जगातील कोणत्याही राष्ट्राचा लष्करी इतिहास पाहिला तर असे दिसून येते की संघर्ष जिंकण्यासाठी प्रत्येक राष्ट्र विशाल युद्धनीती, युद्धापूर्वीची युद्धनीती व युद्धातील युद्धनीती किंवा डावपेच या संकल्पनांचा वापर करताना दिसतात. भारतीय लष्करी इतिहासही याला अपवाद नाही. लढाई व युद्धाचा संबंध हा फक्त रणक्षेत्रापुरताच मर्यादित नसून त्याचा मानवाच्या सर्वांगिण घडामोडींशी संबंध आहे. कारण मानवनिर्मित सर्वच क्षेत्रांवर लढाईचे व युद्धाचे परिणाम होतात.
भारताच्या लष्करी इतिहासात प्राचीन कालावधीपासून ते आजपर्यंत अनेक लाहन-मोठ्या स्वरुपाच्या लढाया झाल्या. यात झेलमची लढाई,ख पानिपतची पहिली व तिसरी लढाई, इंग्रज-मराठा यांच्यात झालेली असईची लढाई, स्वतंत्र काश्मीरचे युद्ध, भारत-चीनमधील 1962 मध्ये झालेले युद्ध, 1965 व 1971 मध्ये भारत-पाकिस्तानात झालेली युद्धे इ. या सर्व लढायात किंवा युद्धात उभय बाजूकडील तुलनात्मक सैन्यशक्ती, त्यांच्या युद्धयोजना, लढाईचे परिणाम, प्रत्यक्ष युद्धकार्यवाही व लढाईपासून मिळालेले लष्करी धडे या सर्व मुद्यांचा सविस्तर ऊहापोह करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भारतावर प्राचीन काळापासून जेवढी परकीय आक्रमणे झाली त्यांचा भारतीय संस्कृतीशी संबंध आला. त्या आक्रमणांमुळे भारतीय समाज व इतिहास बदलला. एवढेच नाही तर या लढायांनी किंवा युद्धांनी भारतीय लष्करी इतिहासाला नवे बळण मिळवून दिले. म्हणूनच ङ्गभारतीय युद्धकलाफ या ग्रंथामध्ये सर्वांचा सखोलपणे विचार केलेला आहे.
Bharatiya Yuddhakla