Your cart is empty now.
आहारामुळे शरीरामध्ये बदल घडवून आणता येतात; तर प्राणायाम, ध्यानसाधना, योगासने, दिर्घश्वसन याद्वारे मन बदलविता येते. म्हणजेच निसर्ग उपचारांमध्ये शरीरावर व मनावर नियंत्रण घालून रोग विकारापासून स्वत:चे संरक्षण करता येते. सध्याच्या युगात निसर्गोपचार पध्दतीमध्ये आहार चिकित्सा, उपवास चिकित्सा, ॲक्युप्रेशर - ॲक्युपंक्चर, योगोपचार, वनौषधी, पुष्पौषधी इत्यादी. चिकित्सांचा समावेश केला जातो. याचाच अर्थ असा की, पर्यावरणात, निसर्गसृष्टीत जे काही चांगले आहे त्या सर्वांचा समन्वय यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळेच निसर्गोपचार पध्दती ही अत्यंत गुणकारी, चमत्कारी, क्रांतीकारी उपचार पद्धती आहे. ही पद्धती मानवी जीवनाच्या कल्याणासाठी एक दैवी शक्ती आहे.