
बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा
Rs.250.00‘बोली’ जगवण्याचे काम असाक्षर समूहाने कालखंडापासून अव्याहतपणे केले. किंबहूना त्यांच्या जगण्यातील संवेदनांचा आणि भावाभिव्यक्तीचा बोलीभाषा अविभाज्य भाग राहिला.
बोलीचे सहज सोपे उच्चारण, त्यातील भावार्थांची प्रासादिकता निसर्गतःच समूहाला जोडणारी ठरली. अलीकडे काही अभ्यासक, संशोधक बोलीचे संशोधन करुन भाषाभ्यासाला नव्याने ऊर्जा देऊ पाहतात; ही बाब मानवी जीवनव्यवहार व विकासाच्या अनुषंगाने महत्वाची म्हणता येईल.
माणसाच्या गतीशील जगण्याबरोबर बोली नष्ट होऊ नयेत; या पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न मला प्रकाश किरणांसारखे वाटतात !Bolibhasha Sanshodhanachya Navya Disha

मातीत अजून ओल आहे
Rs.350.00खान्देशातील साहित्याची वाङ्मयीन मौलिकता ही एकूण मराठी वाङ्मयाच्या संदर्भातच तपासून पाहायला हवी. या दृष्टीने अन्य कोणत्याही वाङ्मयप्रकारांपेक्षा कविता ह्या वाङ्मय प्रकारात खान्देशातील लेखकांनी घातलेली भर लक्षणीय स्वरूपाची आहे; हे महत्त्वाचे निरीक्षण येथे नोंदवावे लागते. खान्देशातील ‘कवी केशवसुत पुरस्कार’ प्राप्त करणाऱ्या गणेश चौधरी, त्र्यंबक सपकाळे, पुरुषोत्तम पाटील, अनुराधा पाटील, उत्तम कोळगावकर, मनोहर जाधव, शशिकांत हिंगोणेकर आणि मंगेश नारायणराव काळे या आठ कवींची कविता एकत्रित स्वरूपात वाचताना सन 1950 ते 2000 या कालखंडातील मराठी कवितेचा व्यापक पट आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मराठी कवितेच्या अशा दीर्घ वाटचालीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर ह्या कवींची कविता उभी आहे.
Matit Ajun Oal Aahe


