• कथाविश्व

    कथांची निवड करतांना सद्य ः कालीन जीवनाचे प्रश्न व मूल्यविवेक यांचा विचार केलेला आहे.
    ‘मानवता हे मूल्य जात, धर्म, पंथ, संप्रदाय, प्रदेश विशिष्टता यांच्या पलीकडे असलेले सर्वेच्च मूल्य आहे’ – हे वामन चोरघडे यांच्या ‘हादरा’ या कथेचे प्रमुख सूत्र आहे.
    ‘प्रसार माध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून घटनांचे वार्तांकन केले नाही तर एखादी क्षुल्लक घटना मोठ्या उद्रेकाचे कारण ठरु शकते.’ हे अरुण साधूंच्या ‘दंगा’ कथेतून सूचित केले आहे.
    ‘माणूस हा बुद्धीचं वरदान लाभलेला प्राणी आहे. पण बुद्धीच्या पाठीमागे भाव असावा की भोग? बुद्धीचा उपयोग भोगासाठी केला की माणसाचा पशू होतो’. हा रत्नाकर मतकरींच्या ‘एक माणूस आणि एक पशू’ या कथेचा आशय आहे.
    ‘केवळ देणं हाच ज्यांचा जीवनधर्म आहे; अशी माणसं जेव्हा स्वतःसाठी मागतात तेव्हा त्यांच मोठेपण संपून जातं.’ हे कल्पवृक्षाच्या रुपकातून विजया दिक्षित यांनी ‘एका झाडाची इच्छा’ या कथेतून मांडलेलं आहे.
    ‘श्रद्धा, लेाकश्रद्धा, अंधश्रद्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांचे संस्कार. बालसुलभ मनावर कसे कोरले जातात’ याचे प्रत्ययकारी दर्शन योगीराज वाघमारे यांच्या ‘गुडदाणी’ कथेतून घडते.
    ‘वठलेलं झाड फुलवण्यासाठी कोवळ्या अंकुराचा बळी देणं कितपत संयुक्तिक आहे.’ हा प्रश्न ‘महात्मा’ कथेद्वारे लक्ष्मण लोढे यांनी उपस्थित केला आहे.
    ‘रोजा-एकादशी आणि भाकरी यांची कष्टकर्‍यांच्या वेदनेशी-जोडलेली नाळ’ संजीव गिरासे यांच्या ‘जकात’ कथेत दिसते.
    सारांश या कथा विद्यार्थ्यांना व वाचकांना व्यक्तीजीवन व समष्टीजीवनाचं उन्नयन करणार्‍या मूल्यांची ओळख करुन देतील. असा विश्वास वाटतो. कथेच्या रुपबंधाच्या अभ्यासाच्या जोडीने कथेतील चिरंतन मूल्यांचाही विचार व्हावा ही अपेक्षा आहे.

    Kathavishrva

    50.00
    Add to cart
  • खान्देशची काव्यधारा

    Khandeshchi Kavyadhara

    45.00
    Add to cart
  • झडती पिढीपेस्तर प्यादेमातची

    या देशाची वाटचाल महासत्तेकडे चालली आहे. हे एक सुंदर स्वप्न आहे. मात्र आजच्या घडीला हा देश खर्‍या अर्थाने सुखी-समृद्ध कसा होणार हा चिंतनाचा मुख्य मुद्दा असला पाहिजे आपला देश ‘कृषी-प्रधान’ आहे हे भावनिक विधान किती काळ चालविणार, जागतिकीकरणात आपली 90% शेती संपत चालली आहे. ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ काळजाला रक्तबंबाळ करणार्‍या आहेत बेरोजगारांच्या फौजा, उपाशी पोटांची वाढत जाणारी संख्या, शेतीचे नापिकीकरण, या सर्व समस्यांवर सक्षम उपाय शोधून काढले तरच शेती, शेतकरी व देश सावरेल, यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच, गावागावात सेंद्रीय शेतीचे महत्व, वनराई बंधारे, म. फुलेंची पाणी व शेतीविषयक धोरण, सक्षम बियाणांचे जाळे विणावे लागेल. चांगले उपक्रम चिरंतर राबवावे लागतील. श्रमाला, शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्वांनाच झोकून द्यावे लागणार आहे. पिढ्यान्पिढ्या पोसणार्‍या शेतीला समृद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सर्वांनाच करावी लागणार आहे. तरच या देशाची वाटचाल महासत्तेकडे होईल. मग कोणाची झडती. घेण्याची गरज भासणार नाही.

    Zadti Pidhipestar Pyadematchi

    150.00
    Add to cart
  • निवडक वाटचाल

    Nivadak Vatchal

    45.00
    Add to cart
  • बिल्वदल

    साहित्य नेहमीच माणसाला सहाय्य करीत आलेलं आहे. तेच त्याच्यासाठी आशेचं, साहसाचं आणि शौर्याचं प्रेरणास्त्रोत बनून राहिलं आहे. भल्याबुर्‍याच ज्ञान त्याने साहित्याद्वारेच मिळवलं आहे. वरवर पाहिलं तर असं वाटेल, की साहित्यिक केवळ माणसाच्या दैहिक दुःखाचं आणि त्याच्या हर्षोल्हासाचं चित्रण करतोः पण वास्तवात त्याच्या प्राणात वसत असलेल्या दीपशिखेला चेतवणं हा त्याचा उद्देश असतो. काळाबरोबर जीवनाची मूल्यंही बदलतात. त्या परिवर्तनाचं स्वागत करणं हे साहित्याचं कर्तव्य आहे आणि युगाप्रमाणे जीवनमूल्यांची स्थापना करणं हेही साहित्याचं कर्तव्य आहे.

    – वि. स. खांडेकर

    Bilvadal

    70.00
    Add to cart
  • श्री एकनाथ महाराजांची निवडक भारुडे

    संतसाहित्याची चिकित्सा स्वातंत्र्यपूर्ण काळापासून आजतागायत चालू आहे. समाजशास्त्रीय दृष्टीने संतसाहित्याचे अवलोकन करताना नाथवाड्ःमयातील भारुड रचनेचा आवर्जून उल्लेख केला जातो. नाथांसारख्या व्युत्पन्न कवीची ही रचना सर्वसामान्यांना आकलन होण्याच्या दृष्टीने लिहिलेली आहे. समाजाच्या विविध स्तरातील सामान्य माणसे नाथांनी आपल्या कवितेत उभी केली. त्यांची दुःखे, त्यांची वेदना, त्यांचे मन भारुडामधून व्यक्त झाले. दुसर्‍या बाजूने विचार केला तर समकालीन सामान्य जनांचा एक पट नाथांनी भारुडांमधून चित्रित केला. नाथकालीन समाजचित्रण या दिशेनेही भारुडांचा विचार करता येईल. भारुड या वाड्ःमय प्रकाराचे एक अंग लिखित संहितेचे असले तरी दुसरे अंग सादरीकरणाचे आहे. नृत्यनाट्याच्या माध्यमातून भारुडे सादर करणारी परंपरा महाराष्ट्राने सांभाळली. लोकसूहाचे प्रबोधन करणे, लोकसमूहाला दिशा देणे, सामान्य जनांना विचार प्रवृत्त करणे असाही विचार नाथांच्या भारुडांमध्ये बघता येतो. नाथांनी जेवढे विविध रचनाबंध काव्य लेखनासाठी हाताळले, तेवढे क्वचितच दुसर्‍या कवीने हाताळलेले आढळतील. महाराष्ट्रात बहुरुढ झालेल्या भारुडाने महाराष्ट्राची बहुजिनसी संस्कृती आपल्या डोळ्यासमोर उभी केली. अध्यात्म आणि समाजदर्शन या दोन्ही अंगानी महाराष्ट्राची सत्त्वशील परंपरा जनत करण्याचे काम भारुड वाड्ःमयाने केले आहे. केवळ मनोरंजन हे नाथांच्या भारुडाचे प्रयोजन कधीच नव्हते. नाथकालीन प्रबोधनाच्या कल्पना समजावून घेण्याच्या दृष्टीने ही भारुडांचा अभ्यास महत्वाचा ठरावा.

    Shri Ekanath Maharajanchi Nivadak Bharude

    70.00
    Add to cart