Your cart is empty now.
स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योतर काळात भारतीय राजकारणात नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांनी भारताच्या व महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रस्तुत पुस्तकात त्या त्या काळातील सामाजिक-राजकीय व्यवस्थेचे विवेचनासोबतच जिल्ह्यातील बदलत गेलेले राजकारणाचाही समावेश होतो. नाशिक लोकसभा मतदारसंघ अत्यंत जागरुक व संवेदनशील असल्याचे जनतेने वेळोवेळी दाखवून दिले आहे. गेल्या 70 वर्षातील लोकसभेच्या उमेदवारांची माहिती, जिल्ह्यातील राजकीय पक्ष, चिन्ह, विविध नेते, निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या वेळेच्या निवडणुकीतील वातावरण यांचाही यथायोग्य समाचार लेखकाने प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील लोकसभा आणि राज्यसभा यांचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रदीप देशपांडे यांनी प्रस्तुत लिखाणातून घेतला आहे.
सदरील ग्रंथ नाशिक, मालेगांव, धुळे या जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते सामाजिक, राजकीय कार्याचे अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच पत्रकार, राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि जिज्ञासूंकरीता उपयुक्त ठरेल.