- DESCRIPTION
- INDEX
डॉ. संजय कांबळे हे तिसर्या पिढीतील आंबेडकरी साहित्यकारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर पहिल्या व दुसर्या पिढीतील आंबेडकरी साहित्यकारांचा प्रभाव पडला हे नाकारता येत नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. कृष्णा किरवले, प्रा. केशव मेश्राम, रा. ग. जाधव इत्यादी मूर्धन्य साहित्यकार, समीक्षकांनी मांडलेले समीक्षणाचे आदर्श, सिद्धांत डोळ्यापुढे ठेवून दुसरी व तिसरी पिढी समीक्षा क्षेत्रात वाटचाल करीत आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी साहित्य तपासण्याचे निकष बदलले पाहिजे असे जे ठासून सांगितले, ते निकष दुसरे तिसरे कोणते नसून विशुद्ध आंबेडकरवादी विचारसरणी होय.
मानवतावादाची जोपासना, धर्मग्रंथातील कालबाह्य विचारांची चिरफाड, भारतीय संविधानातील मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्नशीलता, बुद्धाच्या प्रज्ञा, शील, करुणेच्या भावतत्वांचे परिशीलन करुन साहित्यनिर्मिती व त्या साहित्यातील गुणावगुणांचे विवेचन ज्या निकषांच्या आधारे करायचे ते सर्व आंबेडकरवादाच्या संकल्पनेत लिहित आहे. हे डोळ्यापुढे ठेवून डॉ. संजय कांबळे यांची लेखन सरपट धावत आहे असे अनेक विचार प्रचोदक लेखन डॉ. संजय कांबळे यांनी लिहून दिशादर्शी व्हावे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो.
– डॉ. अनिल गजभिये,
जेष्ठ आंबेडकरीवादी समीक्षक, विचारवंत, इंदूर (मध्यप्रदेश)
Samyak Samiksha
Author
Related products
-
चकवा एक आकलन
Rs.125.00 -
तहान स्वरुप आणि समीक्षा
Rs.250.00



