Your cart is empty now.
मध्ययुगीन भारताचे स्थूल मानाने दोन कालखंड गृहीत धरले जातात. एक म्हणजे सुलतान कालखंड व दुसरा मोगल कालखंड. सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. सुलतान तुर्क आणि अफगाण वंशातील होते. त्यांना भारतीय धर्म, संस्कृती व तेथील जीवनपद्धती याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यांनी येथील राजे व त्यांचे सैन्य यांचा पराभव करुन या देशाचा लष्करी ताबा मिळविला होता. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. दिल्ली सुलतानशाहीत पाच घराणी होऊन गेली. इब्राहीम लोदी दिल्ली सुलतानशाहीचा शेवटचा सुलतान होय. 21 एप्रिल, 1526 च्या पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले. त्याचबरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट झाली.
प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन भारतातील इतिहासाची साधने, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथाचा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी, विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चित उपयोग होईल.