• खैरलांजी, भीमा-कोरेगांववरील हल्ला आणि इतर कविता

    विद्रोह, आकांत, आक्रोश, उद्रेक, विध्वंस, या शब्दांशी परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा जवळचा संबंध आहे. वरकरणी हे शब्द अतिरंजित भाव प्रकटीकरण दर्शक जरी वाटत असले तरी उपेक्षितांच्या व वंचितांच्या वाट्याला आलेल्या वेदना प्रखरतेने मांडण्यासाठी याच शब्दांनी मोलाची भूमिका निभावली आहे. हेच शब्द कवी भरत शिरसाठ यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी साथ देतात. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतून मानवी जीवनातील हा संघर्ष सातत्याने मांडला गेला आहे. परिवर्तनवादी साहित्य हे भावनात्मक स्वत्व, अभित्व आणि स्वाभिमान यासाठी झुंजणारे साहित्य आहे. रंजन-मनोरंजन हा परिवर्तनवादी चळवळीचा उद्देश नाही. संत चोखा, संत कबीर, संत रवीदास यांपासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबांपर्यंतच्या बहुजनवादी संतांनी आपल्या वाणीने लोकांना जागृत केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधानाच्या रुपाने आमच्या हातात मानवमुक्तीची हुकमी चाबी दिली आहे. तरीही आजदेखील अन्याय हा शब्द येथील उपेक्षितांच्या जगण्याशी चिकटलेलाच आहे. ते एक तप्त वास्तव आहे. म्हणून संवेदनशिल मनाचे कवी प्रा. भरत शिरसाठ यांच्या काव्यसंग्रहातून खैरलांजीचं जळतं सरण आम्हाला पहायला मिळत आहे. जातीजातींमधील पेटलेल्या वास्तवांचे विस्तव स्वतंत्र चुलीत धगधगताां आज आम्ही बघत आहोत. ही धग कधी शमेल, हा एक मोठा प्रश्न आहे. बहुजनांच्या अनुपरिवर्तनासाठी ही विझणारी धग एक क्रांतीगीत असणार आहे.

    Khairlanji, Bhima-Koregaonvaril Halla Ani Itar Kavita

    100.00
    Add to cart
  • भारतीय संविधानाचे अनंत उपकार

    आधुनिक काळातील भारताची अतिशय महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे भारतीय संविधान होय. भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा होय. आपले भारतीय संविधान अप्रतिम आहे. आतापर्यंत आपल्या देशात वर्ण, जाती आणि धर्माच्या आधारावर विषमता हे एक मूल्य होते. सामाजिक जीवनात कधीच समता नव्हती. अशा परिस्थितीत भारतीय राज्यघटनेद्वारा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मानवी मूल्ये भारतीय जीवनात लागू केलीत. देशात ‌‘एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य’ हे तत्त्व प्रस्थापित केले. देशातील सर्व लोकांना मानवी मूल्ये बहाल करून देशात लोकशाहीची स्थापना केली. आपल्या देशात संविधानाने घडवून आणलेली ही अद्भुत आणि फार मोठी क्रांती आहे. या क्रांतीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.
    आपल्या देशाच्या संविधानाची प्रास्ताविका अतिशय समर्पक आणि अर्थपूर्ण आहे. भारतीय प्रास्ताविकेत संविधानाचा संपूर्ण सार आला आहे. प्रास्ताविकेची सुरुवात ‌‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी करण्यात आली आहे.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असल्यामुळे आपल्या देशाचे संविधान हे परिपूर्ण आणि अप्रतिम बनले. भारतीय संविधानाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे हे राज्यकर्त्यांवर अवलंबून असते. ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. आमचे मित्र आणि लेखक प्रा. भरत शिरसाठ यांनी ‌‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ या पुस्तकात भारतीय संविधानाची ओळख अतिशय सोप्या भाषेत करून दिली आहे. त्याबद्दल प्रा. शिरसाठ यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

    – डॉ. प्रदीप आगलावे
    सदस्य सचिव,
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती,
    महाराष्ट्र राज्य.

    Bharatiya Sanvidhanache Anant Upkar

    110.00
    Add to cart
  • शिक्षक कसा असावा?

    या पुस्तिकेद्वारे शिक्षक बंधू-भगिनींना काही चांगले मिळत असेल तर मी त्याबाबत धन्यता मानतो. माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना अक्कल शिकविणे हा या पुस्तकाचा उद्देश अजिबात नाही. शिक्षक म्हणून जीवन जगत असताना जे शिकायला मिळाले ते आपल्या इतर शिक्षक बंधू-भगिनी समोर ठेवणे, एवढाच एकमेव उद्देश या पुस्तकाचा आहे. माझ्या बावीस वर्षाच्या सेवेत मी एक परिपूर्ण शिक्षक बनलो, असा मी दावा करीत नाही. किंबहुना मला अजून बरेच काही शिकायचे आहे आणि स्वतःमध्ये असलेल्या उणीवा दूर करायच्या आहेत. मी एक शिक्षकाचा मुलगा आहे आणि स्वतःही शिक्षक असल्याने मला शिक्षक व्यवसायाबद्दल नितांत आदर आहे.
    या पुस्तकात जसे मी शिक्षकांच्या काही दोषांवर भाष्य केले आहे तसे चांगल्या शिक्षकांच्या उदात्त कार्याला नमन देखील केले आहे. शिक्षकांच्या उणीवांवर केलेली चर्चा केवळ शिक्षकी व्यवसाय समृद्ध व्हावा व त्यातून समाज व राष्ट्र बळकट व्हावे याच हेतूने केली आहे. माझ्या शिक्षक बंधू-भगिनींना हीन लेखणे, हा त्या मागचा हेतू अजिबात नाही. तरीही माझ्या शिक्षक बंधू भगिनींचे मन जर या पुस्तकातील काही मजकुराने दुखावले गेले तर मी आधीच त्याची माफी मागतो व आपला शिक्षक व्यवसाय अजून समृद्ध व्हावा यासाठी मोठ्या मनाने ते या पुस्तकाचा स्वीकार करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

    Shikshak Kasa Asava

    85.00
    Add to cart
  • सत्यशोधक आणि इतर कथा

    प्रा. भरत शिरसाठ यांचे कथाविश्व समाज संस्कृतीच्या अंतरंगाचे सम्यक आकलन करुन त्यामधील कळीचे प्रश्न मांडू पाहते. जुनी दलित कथा, कविता एकाच जात वर्गाला ठोकत राहिली. पण हा नव्या जाणिवेचा कथाकार संपूर्ण जात व्यवस्थाच शत्रू मानून तिला संपविण्यासाठी ब्राह्मण्यरहित ब्राह्मणांचाही स्विकार करते.
    मराठी कथाविश्वाला परिवर्तनवादी नवे सम्यक वळण देण्याची क्षमता प्रा. भरत शिरसाठ यांनी ‌‘सत्यशोधक आणि इतर कथा’ या कथासंग्रहाद्वारे सिद्ध केलीय. या कथेतील माणसं अस्सल आहेत. त्यांची जीवनशैली सत्वनिष्ठ व सत्यनिष्ठ आहे. बहुधार्मिक, सांस्कृतिक शुद्धता व एकात्मतेचा हा नवा कथाप्रयोग मराठी साहित्यात शिखरस्थ कला सौंदर्याचे उधळण करणारा आहे. कारण मानवाची समग्र क्षमता व सर्वांचे सर्वार्थाचे कल्याण दुःख मुक्त मानवतेच्या ध्येयवादातून लेखकाला अपेक्षित आहे. म्हणूनच भरत शिरसाठ जगावेगळा कथाकार आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा!

    – डॉ. श्रीपाल सबनीस

    Satyashodhak aani Itar Katha

    100.00
    Add to cart