजनैतिक दृष्टिकोनातून संगठित क्षेत्र किंवा राज्यांच्या भौगोलिक रचनेच्या संदर्भात केलेला अभ्यास होय. कोणत्याही राज्याशी संबंधित भौगोलिक क्षेत्र त्या राज्यांची भौगोलिक वास्तविकता असते. राज्य हे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इ. संदर्भात गुणसंपन्न विभागासोबतच एक जिवंत विभागसुद्धा असतो. त्यावरूनच राजकिय भूगोलाची सार्थकता यावरूनच निश्चित होते.

    Rajkiya Bhugol

    175.00
    Add to cart
  • राजकीय समाजशास्त्राचा परिचय

    दुसर्‍या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्‍या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्‍या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.
    प्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्‍या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.

    Rajkiya Samajshastracha Parichay

    395.00
    Add to cart
  • ललितरंग

    सदर पुस्तकात सात लेखकांच्या ललित गद्य लेखनाचा समावेश केला आहे. ‘स्त्रीविषयक ललित गद्य’ असे सदर पुस्तकातील ललित गद्याचे विशिष्ट असे सूत्र आहे. स्त्री आणि पुरुष दोहोंचा म्हणजे ‘मी’चा लेखनातून व्यक्त होणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्या अंगाने घटना-प्रसंग, व्यक्ती याबाबत ‘मी’चे व्यक्त होणे, भावनात्मकता आणि चिंतनशीलता यातून स्त्रीविषयक अनुभवाचा अन्वयार्थ लावू पाहणे या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून स्त्रीविषयक ललित गद्याचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून सदर पुस्तक आकारास आले आहे. लेखक स्त्री असो वा पुरुष, दोहोंच्या निवडक ललित गद्य लेखनाचा अंतर्भाव येथे केला आहे. महत्त्वाचे म्हणजे समकाळातील, म्हणजे साधारणपणे 1990 नंतरच्या कालखंडातील लेखकांचे हे ललित गद्य लेखन आहे. साहित्य, सामाजिक चळवळ, चित्रपट, पत्रकारिता अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपला स्वयंपूर्ण ठसा उमटविणार्‍या व्यक्तित्वांची-त्यांच्या संवेदना आणि विचारांची ही ललित गद्यात्मक अभिव्यक्ती आहे.

    Lalitrang

    95.00
    Add to cart
  • ललितरंग आकलन व आस्वाद

    ‘आठवणी’, ‘अनुभव’, ‘लघुनिबंध’, ‘प्रवासलेख’, ‘व्यक्तिचित्रे, ‘ललितलेख’ यांचा समावेश ललित गद्यात होतो. ‘ललितरंग आकलन व आस्वाद’ या पुस्तकात ‘ललितरंग’ या पुस्तकातील लेखांचा आढावा घेतला आहे. स्त्री विषयक ललित गद्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकात आलेल्या लेखातून स्त्री व पुरुष या दोघांचा स्त्री विषयक दृष्टीकोन वर्णन केला आहे. यात ‘मी’ अनुभवाचे स्वरूप सांगितले आहे. ‘मी’ ने जे अनुभवले त्याचे वास्तव वर्णन यात केले आहे. प्रस्तुत लेखनातून भावनात्मक व चिंतनशील अशी वर्णने आली आहेत. तसेच राबणारी, कष्ट करणारी, घर-संसार सांभाळणारी अशा वेगवेगळ्या स्वरूपात स्त्री चे दर्शन घडवले आहे. भाषा व शैली विशेष हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.

    Lalitrang Aakalan V Aaswad

    135.00
    Add to cart
  • लोकरंगभूमी

    लोकसाहित्य अभ्यासाची एक महत्वपूर्ण शाखा असलेली ‘लोकरंगभूमी’ आजच्या विज्ञानवादी युगात महत्वाची ज्ञानशाखा म्हणून पुढे आलेली आहे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतवस्थेत लोकसाहित्याचा महत्वाचा वाटा आहे. निसर्गाच्या अलौकिक रूपाच्या आर्त आळवणीतून लोकसाहित्य जन्मले. व्यक्त होणे ही मानवी प्रवृत्ती. व्यक्त होण्यामागे मानवी भावनांचा कार्यकारण भाव असतो. भावनांची अभिव्यक्ती केवळ मौखिक नसते तर ती शारीर पातळीवरही असते. म्हणूनच निसर्ग पूजनाच्या मौखिकतेला शारीरिक अभिव्यक्तीने दृश्यरूप दिले. त्यातूनच लोककलांचा म्हणजेच लोकरंगभूमीचा जन्म झाला. रंजन करणे हाच केवळ लोकरंगभूमीचा उद्देश्य नव्हता तर उदात्त मानवी मुल्यांच्या प्रसारासाठी म्हणजेच प्रबोधनासाठीही लोकरंगभूमी झटलेली पाहावयास मिळते. धार्मिक विधीनाट्य ते रिंगणनाट्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’ हा प्रबोधनाचा वसा लोकरंगभूमीने सोडलेला नाही.

    – डॉ. अक्षय घोरपडे

    Lokrangbhumi

    175.00
    Add to cart
  • लोकसंख्या भूगोल

    Loksankhya Bhugol

    175.00
    Add to cart
  • शाश्वतता आणि विकास

    अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा असून त्या पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय. शाश्वत विकासात चैनीच्या गरजा अंतर्भूत नसतात. शाश्वत विकासाची संकल्पना व्यापक असून त्यात सर्व व्यक्तींच्या कल्याणाची कल्पना अभिप्रेत आहे. या शाश्वत विकासात केवळ वर्तमान पिढीचे कल्याण नसून भावी पिढ्यांच्या कल्याणाकरिता नियोजन व व्यवस्थापनसुद्धा अंतर्भूत आहे. विकासाची पद्धत अशी असली पाहिजे की, तिच्यामुळे भावी पिढ्यांच्या गरजा भागविणार्‍या क्षमतेस ठेच पोहचायला नको; तर ती अबाधित राहिली पाहिजे. त्या क्षमतेस धोका निर्माण होता कामा नये. वर्तमान काळातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करताना भावी पिढ्यांच्या गरजांकडे लक्ष ठेवून उपयुक्त साधनसंपदा त्यांच्यापर्यंत कशी अबाधित राहिल याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. असा विकास म्हणजेच शाश्वत विकास होय.

    Shashwatata and Vikas

    110.00
    Add to cart
  • संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास

    मध्ययुगीन कालखंडात मराठी वाङ्मय हे वेगवेगळ्या रूपांत अवतरलेले दिसते. या काळात मराठी वाङ्मयनिर्मितीला सुरुवात झाली. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ व पहिला पद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ यांची याच काळात रचना झाली. महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोन महत्त्वाच्या संप्रदायांचा उगमही याच काळात झाला. महाराष्ट्राचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन या संप्रदायांनी समृद्ध केले आहे. त्यातून समाजात मानवी जीवनमूल्ये रुजली. शाहिरी वाङ्मय हा संत-पंत वाङ्मय प्रवाहांपेक्षा एक वेगळाच वाङ्मयप्रवाह मध्ययुगात जन्माला आला. बखर वाङ्मयाने इतिहास आणि वाङ्मय यांचे अनोखे नाते निर्माण केले. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे वाङ्मय, पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय अशी विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती या कालखंडात विपुल प्रमाणात झाली.प्रस्तुत पुस्तकात महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे पद्य वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय यासोबतच या वाङ्मय प्रवाहांमधील काही निवडक ग्रंथकार व काही निवडक साहित्यकृती तसेच महत्त्वाचे ग्रंथकार व त्यांच्या साहित्यकृती, ग्रंथकाराचे लौकिक जीवन व वाङ्मयीन कर्तृत्व यांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक हे वाचकांना व अभ्यासकांना वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल यात शंका नाही.

    Madhyayugin Marathi Vangmayacha Itihas

    250.00
    Add to cart
  • सनदी सेवा, व्यवस्थापन आणि सुशासन

    लोकप्रशासनाच्या क्षेत्रात प्राचीन काळापासून सनदी सेवेला महत्त्वाचे मानले जाते. प्रशासनाचे यश सनदी सेवकांच्या पात्रता व निष्ठेवर अवलंबून असते. जगातील प्रत्येक देशात सनदी सेवेचे अस्तित्व दिसून येत असली तरी त्यांचे स्वरूप आणि रचना भिन्न भिन्न स्वरूपाची दिसून येते. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असते. उद्देशपूर्तीसाठी कार्याचे नियोजन, योग्य पर्यायाची निवड, साधनसामुग्रीची जुळवाजुळव व प्रत्यक्ष कार्याला मार्गदर्शन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाचे कार्य आहे. सुशासन संकल्पना शासनाच्या अशा व्यवहाराशी संबंधित आहे की राज्याची मशीनरी आणि संस्था उत्कृष्ठता प्राप्त करण्याचा करतात.
    सदर पुस्तकात सनदी सेवा आणि सुशासनाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेण्यात आला आहे. यात सनदी सेवेचा अर्थ, भरती, प्रशिक्षण आणि बढती, संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाची रचना आणि भरती, सुशासन, ई-प्रशासन, प्रशासकीय नेतृत्व, प्रदत्त विधिनियम, प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रशासकीय उत्तरदायित्व, मनोधेर्य, प्रशासकीय नितीमत्ता, सामाजिक जबाबदारी आणि जनसंपर्क इ. विविधांगी मुद्द्यांचा उहापोह केला आहे.

    Sandi Seva Vyavasthapan Ani Sushasan

    325.00
    Add to cart
  • संपादन, लेखन और साहित्य

    संचार व्यवस्था समाज की प्रगति, सभ्यता और संस्कृति के विकास, संरक्षण और संवर्धन का माध्यम है। समाज तभी विकासशील, परिवर्तनशील रहेगा जब उसे सही ढंग से स्थानिय, राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय, सामाजिक, राजनीतिक आदि घटनाओं की सही और स्पष्ट जानकारी होगी। इलेक्ट्रॉनिक माध्यम और नव इलेक्ट्रॉनिक माध्यम का आज सर्वत्र वर्चस्व स्थापित हो रहा है, लेकीन इस बीच भी प्रिंट माध्यम अपनी साख बनाए हुए है। क्योंकि समाचार लेखन एक विशिष्ट कला है। समाचार दुनिया की खबरें घरों मे पहुँचाता है। लेख के माध्यम से किसी एक विषय पर विचारप्रधान बातें पाठकों तक पहुँचाई जाती है। इसलिए आधुनिकता के इस दौर में मुद्रण माध्यम (प्रिंट मीडिया) का प्रभाव बरकरार है।

    Sampadan Lekhan Aur Sahitya – Mudrit Madhyam

    110.00
    Add to cart