• इंडियन बिझिनेस लेजंड्स

    भारतात जन्माला आलेल्या व भारतातच उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून जगभर प्रसिद्ध झालेल्या उद्योजकांची ओळख सर्व भारतीयांना व्हावी यासाठी सदरील पुस्तकात सात सुप्रसिद्ध यशस्वी उद्योजकांचा परिचय घेतलेला आहे. उद्योजकांच्या जीवनाचा वेध घेतांना उद्योजकांच्या व्यापारी संघर्षाची व कठोर मेहनतीची माहिती नव्या पिढीच्या तरूणाईला मिळून उत्तर आयुष्यात येणार्‍या अडचणींचा ते सहज सामना करू शकतील. करीअर घडवण्यासाठी उद्योजकांच्या विविध प्रासंगिक, व्यावसायिक क्लृप्त्या त्यांना दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडू शकतील.

    सदरील पुस्तकात जहांगीर टाटा, जीडी बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, आदित्यविक्रम बिर्ला व राहुल बजाज अशा सात मान्यवर उद्योजकांचे संक्षिप्त जीवन चरित्र रेखाटलेले आहे. या जीवन चरित्रात उद्योजकांनी उद्योगधंद्याची केलेली सुरूवात, उद्योग उभारतांनाचा जीवघेणा संघर्ष, उद्योगाच्या विस्तारासाठी घेतलेले कठोर परिश्रम यांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे.

    सदरील ‘इंडियन बिझिनेस लेजंड्स’ हे पुस्तक नव्या पिढीला मार्गदर्शनपर ठरेल यात शंकाच नाही.

    Indian Business Legends

    125.00
    Add to cart
  • काव्यतरंग एक आस्वाद

    खानदेशला साहित्याचा वारसा प्राचीन काळापासून लाभलेला आहे. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर यामध्ये निश्चितपणे चांगली भर पडलेली आहे. हा वारसा समृद्धपणे जतन करण्याचे काम आजची नवकवींची पिढी तितक्याच ताकदीने करत आहे. या नवकवींमध्ये अशोक सोनवणे, पांडुरंग सुतार, संजीवकुमार सोनवणे, चामुलाल राठवा व रावसाहेब कुवर हे अग्रणी आहेत. नव्या-जुन्यांचा चांगला मेळ घालून संवेदनशील, विचारप्रवर्तक, सामाजिक जाणीवांनी भरलेल्या, दुर्दैम्य आशावादाने प्रेरित असलेल्या या नवकवींच्या कविता निश्चितच आपल्याशा वाटतात. समकालीन जाणिवांचा अचूक वेध घेण्याचे, कवितेच्या कलात्मकतेची बाजू सक्षम असण्याचे, वाचकरसिकांना अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य या खानदेशकवींच्या कवितेत निश्चितपणे आहे. खानदेशच्या या ‘काव्यतरंग : एक आस्वाद’ या पुस्तकात जुन्या-नव्या कवींचा समन्वय साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला हे कवी निश्चितच ढवळून काढतील व ज्ञानाचा, संवेदनशीलतेचा नव्याने परिचय करुन देतील एवढी ताकद त्यांच्या कवितांमध्ये आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी ही चर्चा नक्कीच उपयुक्त ठरेल. मराठी कवितेच्या प्रांगणातील खानदेशी कवींचे स्थान, एकूणच काव्य वाङ्मयातील स्थान याबद्दल काही एक निर्णय घेण्यास ही समीक्षा उपयुक्त ठरावी. याखेरीज काव्य: संकल्पना, स्वरूप, वैशिष्ट्ये, कवितेचे घटक, कवितेेचे प्रकार, मराठी कवितेची वाटचाल, खानदेशची काव्य परंपरा हा भाग उपयुक्त ठरावा, यासंबंधीची सखोल चर्चा सदरील पुस्तकात केली आहे.

    Kavyatarang Eka Aswad

    95.00
    Add to cart
  • काव्यांकुर आस्वाद आणि चिकित्सा

    मराठी कवितेला समृद्ध परंपरा आहे. कवितेच्या विविध प्रकारांनी मराठी कविता विकसित झालेली आहे. या प्रकारांमधून वैविध्यपूर्ण आशयसूत्रे आढळतात. प्रीतिभावना, निसर्ग जाणीव, सामाजिक जाणीव, राष्ट्रभावना ही काही महत्त्वाची आशयसूत्रे. या आशयसुत्रांनी प्रेरीत झालेल्या कवितांचे रसग्रहण ‘काव्यांकुर : आस्वाद आणि चिकित्सा’ या ग्रंथातून आलेले आहे. कविता हा मानवी चित्तवृत्ती चेतवणारा वाङ्मय प्रकार. अर्थाची विविध वलये तो निर्माण करतो. सदर समीक्षाग्रंथात ह्या अर्थवलयांना अक्षररूप देण्यात आलेले आहे.

    Kavyankur Aaswad Aani Chikitsa

    95.00
    Add to cart
  • खानदेश रत्नावली आस्वाद व रसग्रहण

    Khandesh Ratnavali : Aswad v Rasgrahan

    250.00
    Add to cart
  • लोकरंगभूमी

    लोकसाहित्य अभ्यासाची एक महत्वपूर्ण शाखा असलेली ‘लोकरंगभूमी’ आजच्या विज्ञानवादी युगात महत्वाची ज्ञानशाखा म्हणून पुढे आलेली आहे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतवस्थेत लोकसाहित्याचा महत्वाचा वाटा आहे. निसर्गाच्या अलौकिक रूपाच्या आर्त आळवणीतून लोकसाहित्य जन्मले. व्यक्त होणे ही मानवी प्रवृत्ती. व्यक्त होण्यामागे मानवी भावनांचा कार्यकारण भाव असतो. भावनांची अभिव्यक्ती केवळ मौखिक नसते तर ती शारीर पातळीवरही असते. म्हणूनच निसर्ग पूजनाच्या मौखिकतेला शारीरिक अभिव्यक्तीने दृश्यरूप दिले. त्यातूनच लोककलांचा म्हणजेच लोकरंगभूमीचा जन्म झाला. रंजन करणे हाच केवळ लोकरंगभूमीचा उद्देश्य नव्हता तर उदात्त मानवी मुल्यांच्या प्रसारासाठी म्हणजेच प्रबोधनासाठीही लोकरंगभूमी झटलेली पाहावयास मिळते. धार्मिक विधीनाट्य ते रिंगणनाट्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’ हा प्रबोधनाचा वसा लोकरंगभूमीने सोडलेला नाही.

    – डॉ. अक्षय घोरपडे

    Lokrangbhumi

    175.00
    Add to cart