Your cart is empty now.
विकसित व विकसनशील राष्ट्रातील वित्तीय क्षेत्रात बँका अतिशय महत्त्वाच्या असतात. बँका बचतीला गती देतात. बँकांमुळेच बचत करणारे आणि कर्ज घेणारे-देणारे एकत्र येतात. देशात बचतीचे प्रमाण वाढावे यासाठी भारत सरकारने बँकाचा विकास करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध आयोग, समित्या गठीत केल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली. भारत सरकारने बँकींग कंपनी कायद्याचे रुपांतर 1949 मध्ये बँक नियमन कायद्यात केले. या कायद्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. परिणामी देशात बँकिंग क्षेत्राचा विकास तीव्र गतीने झाला. आवश्यक तेथे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. माहितीस्त्व मराठी पारिभाषिक शब्दांच्या इंग्रजी संज्ञांचा समावेश सदरील पुस्तकात केलेला आहे.