Your cart is empty now.
निरामय आनंदी जीवनाचे रहस्य जाणून घेऊन समाधानी, सुखी जीवन जगण्यातच बुद्धीकौशल्य आहे. आयुष्याच्या सर्वच वाटा सरळ नाहीत. त्या मार्गावर अनेक वळणेही आहेत. वळणावर योग्यरित्या वळणे, प्रसंगावधान राखण्यातच शहाणपणा आहे. मानवी शरीरशास्त्रातील सर्वच ज्ञान मानवाला गवसले आहे, हे म्हणणे अतिशयोक्तीच होईल. परमेश्वराने सुप्त सामर्थ्याने पुनरुत्पादनाची प्रक्रिया सुरु ठेवलेली आहे. मानवी जीवनात जन्मास आलेले बाळ, त्याचे शारिरीक अवयव आणि सुरक्षा परंपरेने विकसीत होत आलेले आहेत. पूर्वी बाळाच्या जन्माच्यावेळी कापलेली नाळ निरुपयोगी समजून फेकून दिली जात असे. पण त्या नाळेत बाळाचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे सुरक्षाकवच दडलेले आहे, याची जाण अलीकडेच झालेली आहे. बाळाच्या नाळेत सुमारे 300 विकाररोग दूर करण्याची क्षमता आहे; म्हणूनच तिची साठवण महत्वाची आहे. शरीरातील सर्व नियंत्रक नाड्या नाभीरत केंद्रीत आहेत आणि त्या नाभीचे महत्व जाणून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच निरामय आनंदी जीवनाचे फलीत आहे.